शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: February 22, 2017 00:46 IST

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले.

जलयुक्त शिवार अभियान : २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड प्रशांत हेलोंडे   वर्धा सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले. आता २०१६-१७ साठी या अभियानात ‘यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प’ राबविला जात आहे. यंदा २१४ गावांची निवड करण्यात आली असून ३३ गावांतील विविध कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीही आताच गावांची निवड करण्यात येणार आहे. सिंचनासह पिण्यायोग्य पाण्याच्या साठ्यात वाढ करणे, हे उद्दिष्ट यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ मध्ये कृषी विभागाकडून २१३ गावांतील कामे हाती घेण्यात आली होती. यातील २ हजार ९९३ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ४०० कामे प्रलंबित राहिली होती. यातील निधी प्राप्त झाल्यामुळे २०० कामे सुरू झाली आहेत. यात ढाळीचे बांध बाधणे, नाला खोलीकरण आदी कामांचा समावे आहे. शिवाय याच अभियानांतर्गत ‘एरीया ट्रीटमेंट’ची कामेही करण्यात आली. सुमारे ५८ हजार १०७ हेक्टरवर ही कामे करण्यात आलीत. यात पाणी रोखून जमिनीत मुरविले जाते. या पद्धतीमुळे माती वाहून जात नाही. परिणामी, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. गतवर्षी नाला खोलीकरणाची ५२७ कामे झाली. यात ११० किमीपर्यंत सुमारे ९६६० सहस्त्र घनमीटर पाणी साठविण्यात आले आहे. धरणे, प्रकल्प जेथे पोहोचू शकत नाही, अशा गावांची निवड करून हे अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानसाठी निवडलेल्या गावात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे, या उद्देशाने कृषी विभागाकडून कामे केली जात आहेत. जुन्या सिमेंटच्या नाला बांधाच्या ठिकाणी खोलीकरणाच्या कामांना यात प्राधान्य दिले जात आहे. २५३ जुन्या नाला बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यासाठी महात्मा फुले जलभूमी अभियानाचा निधी वापरण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या या कामांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सिंचन क्षेत्रात वाढ झाली. आता २०१६-१७ मध्ये २१४ गावांमध्ये विविध कामे सुरू करण्यात आलीत. यातील यशोदा नदीच्या काठावरील गावांत ३३ कामे सुरू करण्यात येणार आहे. खोलीकरणासह ढाळीचे बांध बांधले जाणार असून मृत जलस्त्रोत जिवंत करण्यात येणार आहे. खोलीकरणाची ३६३ कामे करण्यात येणार असून यासाठी बजाज फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. उगम ते संगम पद्धतीने यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे नदी काठावरील तसेच काही किमी अंतरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. परिणामी, सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानमुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. खरीप तसेच रबी हंगामातील पिकांनाही याद्वारे जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळेच यंदा रबी हंगामातील पीक क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. यावर्षीची कामे पूर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईची समस्याही मार्गी लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.