शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सूर्या कालव्यांची दुरूस्ती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:41 IST

प्लास्टर गेले वाहून : १० वर्षांपासून दुरूस्ती नाही, कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तसेच पालघर तालुक्यातील गावांना सूर्या प्रकल्पातून उन्हाळ्यात कालव्यांअंतर्गत शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, १० वर्षांपासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणावर नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाही शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याने कालव्यांच्या पाण्यावर होणाºया शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर जमीन सूर्या कालव्याअंतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाळे, खानीव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटणे, चारोटी, कासा, सारणी, निकावली, उरसे, साये, रानशेत, साखरे, गोवणे,घोळ, दाभोण, वधना, ऐना आदी गावांना तर पालघर तालुक्यातील सोमटा, बºहाणपूर, आंबेदा, नानिवली, चिंचारे, आकेगवहान, रावते, शिगांव, कुकडे, महागाव, गारगाव, गुंदले, वाळवे अशा सुमारे ८५ ते ९० गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातून पाणी गळती होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने सर्व माती भरावाचे असलेले कालवे बाहेरून डबर (दगडाने) पिचिंग केले आणि आतील बाजूने बांधकाम तसेच प्लास्टिक करून अस्तरीकरण केले. मात्र, नंतर वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम आणि प्लास्टरही पाण्यात वाहून गेले आहे. काही ठिकाणी तर कालव्याचे प्लास्टर आणि बांधकाम पूर्णपणे निघून गेल्याने आतून कालवे ढासळून गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कालव्यातून पाण्याची मोठी गळती होते. कालव्यांना जोडणाºया काही गावांना अपूर्ण पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथील बºयाच शेतकºयांनी भातशेती करणे बंद केले आहे. तर गळतीमुळे मुख्य कालव्यातून उपकालव्यांना जोडणाºया शेतीला देखील वेळोवेळी योग्य पाणीपुरवठा होत नसल्याचे शेतकरी सांगतात.दरम्यान, १२ वर्षांपूर्वी सूर्या प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत सूर्यानगर, पालघर, वाणगांव येथील सर्व कार्यालये बंद करून १०० ते १२० किमी. अंतरावरील कार्यकारी अभियंता भातसा कालवा क्र .१ शहापूर, येथे ती जोडण्यात आली होती. त्यामुळे येथील अधिकारी नियमित दूरवर येऊन कालव्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत आणि साफसफाईची कामेही होत नाहीत अशी शेतकºयांची तक्रार होती. दरम्यान, शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने दोन वर्षांपूर्वी पुन्हा सूर्या प्रकल्पाचे कार्यालय मनोर येथे आणले आहे. तरीही अद्याप परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. याबाबत माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.शेतकºयांकडून वेळोवेळी पाणी बिल (पाणीपट्टी) भरूनही दुरूस्तीची कामे होत नसल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्याची आमची मागणी आहे.-सुरेश घरत, शेतकरी