शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सेल्फी हजेरीला शिक्षकांचा तीव्र विरोध

By admin | Updated: January 10, 2017 05:52 IST

शिक्षकांनी रोज विद्यार्थ्यांची व आपली हजेरी सेल्फीच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविण्याच्या तुघलगी निर्णयाला शिक्षकांचा वाढता विरोध होतो आहे.

अनिरु द्ध पाटील / डहाणू/बोर्डी शिक्षकांनी रोज विद्यार्थ्यांची व आपली हजेरी सेल्फीच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविण्याच्या तुघलगी निर्णयाला शिक्षकांचा वाढता विरोध होतो आहे. मुळात हा आदिवासी व डोंगराळ तालुका आहे. अनेक ठिकाणी मोबाईचे टॉवर नाहीत. कुठे त्यांची क्षमता अल्प आहे. त्यामुळे कनेक्टीव्हीटी नाही त्यात नेटवर्क नाही त्यामध्ये प्रदीर्घ भारनियमनाची भर पडलेली अशा स्थितीत घेतलेला सेल्फी रोज ठरलेल्या वेळी पाठवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.शाळांमध्ये उपस्थितीच्या नावाखाली वर्ग शिक्षकांनाच विद्यार्थ्यांसह सेल्फी घेण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. शासनाच्या या धोरणाची सर्वच पातळीवर खिल्ली उडविली जात आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत.शाळांमध्ये विद्यार्थी-शिक्षक उपस्थितीची काटेकोर अंमलबजावणीसाठी वर्गशिक्षकांना विद्यार्थ्यांसह ९ जानेवारीनंतर येणाऱ्या पाच सोमवारी सेल्फी काढण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढले आहे. या करिता केंद्रस्तरावर प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत घेतली गेली. पहिली ते १२ वीसाठी या धोरणाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. १० विद्यार्थ्यांचा गट केला जाणार आहे. परिपत्रकानुसार वर्गशिक्षकाला अँड्रॉइडचा मोबाईल विकत घ्यावा लागणार असून त्यासाठी मोठी रक्कम खर्चावी लागणार आहे. शिवाय महिन्याकाठी इंटरनेट वापरासाठी अधिकची पदरमोड करावी लागेल. सेल्फी काढण्यासाठी तो पाठवण्यासाठी लागणारी कनेक्टीव्हीटी असेल असा स्पॉट शोधून तिथे जाण्यासाठी व तिथून परत येण्यासाठी अध्यापनाचा बहुमूल्य वेळ वाया जाणार आहे. विद्यार्थी संख्या अधिक असणे, संबंधित वर्गशिक्षक गैरहजर असल्यास डोकेदुखी आणखी वाढणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या निम्यापेक्षा जास्त शिक्षकांना फोन व इंटरनेट हाताळता येत नाही. ज्यांना हे ज्ञान अवगत आहे ते डीएड, बीएड पदवीधर मात्र बेरोजगारीच्या विळख्यात खितपत पडले आहेत.दरम्यान शाळांमध्ये सेल्फी काढण्याच्या वेडापायी अनेक समस्या निर्माण होणार आहेत. शिवाय शालेय वातावरणातील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना मिळणारी प्रायव्हसी संपुष्टात येऊन हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे. वाडा तालुक्यातही संघटनांचा एल्गारवाडा : गेल्या दोन वर्षा पासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळेतील सर्व व्यवहार डिजीटल स्वरूपात सुरू केले आहेत. मात्र खर्चाची तरतूद नसल्याने शिक्षक दारोदारी धनिकांना आर्जवी करून शाळा डिजीटल करीत आहेत. आता मंडे सेल्फीने शिक्षक संतापले असून त्या विरोधात एकवटले आहेत. अलिकडेच महाराष्ट्रात सर्व शिक्षण प्रक्रि या डिजीटल स्वरूपात सुरू आहे.त्यात आता सेल्फीची भर पडली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सेल्फी घेऊन त्याच दिवशी आॅनलाईन करावी लागणार आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व शिक्षक याच कामात अडकले असून, सेल्फीचे फोन खरेदी करणे, रेंजसाठी शाळेबाहेरचा स्पॉट शोधणे यात अध्यापनाकडे पाठ फिरवावी लागणार आहे. अध्यापनाला फाटा देत बराच वेळ शिक्षकांना सेल्फीत घालवावा लागणार आहे. तरीरही सरकारी खाक्याच्या भीतीने शिक्षक हे काम नाराजीने करतात. तालुक्यातील शिक्षकांनी या सेल्फी विरोधात आंदोलन करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने आजच शिक्षक संघटनांनी पंचायत समिती समोर आंदोलन छेडले व गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले. याबाबत बोलतांना प्रा .धनंजय पष्टे यांनी सांगितले की, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेवून ती शाळेत का येत नाहीत हे कारण जाणून घेणे फार गरजेचे आहे. अशा पालकांना रोजीरोटी साठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला तर मुलांना पालक शांळेत निश्चित पाठवतील. हे न करता शासन शिक्षकांना व पालकांना मन:स्ताप देत आहे.