शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

लेखी आश्वासनामुळे उपोषण मागे

By admin | Updated: November 16, 2016 04:14 IST

तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये चाळीस टक्के पाणी कपात सुरुकेल्यानंतर उद्भवलेली पाणीटंचाई संपुष्टात यावी म्हणून औद्योगिक क्षेत्र परिसरातील

पंकज राऊत / बोईसरतारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये चाळीस टक्के पाणी कपात सुरुकेल्यानंतर उद्भवलेली पाणीटंचाई संपुष्टात यावी म्हणून औद्योगिक क्षेत्र परिसरातील ग्रामपंचायतींनी एम्.आय.डी.सी.च्या कार्यालयासमोर सुरु केलेले साखळी उपोषण एम्.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यांत आले आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रात सध्या कार्यान्वित असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सी.इ.टी.पी.)ची क्षमता पंचवीस एम्.एल.डी. असून तेथे क्षमतेपेक्षा अतिरीक्त येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नवापूर समुद्रात सोडले जात असल्याने मच्छिमारी, शेती व आरोग्याला धोका उद्भवत होता. त्याचप्रमाणे पर्यावरणाची हानी होत असल्याने अखिल भारतीय मांगेला समाजाने राष्ट्रीय हरित लवादाकडे त्याबाबत याचिका दाखल केल्यानंतर या सांडपाण्यामध्ये चाळीस टक्के कपात करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्यानंतर एम्.आय.डी.सी. ने आॅक्टोबरपासून औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात चाळीस टक्के कपात सुरु केली आहे. या पाणीकपातीचा फटका एम्.आय.डी.सी. मधील उद्योगां बरोबरच औद्योगिक क्षेत्र परिसरातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याला बसला होता. पाण्याअभावी नागरीकांना होणारा प्रचंड त्रास व नागरिकांच्या रोषा मुळे यातून मार्ग काढण्याकरीता मंगळवारपासून बोईसर, सरावली, पास्थळ, सालवड, मान, बेटेगाव, खैरापाडा, पाम, कोलवडे व कुंभवली इ. १६ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी साखळी उपोषणास सुरुवात केली होती.त्यानंतर एम्.आय.डी.सी.च्या कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांशी चर्चा करुन ग्रामपंचायतींना पूर्वीसारखा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. काल शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंंपळे यांनीही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधून ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनीही सकारात्मक आश्वासन दिले होते.