शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘कल्ला’बोल!

By admin | Updated: October 5, 2014 01:48 IST

रिक्षांतील प्रचाराचा धुराळा आणि पक्षांकडून आरोपांच्या फैरी.

वाशिम : विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरला आहे. प्रत्येक पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्याफैरी झडत आहेत. शहरात जागोजागी प्रचाराच्या रिक्षा फि रत असून कल्पकतेने तयार केलेल्या ध्वनीफितींमधून मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्याचवेळी एकाच प्रभागातील एका चौकात एका पाठोपाठ दुसरी, तिसरी रिक्षा येऊन थांबली की, या सर्वांच्या होणार्‍या कल्लाबोलमुळे शहरवासी पार वैतागले आहेत.विधानसभेची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारांनी प्रचाराचा जोरही वाढविला आहे.आजवर उमेदवारांनी मतदाराच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्याची पहिली इनिंग संपविली आहे. आता मतदानाला कमी दिवस उरले असल्यामुळे ह्यडोअर टु डोअर ह्ण फि रण्यापेक्षा उमेदवारांनी तथा त्यांच्या सर्मथकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या शक्तीस्थळावर हल्ला करण्याचे धोरण अंगीकारले आहे. १३ ऑक्टोंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांना या कर्णकर्कश आवाजाचा सामना करावा लागणार आहे. त्यांनतर मात्र मतदार सुटकेचा निश्‍वास सोडतील.** ध्वनीप्रक्षेपकांच्या गोंगाटात मतदार मात्र, बाळगले मौनच !विधानसभा निवडणुकीच्या हंगामात आश्‍वासनांच्या पाण्याने मतदारांच्या मनरुपी जमिनीचे सिंचन करून मतांचे पिक घेऊ पाहणार्‍या उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविण्यात आघाडी घेतली आहे. ह्यमी कसा चांगला..ह्ण ह्यमाझ्याकडेच कसे विकासाचे व्हिजन आहे..ह्ण एवढेच नव्हेतर ह्यमाझी मतदारसंघाला कशी गरज आहे..ह्ण यासारख्या बाबी भोळ्याभाबड्या मतदारांना पटवून देण्यासाठी उमेदवारांनी रान डोक्यावर घेतले आहे. कुणी रिक्षाच्या ध्वनीक्षेपकातून तर कुणी कॉर्नर सभा, जाहीर सभांमधून मतदारांना टार्गेट करीत आहे. मतदार मात्र, या सर्व गोंगाटातही अद्याप मौनच असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीला अवघ्या दहा दिवसाचा कालावधी उरला असताना मतदार कुणाच्या झोळीत मताचे दान टाकेल याबाबत अद्यापही अनिश्‍चितता कायम आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांचे पुढारी देखील स्पष्ट बहुमताबाबत साशंक असल्याचेच दिसून येत आहे.