शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

लेंडी धरणाचा ठेकेदार मालामाल

By admin | Updated: November 18, 2015 00:09 IST

जव्हार तालुक्यातील भोतडपाडा येथे लेंडी धरणाचे काम अनेक वर्षा पासून सुरु आहे. या धरणाच्या कामासाठी ठेकदारला आतापर्यंत शासनाने ७० कोटी रुपये दिले आहेत.

जव्हार : जव्हार तालुक्यातील भोतडपाडा येथे लेंडी धरणाचे काम अनेक वर्षा पासून सुरु आहे. या धरणाच्या कामासाठी ठेकदारला आतापर्यंत शासनाने ७० कोटी रुपये दिले आहेत. मात्र या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, ना धड मोबदला ना धड शेती, अशी त्यांची बिकट अवस्था झाली आहे. यामुळे लेंडी धरणाचा ठेकेदार मालामाल तर येथील आदिवासी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लेंडी धरणाचे काम २० जानेवारी २००७ पासून सुरु आहे. परंतु शासन दरबारी हे काम २००८ पासून सुरु असल्याचे दाखविले आहे. या धरणाच्या कामासाठी अद्यापही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण नसतांना ९५ टक्के काम या ठेकेदाराने पूर्ण केले कसे? असा सवाल येथील आदिवासी शेतकऱ्यांना पडला आहे. सुरवातीला या धरणाचा खर्च २३ कोटी रुपये होता. आता तो आकडा वाढून ७० कोटींर पोहचला आहे. धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येथे बाधित शेतक-यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. कालव्याच्या कामासाठी झालेल्या या खोदकामामुळे जमिनीची धूप होवून शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले आहे. ८ वर्षांपासून हे खोदकाम सुरू असल्याने जमिनीची धूप होवून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते आहे.शासनाच्या धोरणानुसार ज्या ठिकाणी धरण होणार आहे. त्यांचे पुनर्वसन आधी करा मगच धरणाचे कामे चालू करा असे असतांना शेतकऱ्यांना आधारात ठेवून इतकी वर्ष काम केले आहे. जव्हार, मोखाडा, या आदिवासी भागात या ठेकेदाराने आजपर्यंत ५ ते ६ धरणांचे काम केले आहे. मात्र एकाही धरणाचे काम निट होत नाही. तरी या ठेकेदाराला शासन काम देतेच कसे? अशा शासनाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी येथील बाधित शेतकरी व लेंडी धरणग्रत पुनर्वसन समितीच्या अध्यक्ष- रजनी पांढरे यांनी केला आहे. (वार्ताहर) लेंडी धरणाचे काम दोन वषार्पासून काम बंद करण्यात आले आहे. या धरणात भोतडपाडा, जामसार, पोयशेत, गोरठन, बोराळे येथील १२५ शेतकऱ्यांची १८० हेक्टर जमीन धरणामध्ये बाधित आहे. या गावांपैकी काही शेतकऱ्यांना जमिनीचा थातुरमातूर मोबदला मिळाला आहे. तर काही शेतक-यांना अजून दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे येथील बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचे कसे व जगवायचे कसे अशा प्रश्न पडला आहे. तर आंबा व काजू बागायतदारांना तर त्यांनाही अद्याप मोबदला मिळाला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यावर उपासमारीची वेळा आली आहे. व शासन पुनर्वसनासाठी कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यामुळे यांचा त्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.