शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

सागरात संघर्ष भडकणार?

By admin | Updated: August 30, 2015 21:38 IST

वसई, डहाणू जाफ्राबाद या पश्चिम किनारपट्टीच्या समोरील समुद्रात एकूण ११ हजार चौ.कि.मी. क्षेत्रांपैकी उरलेल्या १७५० चौ.कि.मी. जागेवर ही उत्तनमधील मासेमारी करणाऱ्या काही

हितेन नाईक, पालघरवसई, डहाणू जाफ्राबाद या पश्चिम किनारपट्टीच्या समोरील समुद्रात एकूण ११ हजार चौ.कि.मी. क्षेत्रांपैकी उरलेल्या १७५० चौ.कि.मी. जागेवर ही उत्तनमधील मासेमारी करणाऱ्या काही मच्छिमारांनी आपल्या कवी ठोकायला सुरूवात केल्याने पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छिमारांना मासेमारीचे क्षेत्रच उरले नसल्याने बहुतांशी बोटी सातपाटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. या समस्येबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर जैसे थे परिस्थितीत ठेवण्याच्या आदेशाला वसई तालुक्यातील मच्छिमार जुमानत नसून या वादावर तोडगा काढण्यात शासनही स्वारस्य दाखवित नसल्याने पुन्हा रोजीरोटीच्या गंभीर प्रश्नावर समुद्रात मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.वसई ते डहाणूसमोरील समुद्रातील माशांचे अस्तित्व असलेल्या ११ हजार चौ.की.मी. क्षेत्र हे दालदा पद्धतीने (गिलनेट) मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसाठी शिल्लक होते. परंतु चालू सीझनमध्ये उत्तनच्या मच्छिमारांनी दालदा मासेमारी क्षेत्रात (१७५० चौ.की.मी.) पुन्हा जबरदस्तीने कवी मारायला घेतल्याने सातपाटीच्या दालदा मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मासेमारी क्षेत्रच उरलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटात अनेक वेळा संघर्ष होऊन पोलीस केसेस झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी इक्बाल सिंग चहल यांनी जिल्हा मासेमारी सल्लागार समितीच्या सन २००४ साली झालेल्या बैठकीमध्ये या संघर्षावर तोडगा काढताना सातपाटीच्या समोर पश्चिमेस ४२.५ नॉटीकल मैल व ३२० अंश डीग्री खाली असलेल्या वसई -उत्तनच्या मच्छिमारांच्या कवी काढून टाकण्याचे आदेश दिले होत. परंतु त्यांनी आदेश न पाळल्याने जिल्हाधिकाऱ्याने मत्स्य व्यवसाय विभागाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर आपल्या मासेमारी क्षेत्रात कोणतेच कायदे नसल्याचा फायदा उलचण्याच्या दृष्टीने वसईतल्या मच्छिमारांनी सन २००४ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयात तात्पुरती मनाई हुकूम (स्टे) बजावीत राज्य सरकारला मासेमारी हद्दीबाबत सागरी कायदे व नियम बनविण्याचे आदेश दिल्याचे सागरी सल्लागार समितीचे सदस्य सुभाष तामोरे यांनी पत्रकारांना सांगिले. परंतु याबाबत केंद्र व राज्यशासनाच्या उदासीन धोरणामुळे ११ वर्षाच्या कालावधीनंतरही कायदे बनविण्यात शासन स्तरावर उपयशी ठरले आहे. याचा फायदा सध्या उत्तनच्या मच्छिमाराकडून घेतला जात असून त्यांच्याकडून थेट जाफराबादपर्यंत कवी ठोकण्याचे काम सुरू केल्याचे सर्वोदय संस्थेमध्ये कव-दालडा संरक्षण समितीने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे आता आम्हाला मासेमारी करण्याचे क्षेत्रच उरले नसून आमच्या रोजारोटीचा प्रश्न निर्माण झाला असून समुद्रात कधीही संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.