शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

जलजन्य आजाराचे थैमान

By admin | Updated: July 15, 2015 02:31 IST

पावसाने मारलेल्या दडीमुळे एकीकडे शेतपिकांचे नुकसान होत आहे. तर जिल्ह्यात आरोग्य विषयक समस्यांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे.

वातावरणातील बदलामुळे साथरोग बळावले : शासकीय व खासगी रुग्णालये फुल्लश्रेया केने वर्धापावसाने मारलेल्या दडीमुळे एकीकडे शेतपिकांचे नुकसान होत आहे. तर जिल्ह्यात आरोग्य विषयक समस्यांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे. वातावरणातील दमटपणा विषाणूंच्या वाढीस पोषक असल्याने साथरोग बळावत आहे. याचा बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होवून रुग्णालयात येणाऱ्या बालरुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. या वातावरणामळे चिमुकल्यांना सर्दी, खोकला, ताप, उलटी, हगवण या सारख्या आजारांनी ग्रासल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सामान्य रुग्णालयातील बाह्य विभाग व शहरातील खासगी रुग्णालयातील संख्या वाढली आहे. अशात जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना तासणतास रांगेत उभे रहावे लागत आहे. पाऊस गडप झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. हा काळ डासांच्या पैदासीला पोषक असल्याने साथरोग बळावण्याचा धोका उद्भवत आहे. यातच या बदलेल्या वातावरणामुळे विषाणुजन्य आजारांची भर पडत आहे. असलेल्या वातावरणामुळे दिसणारे लक्षण डेंग्युची पहिली पायरी आहे. रुग्णात दिसत असलेली लक्षणे वेळीच आटोक्यात आली नाही तर ती धोक्याची ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दूषित पाण्याने रोगास निमंत्रणसध्या जलस्त्रोतात पाणी नव्याने येते. यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. पाण्याचे शुद्धीकरण होेणे खूपच महत्त्वाचे आहे. विहीर, हातपंपाचे क्लोरिनेशन आवश्यक आहे. जवळपास ७० टक्के आजार हे दूषित पाण्याच्या सेवनाने होतात. लहान मुलांना शक्यतो उकळलेले पाणी पिण्यास द्यावे. दूषित पाण्याच्या सेवनाने डायरिया, कॉलरा, सर्दी असे आजार उद्भवता. अनेकदा पाईपलाईन लिकेज असल्याने शुद्धीकरण केलेले पाणी दूषित हाते. हेच पाणी सेवन केल्यावर आजराला निमंत्रण देणारे ठरते.डासांच्या पैदासीला पोषक वातावरणपावसाळा सुरू असल्यास जमिनीवर पाणी स्थगित होत नाही. पाणी वाहते असल्यास त्यात डासांची पैदास होत नाही. सद्यास्थितीत असलेले वातावरण डासांच्या उत्पत्तीला पोषक असल्याने डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार डोके वर काढतात. डासांच्या उत्पतीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी केले. घरातील कुलरची टाकी नियमित साफ करणे, छतावरील साहित्य ज्यात पाणी साचणार नाही. ते उबडे घालणे, रिकामे टायर, पिंप यात पाणी साचू न देणे, घरातील खिडक्यांना जाळी लावणे, पाण्याच्या टाकीला झाकण बसविणे, परिसराची स्वच्छता, सेप्टीक टँकला जाळी लावणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर हाच यावर बचावात्मक उपाय आहेत. याचा अवलंब केल्यास बऱ्याच अंशी डासांच्या हल्ल्यापासून वाचता येते. जेवण्यापूर्वी हात धुवावे, जवळपास ८० टक्के आजारांना बळी पडण्यापासून वाचता येते. यामुळे लहान मुलांना साबणाने स्वच्छ हात धुण्याची सवय लावावी.जिल्ह्यात असलेले वातावरण डासांना पोषक असल्याचे समोर आले आहे. यात आरोग्य सेवा जिल्ह्यातील रुग्णालयात तीन जणांना डेंग्येची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात मे महिन्यात दोन तर जून महिन्यात एका रुग्णाचा समावेश आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात नोंद झालेल्या तापाच्या ७३ हजार ९३८ रुग्णांच्या रक्तांवी तपासणी करण्यात आली. यातील १३ जणांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. पावसाने दडी मारल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना डायरिया होत असल्याचे समोर आले आहे. यात मे महिन्यात २६४ तर जून महिन्यात ४५० रुग्णांना डायरिया झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन महिन्यात १२ हजार ७३२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात मे व जून या दोन महिन्यात १२ हजार ७३२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात जून मे महिन्यात ६ हजार ४२१ तर जून महिन्यात ६ हजार २६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने जनजागृती सुरू जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोधक महिना म्हणून पाळण्यात येतो. याकाळात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापासून जनजागृती केली जाते. नागरिकांपर्यंत आजारापासून बचाव करण्याचे उपाय यांची माहिती पोहचविणे मुख्य उद्देश आहे.