शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: February 22, 2017 00:46 IST

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले.

जलयुक्त शिवार अभियान : २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड प्रशांत हेलोंडे   वर्धा सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले. आता २०१६-१७ साठी या अभियानात ‘यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प’ राबविला जात आहे. यंदा २१४ गावांची निवड करण्यात आली असून ३३ गावांतील विविध कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीही आताच गावांची निवड करण्यात येणार आहे. सिंचनासह पिण्यायोग्य पाण्याच्या साठ्यात वाढ करणे, हे उद्दिष्ट यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ मध्ये कृषी विभागाकडून २१३ गावांतील कामे हाती घेण्यात आली होती. यातील २ हजार ९९३ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ४०० कामे प्रलंबित राहिली होती. यातील निधी प्राप्त झाल्यामुळे २०० कामे सुरू झाली आहेत. यात ढाळीचे बांध बाधणे, नाला खोलीकरण आदी कामांचा समावे आहे. शिवाय याच अभियानांतर्गत ‘एरीया ट्रीटमेंट’ची कामेही करण्यात आली. सुमारे ५८ हजार १०७ हेक्टरवर ही कामे करण्यात आलीत. यात पाणी रोखून जमिनीत मुरविले जाते. या पद्धतीमुळे माती वाहून जात नाही. परिणामी, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. गतवर्षी नाला खोलीकरणाची ५२७ कामे झाली. यात ११० किमीपर्यंत सुमारे ९६६० सहस्त्र घनमीटर पाणी साठविण्यात आले आहे. धरणे, प्रकल्प जेथे पोहोचू शकत नाही, अशा गावांची निवड करून हे अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानसाठी निवडलेल्या गावात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे, या उद्देशाने कृषी विभागाकडून कामे केली जात आहेत. जुन्या सिमेंटच्या नाला बांधाच्या ठिकाणी खोलीकरणाच्या कामांना यात प्राधान्य दिले जात आहे. २५३ जुन्या नाला बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यासाठी महात्मा फुले जलभूमी अभियानाचा निधी वापरण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या या कामांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सिंचन क्षेत्रात वाढ झाली. आता २०१६-१७ मध्ये २१४ गावांमध्ये विविध कामे सुरू करण्यात आलीत. यातील यशोदा नदीच्या काठावरील गावांत ३३ कामे सुरू करण्यात येणार आहे. खोलीकरणासह ढाळीचे बांध बांधले जाणार असून मृत जलस्त्रोत जिवंत करण्यात येणार आहे. खोलीकरणाची ३६३ कामे करण्यात येणार असून यासाठी बजाज फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. उगम ते संगम पद्धतीने यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे नदी काठावरील तसेच काही किमी अंतरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. परिणामी, सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानमुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. खरीप तसेच रबी हंगामातील पिकांनाही याद्वारे जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळेच यंदा रबी हंगामातील पीक क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. यावर्षीची कामे पूर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईची समस्याही मार्गी लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.