शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या दुरूस्तीअभावी भातपिकाचे सिंचन अपुरे

By admin | Updated: November 3, 2015 01:06 IST

डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांनी पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाच वर्षापासून त्यांची दुरूस्तीच न झाल्याने बऱ्याच ठिकाणी

कासा : डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांनी पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाच वर्षापासून त्यांची दुरूस्तीच न झाल्याने बऱ्याच ठिकाणी ते नादुरूस्त झाले आहेत. काही ठिकाणी बांधकाम व प्लॅस्टर तुटले आहे. भरावाचा काही भाग निघून गेला आहे. परिणामी, त्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होते. यंदा कालव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात केला जाणाऱ्या शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगतात. सिंचनासाठी धामणी येथे सूर्यानदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला. या अंतर्गत आदिवासी भागातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर जमिन सूर्या कालव्यांतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली. पालघर जिल्ह्यातील सुमारे ७५ गावांना उन्हाळ्यात या धरणातून शेतीसाठी कालव्यांतर्गत पाणी सोडले जाते. बऱ्याच ठिकाणी हे कालवे डोंगरालगत असल्याने पावसाळ्यात वाहून आलेले दगड, गोटे, माती साचून भरले आहेत. त्याचप्रमाणे कालव्यांना जोडणारे लघु कालवे काही ठिकाणी कच्च्या स्वरूपाचे माती भरावाचे असल्याने माती, रेती साचून ते उथळ झाले आहेत. तर मुख्य कालव्यातून व लघु कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा करणारे गेटही माती, दगड, गोट्यांनी भरलेले आहेत. तसेच त्यांची वेळोवेळी दुरूस्तीच न झाल्याने पाण्याची गळती होते.१० वर्षापूर्वी सूर्या प्रकल्पाची सूर्यानगर, पालघर व वाणगांव येथील सर्व कार्यालये १०० ते १२० कि. मी. अंतरावरील शहापूर येथील भातसा कालवा क्र. १ येथे स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे येथील अधिकारी दुरवर येवून कालव्यांच्या दुरूस्तीकडे नियमीतपणे लक्ष देत नाहीत व साफसफाईची कामेही होत नाहीत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडून वेळोवेळी पाणीपट्टी भरूनही दुरूस्तीच होत नाही.वाड्यात मजुरांचा प्रश्न बिकटवाडा : यंदा पाऊस कमी झाला असला तरी भातपीक बहरले आहे. या दमदार पिकांमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, येथे मजुरांचा प्रश्न बिकट बनल्याने शेतीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे आहेत. येथे १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. त्यातही झिनी, गुजरात, सुरती, कर्जत, मसुरी, सुवर्णा, दप्तरी, सोनम या भाताच्या वाणाची लागवड करून शेतकरी उत्पन्न घेतात. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण प्रसिद्ध आहे. या भातशेतीला मजुरांची जास्त आवश्यकता भासते. परंतु, औद्योगिकीकरणामुळे येथील मजूर कारखान्यात व रेती व्यवसायावर कामाला जातात. त्यामुळे येथे त्यांची सतत कमतरता भासते आहे. भातकापणी व झोडणीसाठी येथील सधन शेतकऱ्यांनी तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणले आहेत. या मजुरांना प्रतिदिन २५० ते ३०० रुपये अधिक तीन वेळा जेवण दिले जाते. हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यातच या मजुरांची मनमानी वाढली असून त्यांच्याअभावी भातशेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सध्या भातपीक तयार झाले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने कापणी खोळंबली आहे. ज्यांना मजूर मिळालेत, त्यांची कापणीची कामे जोरात सुरू असून काही शेतकऱ्यांनी तर झोडणीच्या कामालाही सुरुवात केली आहे. सूर्या कालव्यांची पाच वर्षांपासून दुरूस्ती होत नाही त्यामुळे शेतीवर परिणाम होतो.- मंगेश वावरे, शेतकरी