शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अंगणवाडी परिसरात पाण्याचे डबके

By admin | Updated: August 10, 2015 01:44 IST

कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते.

बालकांचे आरोग्य धोक्यात : माहिती देऊनही ग्रामपंचायतीची डोळेझाकवायगाव (नि.) : कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव हा मुलांवर लवकर होत असतो. त्यामुळे शाळा, अंगणवाडी परिसर स्वच्छ असणे गरजेचे असते. परंतु वायगाव(नि.) येथील वॉर्ड क्र. ८ मधील अंगणवाडी केंद्र क्र. ९३ च्या समोर पूर्र्णत घाण साचली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अंगणवाडीत जवळपास ३० विद्यार्थी आहेत. अंगणवाडी भोवताल सध्या पाण्याचे तळे साचले आहे. तसेच सभोवताल मोठे गवतही वाढले आहे. परिसरातील ग्रामस्थ त्याच कडेला शेणखत टाकत असतात. शेणखत व साचलेले पाणी त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. डासाचा प्रादुर्भावही वाढलेला आहे. अंगणवाडीत येत असलेली बालके ही पाच वर्षांच्या आतील आहेत. सदर बालके या साचलेल्या पाण्याची खेळत असतात. अशावेळी घाण पाण्यातील व गवतातील किडे चावून या बालकांना त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. सोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती आहे. या अंगणवाडी परिसरात साचलेले पाणी, घाण, गवत तसेच शेणाचे ढिगारे स्वच्छ करण्यासंदर्भात येथील अंगणवाडी सेविका शबाना खान व मदतनिस यांनी ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या. मात्र याकडे संबंधितांनी वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका हा वाढला आहे. तसेच ग्राम पंचायतीच्या सौदर्यीकरणाचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राम पंचायतीने विशेष लक्ष देवून हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)परिसरावर अवकळाअंगणवाडी समोरच पाण्याचे डबके साचले आहे. तसेच गवताचे वनही तयार झाले झाले. लहान मुले या पाण्यात व गवतात खेळत असतात. खेळताना पाण्यातील व गवतातील कीडे चावून लहान मुलांना त्वचेचे आजार, तसेच इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. गवतामुळे येथे सरपटणारे प्राणीही वावरतात. याचा मुलांना धोका होऊ शकतो. अंगणवाडी परिसर स्वच्छ आणि सुंदर असणे गरजेचे असतानाही येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरात घाण टाकत असलेल्यांना मज्जाव करून त्याच्यावर कारवाई करावी व साचलेल्या पाणी नालीत प्रवाहित होण्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.