शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तुफानी लाटांमुळे मासेमारी धोक्यात

By admin | Updated: July 21, 2015 05:02 IST

एकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही

हितेन नाईक , पालघरएकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात समुद्रात कधीही वादळी वारे, तुफानी लाटा निर्माण होऊ शकतात, या हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर १ आॅगस्टपासून समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत मच्छीमारांमध्ये भीतिदायक वातावरण आहे. अशा वेळी जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न मच्छीमार विचारू लागले आहे.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये मागील अनेक वर्षांपासून १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीच्या पावसाळी बंदीचा कालावधी घोषित करण्यात येत होता. त्यामुळे नारळी पौर्णिमेला सागराची परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करून नारळ अर्पण केल्यानंतरच मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात पाठवित असल्याची प्रथा होती. याच दरम्यान शासनाच्या मच्छीमारांच्या विकासविषयक धोरणात दिवसेंदिवस विपरीत बदल करण्यात आल्यामुळे मच्छीमारांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्याऐवजी त्यात वाढ झाली. त्यातच समुद्रातील बोटींच्या संख्येत झालेली वाढ व पर्ससीन नेटसारख्या विनाशकारी जाळ्यांमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागली. त्यामुळे मत्स्य दुष्काळाचे संकट परंपरागत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या डोक्यावर घोंघावू लागले. अशा वेळी शासनस्तरावरून निवेदने, मोर्चे, आंदोलने करूनही धनाढ्य ट्रॉलर्सधारकांना छुपा पाठिंबा मिळाला. वारंवार प्रयत्न करूनही शासनाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने शेवटी ठाणे, पालघर व गुजरात राज्यातील काही मच्छीमार संघटना, सहकारी संस्था एका व्यासपीठावर एकत्र आल्या व मत्स्य दुष्काळाचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने १० जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी असताना सर्व मच्छीमारांनी १५ मेपासूनच स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत आपला मासेमारी व्यवसाय बंद करून बोटी किनाऱ्यावर लावल्या. मे महिन्यात अंडीधारक (गाबोळीवाले) व लहान पापलेटच्या पिलांची कत्तल होऊ नये, यासाठी पोटाला चिमटा काढून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा सकारात्मक बदल मच्छीमारांत दिसून आला व पापलेटचे व चांगले आर्थिक उत्पन्न देणारे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात मिळू लागल्याने मच्छीमारही सुखावले होते. त्यामुळे या वर्षीही मच्छीमारांनी मे महिन्यातच घेतलेल्या या निर्णयाला शासनाकडून पाठिंबा मिळेल व मच्छीमार संघटनांंनी पाळलेल्या ९२ दिवसांच्या पावसाळी बंदीचा सकारात्मक विचार होईल, अशी मच्छीमारांची धारणा होती.