शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

सागरात संघर्ष भडकणार?

By admin | Updated: August 30, 2015 21:38 IST

वसई, डहाणू जाफ्राबाद या पश्चिम किनारपट्टीच्या समोरील समुद्रात एकूण ११ हजार चौ.कि.मी. क्षेत्रांपैकी उरलेल्या १७५० चौ.कि.मी. जागेवर ही उत्तनमधील मासेमारी करणाऱ्या काही

हितेन नाईक, पालघरवसई, डहाणू जाफ्राबाद या पश्चिम किनारपट्टीच्या समोरील समुद्रात एकूण ११ हजार चौ.कि.मी. क्षेत्रांपैकी उरलेल्या १७५० चौ.कि.मी. जागेवर ही उत्तनमधील मासेमारी करणाऱ्या काही मच्छिमारांनी आपल्या कवी ठोकायला सुरूवात केल्याने पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छिमारांना मासेमारीचे क्षेत्रच उरले नसल्याने बहुतांशी बोटी सातपाटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. या समस्येबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर जैसे थे परिस्थितीत ठेवण्याच्या आदेशाला वसई तालुक्यातील मच्छिमार जुमानत नसून या वादावर तोडगा काढण्यात शासनही स्वारस्य दाखवित नसल्याने पुन्हा रोजीरोटीच्या गंभीर प्रश्नावर समुद्रात मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.वसई ते डहाणूसमोरील समुद्रातील माशांचे अस्तित्व असलेल्या ११ हजार चौ.की.मी. क्षेत्र हे दालदा पद्धतीने (गिलनेट) मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसाठी शिल्लक होते. परंतु चालू सीझनमध्ये उत्तनच्या मच्छिमारांनी दालदा मासेमारी क्षेत्रात (१७५० चौ.की.मी.) पुन्हा जबरदस्तीने कवी मारायला घेतल्याने सातपाटीच्या दालदा मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मासेमारी क्षेत्रच उरलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटात अनेक वेळा संघर्ष होऊन पोलीस केसेस झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी इक्बाल सिंग चहल यांनी जिल्हा मासेमारी सल्लागार समितीच्या सन २००४ साली झालेल्या बैठकीमध्ये या संघर्षावर तोडगा काढताना सातपाटीच्या समोर पश्चिमेस ४२.५ नॉटीकल मैल व ३२० अंश डीग्री खाली असलेल्या वसई -उत्तनच्या मच्छिमारांच्या कवी काढून टाकण्याचे आदेश दिले होत. परंतु त्यांनी आदेश न पाळल्याने जिल्हाधिकाऱ्याने मत्स्य व्यवसाय विभागाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर आपल्या मासेमारी क्षेत्रात कोणतेच कायदे नसल्याचा फायदा उलचण्याच्या दृष्टीने वसईतल्या मच्छिमारांनी सन २००४ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयात तात्पुरती मनाई हुकूम (स्टे) बजावीत राज्य सरकारला मासेमारी हद्दीबाबत सागरी कायदे व नियम बनविण्याचे आदेश दिल्याचे सागरी सल्लागार समितीचे सदस्य सुभाष तामोरे यांनी पत्रकारांना सांगिले. परंतु याबाबत केंद्र व राज्यशासनाच्या उदासीन धोरणामुळे ११ वर्षाच्या कालावधीनंतरही कायदे बनविण्यात शासन स्तरावर उपयशी ठरले आहे. याचा फायदा सध्या उत्तनच्या मच्छिमाराकडून घेतला जात असून त्यांच्याकडून थेट जाफराबादपर्यंत कवी ठोकण्याचे काम सुरू केल्याचे सर्वोदय संस्थेमध्ये कव-दालडा संरक्षण समितीने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे आता आम्हाला मासेमारी करण्याचे क्षेत्रच उरले नसून आमच्या रोजारोटीचा प्रश्न निर्माण झाला असून समुद्रात कधीही संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.