शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

राष्ट्रीय पेयजलच्या नळपाणी योजना अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:57 IST

मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे.

संजय नेवेविक्रमगड : तालुक्याला मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यात विहिरीचे काम झाले असून पाण्याच्या टाक्यांचे क ाम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या कायम असल्याने ही कामे कधी पुर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या योजनांची कामे ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या असून यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. ही कामे वर्क आॅर्डर प्रमाणे केव्हाच पुर्ण व्हायला हव्या होत्या. मात्र, त्या कोणत्या टप्प्यावर आडल्या आहेत याचा अभ्यास ना जि.प.कडून होत ना त्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडून होत. याबाबत पाणीपुरवठाविभागाचे उप अभियंता आर. कदम यांना विचारणा केली असता या योजनांवर पुर्वी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कामे झाली आहेत. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्या पूर्ण होत नसल्याने त्यांचे हस्तातंरण पाणी पुरवठा विभागाला करुन त्या पूर्ण करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. परंतू हे कधी होणार याबाबत काहीच सागितले नाही.अशा योजना आखल्या जातात पंरतु प्रत्यक्षात त्याचा लाभ गाव खेडयाना होतो की नाही हे कोणीच पाहत नाही. त्यामुळे या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसे वीज बिलान मुळेही तलवाडा, कुज या व अशा योजना बंद आहेत. या बाबतही पाणीपुरवठा विभागने लक्ष देऊन या सर्व योजना कार्यान्यित कराव्या अशी मागणी कॉ. किरण गहला यांनी केली आहे. तालुक्यात दरवर्षी ३५ ते ४० गाव पाडाना पाणी टंचाई जाणवते. या वर्षी तिच परिस्थिती निर्माण होत आहे. तरी पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन टंचाई दुर करावी व टँकरची व्यवस्था करावी विहिरीची पातळी कमी झालेल्या असून यावर उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी गहला यांनी केली आहे.>जनाठेपाड्यात टॅँकरने व टाक्यांद्वारे पाणीपुरवठा सुरुतलवाडा: ओंदे ग्रुपग्रामपंचात अंतर्गत असलेल्या जनाठेपाडयात भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत होता. येथे ६० ते ७० घराची वस्ती आहे. ६५० ते ७०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.जनाठे पाडा विक्र मगड शहरा पासुन केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. जनाठेपाडा उंच भागात वसलेला आहे. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली असून. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.या बाबत पंचायत समिती अधिकाऱ्यांन कडे तक्र ार करून ही प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती या बाबत लोकमतमध्ये जनाठेपाडयात तीव्र पाणी टँचाई या मंथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत या पाड्यात टाक्यांनद्वारे व टँकर द्वारे पाणी पुरवठाची सोय सुरु केली आहे.त्याचप्रमाने ग्रुप ग्रामपंचात ओंदेच्या सरपंच चंद्रकला खुताडे यानी माहिती देताना सांगितले की, उन्हाळा संपे पर्यंत उघाणीपाड्यातून तातपुरता पाईप लाईनद्वारे जानाठेपाडा येथील रहिवाशाना पाण्याची सोय करून देण्यात आली आहे.दरवर्षी या पाड्याला पाणी टंचाई जाणवते. प्रशासनाने यावर अपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करून पाणी टंचाईवर कायमची उपाय योजना करावी.- सुनील विष्णू कनोजा, ग्रामस्थ, जनाठेपाडाजनाठेपाड्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत टॅँकर व टाक्यांद्वारे पाणी सोडले जात आहे.