शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

सूर्या कालव्यांची दुरूस्ती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:41 IST

प्लास्टर गेले वाहून : १० वर्षांपासून दुरूस्ती नाही, कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्यांअंतर्गत शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, १० वर्षांपासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाही शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याने कालव्यांच्या पाण्यावर होणाºया शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर जमीन सूर्या कालव्याअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाळे, खानीव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटणे, चारोटी, कासा, सारणी, निकावली, उरसे, साये, रानशेत, साखरे, गोवणे,घोळ, दाभोण, वधना, ऐना आदी गावांना तर पालघर तालुक्यातील सोमटा, बºहाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, आकेगवहान, रावते, शिगांव, कुकडे, महागाव, गारगाव, गुंदले, वाळवे अशा सुमारे ८५ ते ९० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणी गळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर (दगडाने) पिचिंग केले आणि आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिक करून अस्तरीकरण केले. मात्र, नंतर वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम आणि प्लास्टरही पाण्यात वाहून गेले आहे. काही ठिकाणी तर कालव्याचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यातून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाºया काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बºयाच शेतकºयांनी भातशेती करणे बंद केले आहे. तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाºया शेतीला देखील वेळोवेळी योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात.दरम्यान, १२ वर्षांपूर्वी सूर्या प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत सूर्यानगर, पालघर, वाणगांव येथील सर्व कार्यालये बंद करून १०० ते १२० किमी. अंतरावरील कार्यकारी अभियंता भातसा कालवा क्र .१ शहापूर, येथे ती जोडण्यात आली होती. त्यामुळे येथील अधिकारी नियमित दूरवर येऊन कालव्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत आणि साफसफाईची कामेही होत नाहीत अशी शेतकºयांची तक्रार होती. दरम्यान, शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने दोन वर्षांपूर्वी पुन्हा सूर्या प्रकल्पाचे कार्यालय मनोर येथे आणले आहे. तरीही अद्याप परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.शेतकºयांकडून वेळोवेळी पाणी बिल (पाणीपट्टी) भरूनही दुरूस्तीची कामे होत नसल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्याची आमची मागणी आहे.-सुरेश घरत, शेतकरी