शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

हळद लागवडीच्या अपयशावर तोडगा!

By admin | Updated: August 30, 2015 21:28 IST

वास्तविक भातशेती ही पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या ही परवडेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीचा प्रयोग

वास्तविक भातशेती ही पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या ही परवडेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीचा प्रयोग करण्यात आला होता. सुरुवातीस त्यास स्थानिक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. परंतु कालांतराने ही लागवड परवडत नसल्याचे स्पष्ट करून अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कृषी विभागाने या मागची कारणे शोधायला हवीत.शेतकऱ्यांना ही लागवड का परवडत नाही, या प्रश्नाच्या खोलात जाऊन तपासणी झाली पाहिजे. या लागवडीचा प्रारंभ करताना या बाबींचा विचार झाला होता का? शेतकऱ्यांना माफक दरात बी-बियाणे पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन राहिले का? हळद लागवडीला भातशेतीपेक्षा अधिक खर्च येतो का? हळदीचे ब्रँडींग व मार्केटींग का फसले? या प्रश्नाची उत्तरे कृषी विभागाकडून अपेक्षित आहेत. भातशेती स्थानिक शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून कृषी विभागाने कालबद्ध कृषी कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गावातील नारळावर गेल्या १० वर्षांपासून जीवघेण्या रोगांचे थैमान सुरु आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे आपल्या कृषी विभागाला आजतागायत शक्य झाले नाही. ज्या तामीळनाडू व केरळ राज्यातून या रोगाचे आगमन झाले. त्या राज्यांनी मात्र अल्पावधीत या रोगाचा समूळ नायनाट केला व शेतकऱ्यांना दिलासा दिला. या राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर हे साध्य करून दाखवले, ते आपल्या कृषी अधिकाऱ्यांना जमू शकले नाही. त्यामुळे नारळाची जिल्ह्यातून हद्दपारीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. हळद लागवडीची अशीच हालत निर्माण होणार का? याचे उत्तर मिळाले पाहिजे.पालघर तालुक्यातील केळवे-माहिम या परीसरात काही बागायतदार मसाल्याचे पदार्थ व व्हॅनिला लागवडीचे प्रयोग करीत असतात. अशा बागायतदारांना शासनस्तरावरून प्रोत्साहन मिळाल्यास बागायतक्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतील. समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये बागायती लागवडीला पोषक हवामान असताना कृषी विभाग अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे स्थानिक बागायतदार व शेतकरीही पुढाकार घेत नाहीत. तांदुळ, केळी, पानवेली व आता हळद अशी जर मालिका वाढतच जाणार असेल तर मग ग्रामीण भागातील भूमीपुत्रांच्या मुलाबाळांना रोजगारासाठी शहरे गाठावी लागतील व ती प्रक्रीया गेल्या १० वर्षांपासून सुरु झाली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने पालघर डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा व विक्रमगड भागातील भातशेती व बागायती वाचवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, तसेच कमी पाण्यात व खर्चात तयार होणारे पर्यायी पीकेही कोणती? ते शोधून त्यांची लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच जिल्ह्यातील उरली-सुरली शेती, बागायती वाचू शकेल. तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबेल.