शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
7
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
8
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
9
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
12
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
13
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
14
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
15
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
16
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
17
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
18
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
20
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)

वैतरणा पूूल ‘रामभरोसे’

By admin | Updated: October 27, 2016 03:37 IST

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते.

- हितेन नाईक,  पालघरमहाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई-गुजरातला जोडणारा ब्रिटिशकालीन वैतरणा पूलाचे शेवटचे स्ट्रकचरल आॅडिट कधी झालेय याची माहितीच पश्चिम रेल्वे प्रशासना कडे उपलब्ध नसल्याने महाड च्या दुर्घटने नंतर तात्काळ आॅडिट होणे गरजेचे असताना रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने पावले उचलत नसल्याने प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन किती बेफिकीरिने वागत आहे हे दिसून येत आहे.मुंबई-गुजरात-दिल्ली आदी राज्यांना जोडणारा सफाळे-वैतरणा पूल पश्चिम रेल्वे साठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे.ब्रिटिशकालीन काळात सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या ९२ व ९३ क्र मांकाच्या पुलाची उन्हातान्हात समुद्राच्या लाटाचा मारा आणि पुलावरून होणारी रोजची वाहतुकीच्या भारा मुळे धोकादायक अवस्था झाली आहे. ह्या पुलांच्या बांधकामातील लोखंडी साहित्य गंजून गेले असून धोकादायक अवस्थेतील या पुलांचे आयुष्यमान कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने सात वर्षा पूर्वी पासून नवीन रेल्वे पूल उभारणीचे काम हाती घेतले आहे.मात्र रेल्वे आणि ठेकेदारा मध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रेल्वे पूल उभारणीचे काम जवळपास बंद पडले आहे.पालघर-डहाणूला उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्या नंतर लोकल वाहतूक सुरु झाली असून लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. अशा वेळी नवीन पूल उभारणी ला मोठी दिरंगाई होत असल्याने आणि या पुला जवळूनच मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असल्याने प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. महाड मध्ये झालेल्या दुर्घटने नंतर या पूल उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरु करणे अत्यावश्यक असताना त्या नवीन पुलाच्या उभारणीचे काम बंद पडत असल्यास प्रवाशांच्या जीविताचे गांभीर्य रेल्वे प्रशासनाला किती आहे हे दिसून येत असल्याचे राहुल तोडणकर या प्रवाशाने सांगितले. रोजची वाहतूक पहाता एक दिवस मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.माहितीच्या अधिकारामध्ये धक्कादायक वास्तव- पालघर जिल्हा निर्मिती नंतर नागरीकरणाचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून मेल, एक्स्प्रेस, शटल, मेमु द्वारे लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. तसेच अवजड माल वाहतूकही सुरु असल्याने हा जीर्ण झालेला पूल किती वेळ ह्या वाहतुकीचा भर सांभाळू शकेल हा प्रश्न उपस्थित झाल्या नंतर डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेचे सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश प्रभुतेंडोलकर ह्यांनी पश्चिम रेल्वे प्रशासना कडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती.या अर्जाला सफाळे-वैतरणा दरम्यानच्या दोन्ही पुलाच्या स्ट्रक्चरलं आॅडिट कधी झाली आहे. ह्या बाबत माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रथमेश ह्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाल्या नंतर मोठा मेगाब्लॉक घेऊन थोडीशी दुरु स्ती करण्यात आली होती. परंतु रेल्वे पुलाच्या पूर्वे कडील भराव हि खचत असल्याच्या घटना नेहमी समोर येत आहेत.या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरलं आॅडिट तात्काळ करणे अत्यावश्यक बाब असताना अजूनही त्याबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म बसली असल्याने रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीविताशी जीवघेणा खेळ खेळत असून त्यांना कुठलेही गाम्भीर्य दिसून येत नसल्याचे दिसून येत नसल्याने दैनंदिन प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.