शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

राष्ट्रीय पेयजलच्या नळपाणी योजना अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:57 IST

मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे.

संजय नेवेविक्रमगड : तालुक्याला मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यात विहिरीचे काम झाले असून पाण्याच्या टाक्यांचे क ाम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या कायम असल्याने ही कामे कधी पुर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या योजनांची कामे ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या असून यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. ही कामे वर्क आॅर्डर प्रमाणे केव्हाच पुर्ण व्हायला हव्या होत्या. मात्र, त्या कोणत्या टप्प्यावर आडल्या आहेत याचा अभ्यास ना जि.प.कडून होत ना त्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडून होत. याबाबत पाणीपुरवठाविभागाचे उप अभियंता आर. कदम यांना विचारणा केली असता या योजनांवर पुर्वी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कामे झाली आहेत. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्या पूर्ण होत नसल्याने त्यांचे हस्तातंरण पाणी पुरवठा विभागाला करुन त्या पूर्ण करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. परंतू हे कधी होणार याबाबत काहीच सागितले नाही.अशा योजना आखल्या जातात पंरतु प्रत्यक्षात त्याचा लाभ गाव खेडयाना होतो की नाही हे कोणीच पाहत नाही. त्यामुळे या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसे वीज बिलान मुळेही तलवाडा, कुज या व अशा योजना बंद आहेत. या बाबतही पाणीपुरवठा विभागने लक्ष देऊन या सर्व योजना कार्यान्यित कराव्या अशी मागणी कॉ. किरण गहला यांनी केली आहे. तालुक्यात दरवर्षी ३५ ते ४० गाव पाडाना पाणी टंचाई जाणवते. या वर्षी तिच परिस्थिती निर्माण होत आहे. तरी पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन टंचाई दुर करावी व टँकरची व्यवस्था करावी विहिरीची पातळी कमी झालेल्या असून यावर उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी गहला यांनी केली आहे.>जनाठेपाड्यात टॅँकरने व टाक्यांद्वारे पाणीपुरवठा सुरुतलवाडा: ओंदे ग्रुपग्रामपंचात अंतर्गत असलेल्या जनाठेपाडयात भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत होता. येथे ६० ते ७० घराची वस्ती आहे. ६५० ते ७०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.जनाठे पाडा विक्र मगड शहरा पासुन केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. जनाठेपाडा उंच भागात वसलेला आहे. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली असून. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.या बाबत पंचायत समिती अधिकाऱ्यांन कडे तक्र ार करून ही प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती या बाबत लोकमतमध्ये जनाठेपाडयात तीव्र पाणी टँचाई या मंथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत या पाड्यात टाक्यांनद्वारे व टँकर द्वारे पाणी पुरवठाची सोय सुरु केली आहे.त्याचप्रमाने ग्रुप ग्रामपंचात ओंदेच्या सरपंच चंद्रकला खुताडे यानी माहिती देताना सांगितले की, उन्हाळा संपे पर्यंत उघाणीपाड्यातून तातपुरता पाईप लाईनद्वारे जानाठेपाडा येथील रहिवाशाना पाण्याची सोय करून देण्यात आली आहे.दरवर्षी या पाड्याला पाणी टंचाई जाणवते. प्रशासनाने यावर अपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करून पाणी टंचाईवर कायमची उपाय योजना करावी.- सुनील विष्णू कनोजा, ग्रामस्थ, जनाठेपाडाजनाठेपाड्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत टॅँकर व टाक्यांद्वारे पाणी सोडले जात आहे.