शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

खासदारांच्या वसईतील जनता दरबारात वीजेने केला खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:53 IST

जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.

वसई : पालघर लोकसभेचे युतीचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्र वारी वसई तहसील कार्यालयात आपला पहिला-वहिला जनता दरबार आयोजित केला होता. मात्र आश्चर्य म्हणजे हा जनता दरबार सुरू असतांना तीनवेळा वसई गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने वीज कंपनी व त्यांच्या अधिकाऱ्यांची पोल चांगलीच उघडी पडली.दरम्यान या जनता दरबारात लोकांनी प्रामुख्याने वीज बिले, वाढीव बिले, अधिकारी कर्मचारी वर्गाचा अनागोंदी व मनमानी कारभार आदी असंख्य वीज समस्या सोबत प्रलंबित ६९ गावांचा पाणीपुरवठा प्रश्न: यासह वसई महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले. उपस्थित विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यावरील उपाययोजना सुचविली.खरंतर या जनता दरबारात महसूल, वीज आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेली ६९ गावची पाणी योजना हे प्रमुख प्रश्न होते.ते दुर्लक्षित राहिले.त्यावर खास.राजेंद्र गावित यांनी उपस्थितांना ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास नेउन कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन लवकरच हा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे सूतोवाच केले.या दरबाराचे महत्त्व वाढले. कारण येथे अवघ्या ४ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होत असून पैकी पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात युतीला चांगले मताधिक्य मिळून आता युतीचे खासदार निवडून आले, त्यामुळेच सेना भाजपाचे लक्ष आता खासकरून बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा क्षेत्रावर राहणार आहे.वीज अधिकारी वर्गाची फटफजिती ! तर पालिका आयुक्त उठून जातात तेव्हा ?हा जनता दरबार सुरू असताना देखील याप्रसंगी तीन वेळा महावितरणचा विद्युत प्रवाह खंडित झाला, त्यामुळे उपस्थित महावितरणच्या अधिकाºयांची चांगलीच फटफजिती बघायला मिळाली. याचा फायदा घेत नागरिकांनी आरडाओरड सुरू केला होता. तर यावेळी उपस्थित नागरिकांनी सार्वजनिक प्रश्नासमवेत वसई विरार महापालिका आयुक्त बी.जी.पवार यांना आपले खाजगी प्रश्न देखील विचारायला सुरुवात करून त्यांना घेरण्याचा प्रत्यन केला. मात्र अखेर वैतागून आयुक्त बी.जी. पवार यांनी भर सभेतून काढता पाय घेत निघून जाणे पसंत केलं.