शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

३ हजार शेतकरी मदतीपासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST

गतवर्षीच्या अर्थात २०२० च्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यात मूग, उडिद, कपाशीसह सोयाबीन पिकाचे अतोनात ...

गतवर्षीच्या अर्थात २०२० च्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यात मूग, उडिद, कपाशीसह सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, शासनाने राज्यभरातच झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यात महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त पाहणीत जिल्ह्यातील ९५५२ शेतकऱ्यांच्या ६ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४९ हेक्टर क्षेत्रातील जमिनींचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली होती.

------

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी

६३५६

---------

मदतीचा लाभ मिळालेले शेतकरी

३३४०

प्रतीक्षेत असलेले शेतकरी

३०१६

---------

मदतीसाठी एकूण निधीची मागणी

४.५१ कोटी

-------------

प्राप्त झालेला निधी

२.२०

------------

गत खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीने मूग, उडिद पीक हातून गेले, तर परतीच्या पावसाने सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले. प्रशासनाने या नुकसानाची पाहणी करून अहवालही सादर केला, परंतू दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी, आम्हाला अद्याप शासनाकडून मदत मिळाली नाही.

- नितीन उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

-------------

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४.५२ कोटीच्या निधीचा प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आला होता. त्यापैकी निम्मा निधी मिळाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात आली आहे.

- शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम