शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

गत वर्षात महाराष्ट्रात ८८ पत्रकारांवर हल्ले

By admin | Updated: January 9, 2017 06:15 IST

पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून

विक्रमगड : पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून यामध्ये ८८ पत्रकार जखमी झाले आहेत. सरासरी दर चार दिवसाला राज्यात एका पत्रकारावर हल्ला झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे संकलित झालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. १ जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१६ या पाच वर्षांच्या काळात राज्यात ३४१ पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हे प्रमाण अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत जास्त आणि चिंता वाटावी एवढे आहे. आणखी किती पत्रकारांची डोकी फुटल्यावर सरकार पत्रकार संरक्षण कायदा करणार आहे? असा सवाल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केला आहे. २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यात ८८ पत्रकार जखमी तर झाले आहेतच त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पत्रकारांना धमक्या देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या २४ घटना घडलेल्या आहेत. शिवाय पत्रकारांवर अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, सारखे गंभीर आणि अजामिनपात्र खोटे गुन्हे दाखल करण्याच्या २२ घटना घडल्या आहेत. याच कालावधीत एका पत्रकाराचे अपहरण झाले असून त्याची नोंद पोलिसात झालेली आहे. वेगवेगळ्या कारणांनी ६ पत्रकारांनी आत्महत्या केल्या असून १४ पत्रकारांचे अकाली निधन झाले आहे. माध्यमातील या सर्व घटना माध्यमात काम करणाऱ्यसाठी चिंता वाढविणाऱ्या आहेत.समितीने २०१२ पासूनची आकडेवारी दिलेली आहे. २०१२ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या ४५ घटना घडल्या. २०१३ मध्ये त्यात मोठीच वाढ होऊन ती संख्या ६५ पर्यंत पोहोचली. २०१४ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले नाही. उलट ते वाढले. २०१४ मध्ये ६६ पत्रकारांवर हल्ले झाले. २०१५ मध्ये हा आकडा आणखी वाढला आणि हल्ल्यांची संख्या ७७ वर पोहोचली तर २०१६ मध्ये ८८ पत्रकार जखमी झाले. (वार्ताहर)