शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी धरणाचा ठेकेदार मालामाल

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

जव्हार तालुक्यातील भोतडपाडा येथे लेंडी धरणाचे काम अनेक वर्षा पासून सुरु आहे. या धरणाच्या कामासाठी ठेकदारला आतापर्यंत शासनाने ७० कोटी रुपये दिले आहेत.

जव्हार : जव्हार तालुक्यातील भोतडपाडा येथे लेंडी धरणाचे काम अनेक वर्षा पासून सुरु आहे. या धरणाच्या कामासाठी ठेकदारला आतापर्यंत शासनाने ७० कोटी रुपये दिले आहेत. मात्र या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, ना धड मोबदला ना धड शेती, अशी त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामुळे लेंडी धरणाचा ठेकेदार मालामाल तर येथील आदिवासी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लेंडी धरणाचे काम २० जानेवारी २००७ पासून सुरु आहे. परंतु शासन दरबारी हे काम २००८ पासून सुरु असल्याचे दाखविले आहे. या धरणाच्या कामासाठी अद्यापही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण नसतांना ९५ टक्के काम या ठेकेदाराने पूर्ण केले कसे? असा सवाल येथील आदिवासी शेतकऱ्यांना पडला आहे. सुरवातीला या धरणाचा खर्च २३ कोटी रुपये होता. आता तो आकडा वाढून ७० कोटींर पोहचला आहे. धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येथे बाधित शेतक-यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. कालव्याच्या कामासाठी झालेल्या या खोदकामामुळे जमिनीची धूप होवून शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे. ८ वर्षांपासून हे खोदकाम सुरू असल्याने जमिनीची धूप होवून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते आहे.शासनाच्या धोरणानुसार ज्या ठिकाणी धरण होणार आहे. त्यांचे पुनर्वसन आधी करा मगच धरणाचे कामे चालू करा असे असतांना शेतकऱ्यांना आधारात ठेवून इतकी वर्ष काम केले आहे. जव्हार, मोखाडा, या आदिवासी भागात या ठेकेदाराने आजपर्यंत ५ ते ६ धरणांचे काम केले आहे. मात्र एकाही धरणाचे काम निट होत नाही. तरी या ठेकेदाराला शासन काम देतेच कसे? अशा शासनाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी येथील बाधित शेतकरी व लेंडी धरणग्रत पुनर्वसन समितीच्या अध्यक्ष- रजनी पांढरे यांनी केला आहे. (वार्ताहर) लेंडी धरणाचे काम दोन वषार्पासून काम बंद करण्यात आले आहे. या धरणात भोतडपाडा, जामसार, पोयशेत, गोरठन, बोराळे येथील १२५ शेतकऱ्यांची १८० हेक्टर जमीन धरणामध्ये बाधित आहे. या गावांपैकी काही शेतकऱ्यांना जमिनीचा थातुरमातूर मोबदला मिळाला आहे. तर काही शेतक-यांना अजून दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे येथील बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचे कसे व जगवायचे कसे अशा प्रश्न पडला आहे. तर आंबा व काजू बागायतदारांना तर त्यांनाही अद्याप मोबदला मिळाला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यावर उपासमारीची वेळा आली आहे. व शासन पुनर्वसनासाठी कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यामुळे यांचा त्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.