शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

खडकाळ भागात साठवले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:46 IST

यावर्षी अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. ऐन हिवाळ्यात नदी, नाले व तलावही कोरडे पडले आहेत. अशाही स्थितीत आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेऊन जंगलातील खडकाळ भागात पाणी साठवणूक करण्याची किमया साधली. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी सोय झाली आहे.

ठळक मुद्देवनविभागाची दूरदृष्टी : जलयुक्त शिवारमधून मिळाला आधार

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. ऐन हिवाळ्यात नदी, नाले व तलावही कोरडे पडले आहेत. अशाही स्थितीत आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेऊन जंगलातील खडकाळ भागात पाणी साठवणूक करण्याची किमया साधली. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी सोय झाली आहे.आष्टी वनविभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान सन २०१८-१९ मधून प्रती २७ रूपये घनमीटर खोदकाम मधून कठीण भागात नाला खोलीकरण केले. काही भागात कधीही पाणी लागले नव्हते, अशाही ठिकाणी पाणी लागले. या पाण्याला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्याने अनेक भागातील नाल्यामध्ये पाणीसाठा संचयित आहे. येनाडा, पिलापूर, माणीकवाडा, तारासावंगा, किन्ही, मोई, पांढुर्णा, वडाळा, वर्धपूर, झाडगाव, पोरगव्हाण, पंचाळा या भागातील वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय झाली आहे. खडकाळा भागात पाणी लागल्यामुळे खºया अर्थाने जलयुक्त शिवार अभियाना लाभ मिळल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी सिमेंट क्रॉक्रीटचे १४ पाणवठे यापूर्वी तयार केले आहे. त्यामध्ये कृत्रिम पध्दतीने पाणी सोडल्या जाते. याठिकाणी वन्यप्राण्यांनी पाणी पिण्यासाठी नित्याने येजा सुरू केली आहे. जंगलात रोही, बिबट, अस्वल, ससे, हरिण, माकड, रानडुक्कर, मोर यासारखे असंख्य प्राणी वास्तव्य करीत आहे. पूर्वी जंगलप्रदेश जास्त असल्याने वन्यप्राणी शेताकडे येत नव्हे. मात्र काळाच्या ओघात जंगल कमी झाले आहे. त्यातच पाणी उपलब्ध होत नसल्याने ते गावाकडे कूच करीत आहे. शिकारी करणारे सुध्दा याचाच गैरफायदा उचलतात. अशावेळी वनविभागाची ही उपाययोजना दिलासा देणारी ठरत आहे.दुष्काळग्रस्त भागात पाणी पातळी वाढलीजलयुक्त शिवार अभियानमधून अनेक कामांना प्राधान्य देण्यात आले. वनतलाव, सलग समतल चर, गुरे प्रतिबंधीक चर, नाला खोलीकरण यासारखा योजनांना पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील पाण्याची पातळी वाढावी. हा त्यामागचा मुळ उद्देश आहे. राज्य शासनाच्या सर्व योजना चांगल्या आहे. त्याची अंमलबजावणी करणाºया यंत्रणा किती प्रभावी आहे. यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोयपरिसरातील येनाडा, पिलापूर येथील नाला खोलीकरण कामाची पाहणी केली असता तेथे चार महिने पिण्यासाठी पाणी पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. सोबतच नाल्याच्या बाहेर खोदलेल्या लहान नालीमध्येही पाणी असल्याने वन्यप्राणी उन्हाच्या वेळी येथे येवून बसत असल्याची माहिती वनरक्षक इंद्रपाल भगत यांनी दिली आहे. आष्टी वनविभाग गेल्या दोन वर्षापासून विविध उपक्रम राबवून शासनाच्या योजना पुर्णत्वास नेत आहे. त्यामध्ये ही उपाययोजना प्रशंसनीय आहे.वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान मधून २७ रूपये घनमीटरने नाला खोलीकरण काम हाती घेतले. सदर नाल्यांना पाणी लागल्याची उपलब्धी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला.- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).