शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय एक, लाभार्थी अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:54 IST

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार-मोखाडा भागात स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयांची उभारणी पुर्ण झाल्याचे जाहीर करुन शंभर टक्के हागणदारी मुक्तच्या घोषणा देण्यात आल्या असून संबधितांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.

- हुसेन मेमन जव्हार : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार-मोखाडा भागात स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयांची उभारणी पुर्ण झाल्याचे जाहीर करुन शंभर टक्के हागणदारी मुक्तच्या घोषणा देण्यात आल्या असून संबधितांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. स्वच्छ भारताचे खोटे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या पालघर जिल्ह्यातील खरे वास्तव समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील गु्रप-ग्रामपंचायत काष्टी-सावर्डे येथे एकाच शौचालयाचे अनेक लाभार्थी दाखवून स्वच्छ भारत मिशन या संकेत स्थळावर अपलोड करून मोठा घोटाळा करण्यात आला आहे.बनवा बनवीचा हा प्रकार काष्टीपाडा येथील अमोल वांगड याने उघडकीस आणली असून त्यांच्या घरातील वैयक्तीक शौचालयासमोर विविध लाभार्थी उभे करून फोटो काढण्यात आलेले होते. ते तात्कालीन ग्रामसेवक शांतशिल धुरंधर या ग्रामसेवकाने शासनाच्या वेबसाईटवर अपलोड सुध्दा केलेले होते.वास्तविक, या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सर्व शौचालयांची दुरावस्था असून अनेक अपुर्णावस्थेत आहेत. काष्टी-सावर्डे ग्रामपंचायतीत सावळा गोधंळ सुरू असून त्यात चालणाºया कामकाजाची चौकशी व्हाही असे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. तसेच तक्रारी अर्जानंतर वेबसाईटवरून पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे फोटो काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.अमोल याने त्यांच्या शौचालयासमोर उभे राहणाºया लाभार्थ्यांना विचारले असता, आम्हाला ग्रामसेवक धुरंधर भाऊसाहेब यांनी सांगितले आहे, असे उत्तर या अशिक्षित आदिवासींनी दिले.विशेष म्हणेचे याबाबत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्र्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांना २७ फे ब्रुवारी २०१८ रोजी या भ्रष्टाचाराची तक्रारीही करण्यात आली आहे. मात्र, यामुळे शासनाची पोलखोल होईल म्हणून हा तक्रारी अर्ज दाबून ठेवल्याचा आरोप तक्रारदारानी केला आहे.तक्रारदारासह एकुण पाच लाभार्थ्यांचे नांवे हागणदारीमुक्तच्या यादीत समाविष्ट आहेत प्रत्यक्षात लाभ दिलेलाच नाही. यात अमोल राजू वांगड, युवराज बंडू पवार, अनिल बंडू पवार, अनिल धोंडू पवार, धोंडू पवार व अन्य यांचे पुर्वीच्या यादीत नावे समाविष्ट होती. मात्र, यांना कुठलाच लाभ देण्यात आलेला नाही. तसेच यांची नांवेही संकेतस्थळावर झळकत होती, ती आता काढुन टाकण्यात आलेली आहेत.>संकेत स्थळावर : तातडीने बदलतक्रारी अर्जानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणांनी संकेत स्थळाच्या अभिलेखावरुन काष्टी- सावर्डेचा आलेख बदलला असून आगोदर शंभर टक्के दाखविलेला आता ९६ टक्कयांवर आणला आहे. ग्रामसेवकाने केलेला भ्रष्टÑाचार यामुळे चव्हाट्यावर आला असला तरी प्रशासनातील अधिकाºयांनी हे प्रकरण झाकण्यासाठी तातडीने शासनाच्या वेबसाईटवरून फोटो व नांवे डिलीट केलेले आहेत. पूर्वी दाखविण्यात आलेल्या १०० % हागणदारी मुक्तीचे पेज स्क्रिनशॉट करून व यादी डाऊनलोड करण्यात आलेली असल्यामुळे अमोल यांना मॅनेज करण्यासाठी ग्रामसेवकांचे फोन सुरू असल्याची माहितीही अमोलने लोकमतला दिली आहे.>बोगस स्वच्छता मिशनवर कारवाइ कराशासनाच्या संकेतस्थळावर जव्हार, मोखाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती १०० % हागणदारी मुक्त असल्याचा कागदोपत्री दाखविण्यात आलेले असून याबाबतही उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामसेवकाच्या व अधिकाºयांच्या संगनमताने चालेल्या बोगस स्वच्छता मिशनवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील आदिवासी बांधवांनी केलेली आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.