शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
3
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
4
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
5
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
6
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
7
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
8
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
9
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
10
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
11
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
12
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
13
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
14
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
15
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
16
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
17
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
18
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
19
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
20
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

शेतकर्‍यांवर संकटाची मालिका कायमच!

By admin | Updated: September 23, 2014 01:11 IST

बियाण्यांपासून तर उत्पन्न हाती घेईपर्यंत अनेक समस्यांना करावा लागतोय सामना

वाशिम: जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर संकटाची मालीका सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांपासून तर पिक हाती येईपर्यंत यावर्षी शेतकर्‍यांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्राला सुरूवात होण्याआधी जिल्हयातील सर्वंच शेतकर्‍यांनी पेरणीच्या दृष्टीकोनातून शेत तयार करून ठेवले होते. जिल्हयाचे प्रमुख पिक सोयाबीन असल्याने सोयाबीन चे बियाणे मिळविण्याकरीता शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली. गतवर्षी खरिप हंगामात जास्त व सतत पाऊस पडल्याने सोयाबीनचे पीक भिजल्या गेले व यामुळे सोयाबीनची प्रत खराब होवून उगवण शक्ती कमी झाली. या प्रकारामुळे बियाण्यांची कमतरता भासली. घरी असलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता घरातील कुंडीव्दारे व गोणपटाव्दारे तपासली यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन लाभले. कसेबसे बियाण्यांची जुळवाजुळव केली मात्र मृग नक्षत्रात अर्धाअधिक महिना उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नाही यामुळे शेतकर्‍यांच्या पेरण्या वेळेवर होवू शकल्या नाहीत.मृग नक्षत्रानंतर १७ ते १८ दिवसानंतर पाऊस आला म्हणून शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यात. त्यानंतर जी पावसाने दडी मारली की बियाणे जमिनीतून बाहेरचं आले नाही पर्यायी शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी नंतरही पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस बरसला नसल्याने अनेक भागातील शेतकर्‍यांवर तिबार पेरणीचे संकट ओढविले. एवढे सर्व असताना नाईलाजाने काही शेतकर्‍यांनी ठिंबक सिंचनावर पिकांचे संरक्षण केले. लगेचच यानंतर मधात पिकांवर जिवाणू व बुरशीजन्य रोग आला. या संकटातून कसेबसे शेतकरी निघाले नाही तो पिकांवर पिवळा मोझ्ॉक आला व जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात २0 ते १५ टक्के पिकांचे नुकसान केले. या नुकसानीपासून शेतकर्‍यांना वाचविण्याकरीता कृषी विभागानेही मोलाचे सहकार्य केले परंतु त्याचाही काही फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे.