शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

किल्ल्यात साकारले वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र

By admin | Updated: January 10, 2017 05:49 IST

वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले.

सुनील घरत / पारोळ (ता.वसई)वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले. या मोहिमेत २५ हजार घोडदळ, ४० हजार पायदळ, ४ हजार सुरुंग तज्ज्ञ, ५ हजार उंट, ५० हत्ती होते. वसईला मुक्त, सुखी व समृद्ध करण्यासाठी हाती घेतलेल्या या मोहिमेत मराठ्यांचे जवळपास २२ हजार सैनिक हुतात्मा झाले. वज्राईच्या कृपेने व मराठ्यांच्या पराक्र मामुळे पोर्तुगीज हारले व भगवा जरीपटका वसईच्या जंजिऱ्यावर फडकला. एकाच मातीचे, एकाच रक्ताचे, एकाच संस्कृतीच्या, भाषेच्या हिंदू व धर्मांतरीत ख्रिस्ती बांधवांनी स्वराज्य व सुराज्य लाभल्यामुळे आनंदी होऊन आप्पांना नजराणे समर्पित केले. एकूण एक फिरंगी वसई सोडून गेला. या संग्रामाचे भित्तीचित्र आज वसई किल्ल्यात साकारण्यात आले.वसई मोहिमेतील दगदग व प्रचंड हाल अपेष्टांमुळे एकाच वर्षात वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ रोजी दम्याच्या आजाराने चिमाजी अप्पांचे देहावसान झाले. पौष शु.एकादशीस आप्पांच्या अर्धांगिनी सौ.अन्नपूर्णाबाई सती गेल्या व त्यांचे स्वर्गारोहण झाले, असे पुण्यातील आप्पांच्या समाधीवर नमूद केले आहे.अशा या पराक्र मी, बुद्धिमान, ओजस्वी, कर्तव्यदक्ष, दयाळू व सिहष्णू नरवीर चिमाजी आप्पांची पुण्यतिथी सालाबादाप्रमाणे आमची वसईने चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे ८ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साजरी केली. मशाली व पण त्यांच्या विलोभनीय प्रकाशात, तुतारीच्या गजरात, चिमाजी आप्पांना वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र समर्र्पित करु न आदरांजली वाहण्यात आली.वसई किल्ल्यात अनेक पर्यटक येतात. पण वसई किल्ल्याचे महत्व व इतिहास काय आहे, चिमाजी आप्पा कोण होते, त्यांचे जीवन कसे होते, या संबंधी कुठेही माहिती उपलब्ध होत नाही. येणाऱ््या पर्यटकांना इतिहास व त्याचे गांभीर्य कळावे या हेतूने ‘आमची वसई’ ने स्मारका बाहेरील भिंतिवर वसईच्या संग्रामाचे चित्र व नरवीर चिमाजी आप्पांची संक्षिप्त माहिती सादर केली आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य व सुराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मराठ्यांकडून व वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी स्वर्गवासी होणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पांच्या जीवनातून बोध घेत युवा पिढीने किल्ल्याचे पावित्र्य राखावे. त्याचप्रमाणे विकासाच्या नावाखाली विनाश तर होत नाही ना? याचे भान ठेऊन आपली संस्कृती, बोलीभाषा, परंपरा, निसर्ग, ऐतिहासिक वास्तू, इत्यादी जतन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन टीम आमची वसईने केले.