शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यात साकारले वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र

By admin | Updated: January 10, 2017 05:49 IST

वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले.

सुनील घरत / पारोळ (ता.वसई)वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले. या मोहिमेत २५ हजार घोडदळ, ४० हजार पायदळ, ४ हजार सुरुंग तज्ज्ञ, ५ हजार उंट, ५० हत्ती होते. वसईला मुक्त, सुखी व समृद्ध करण्यासाठी हाती घेतलेल्या या मोहिमेत मराठ्यांचे जवळपास २२ हजार सैनिक हुतात्मा झाले. वज्राईच्या कृपेने व मराठ्यांच्या पराक्र मामुळे पोर्तुगीज हारले व भगवा जरीपटका वसईच्या जंजिऱ्यावर फडकला. एकाच मातीचे, एकाच रक्ताचे, एकाच संस्कृतीच्या, भाषेच्या हिंदू व धर्मांतरीत ख्रिस्ती बांधवांनी स्वराज्य व सुराज्य लाभल्यामुळे आनंदी होऊन आप्पांना नजराणे समर्पित केले. एकूण एक फिरंगी वसई सोडून गेला. या संग्रामाचे भित्तीचित्र आज वसई किल्ल्यात साकारण्यात आले.वसई मोहिमेतील दगदग व प्रचंड हाल अपेष्टांमुळे एकाच वर्षात वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ रोजी दम्याच्या आजाराने चिमाजी अप्पांचे देहावसान झाले. पौष शु.एकादशीस आप्पांच्या अर्धांगिनी सौ.अन्नपूर्णाबाई सती गेल्या व त्यांचे स्वर्गारोहण झाले, असे पुण्यातील आप्पांच्या समाधीवर नमूद केले आहे.अशा या पराक्र मी, बुद्धिमान, ओजस्वी, कर्तव्यदक्ष, दयाळू व सिहष्णू नरवीर चिमाजी आप्पांची पुण्यतिथी सालाबादाप्रमाणे आमची वसईने चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे ८ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साजरी केली. मशाली व पण त्यांच्या विलोभनीय प्रकाशात, तुतारीच्या गजरात, चिमाजी आप्पांना वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र समर्र्पित करु न आदरांजली वाहण्यात आली.वसई किल्ल्यात अनेक पर्यटक येतात. पण वसई किल्ल्याचे महत्व व इतिहास काय आहे, चिमाजी आप्पा कोण होते, त्यांचे जीवन कसे होते, या संबंधी कुठेही माहिती उपलब्ध होत नाही. येणाऱ््या पर्यटकांना इतिहास व त्याचे गांभीर्य कळावे या हेतूने ‘आमची वसई’ ने स्मारका बाहेरील भिंतिवर वसईच्या संग्रामाचे चित्र व नरवीर चिमाजी आप्पांची संक्षिप्त माहिती सादर केली आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य व सुराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मराठ्यांकडून व वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी स्वर्गवासी होणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पांच्या जीवनातून बोध घेत युवा पिढीने किल्ल्याचे पावित्र्य राखावे. त्याचप्रमाणे विकासाच्या नावाखाली विनाश तर होत नाही ना? याचे भान ठेऊन आपली संस्कृती, बोलीभाषा, परंपरा, निसर्ग, ऐतिहासिक वास्तू, इत्यादी जतन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन टीम आमची वसईने केले.