शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वर्धा पेटले, पारा ४७.५ अंशावर

By admin | Updated: May 20, 2015 02:24 IST

दोन दिवसापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा ४७.५ अंशावर पोहोचला असून पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी करण्यात आली.

वर्धा : दोन दिवसापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा ४७.५ अंशावर पोहोचला असून पाच वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र आज केवळ तापमान हाच चर्चेचा विषय होता. तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर चिटपाखरूही दिसत नव्हते. रस्ते निर्मनुष्य झाल्याने शहरात भर दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचा भास होत होता.गत काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे ४४ पर्यंत पोहोचलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे नागरिक काहीसे सुखावले होते. परंतु सोमवारपासून पुन्हा सूर्याने आग ओकायला सुरुवात करीत पारा ४५.२ अंशावर पोहोचला होता. परंतु मंगळवारी यावरही कडी करीत पारा तब्बल ४७.५ अंशावर पोहोचला. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. आणखी काही दिवस ही उष्णलाट कायम राहील असे सांगण्यात येत आहे. मे हिटचा तडाखा सध्या सुरू झाला आहे. या महिन्यात सरासरी ४० ते ४२ पर्यंत तापमान असते. परंतु मंगळवारी पारा ४७ वर गेल्याने सर्वत्र उन्हाचा दाहकता वाढली होती. तापमान ४० च्या वर गेल्यास शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होत असते. त्यामुळे घरून निघताना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच डोक्याला व कानाला गुंडाळल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्लाही दिला जात आहे. कितीही तापमान वाढले तरी आवश्यक ती कामे करावीच लागतात. यासाठी घराबाहेर पडावेच लागते. मात्र या उष्ण लाटेने अनेकजण आजची कामे टाळताना दिसली. त्यामुळे दिवसभर वर्दळ राहात असलेल्या शहरातील मुख्य मार्गासह गल्लीबोळातही शुकशुकाट होता. लग्नसराईची धावपळ सुरू असतानाही मार्केट परिसरात विशेष गर्दी जाणवत नव्हती. या उष्णतेत कुलरचाही परिणाम जाणवत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. यंदाची ही उष्ण लाट नागरिकांना बेजार करुन गेली. सायंकाळी ७ वाजतानंतर अनेकजण घराबाहेर पडले.(शहर प्रतिनिधी) अनेकांचे वेळापत्रक कोलमडलेसर्वांचेच आयुष्य गातिमान झाले आहे. त्यामुळे उन्ह, वारा पावसातही कामे ही करावीच लागतात. परंतु वाढलेला पारा या सर्वांवर हावी झाला आहे. त्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले असून अनेक जण शक्य होईल ती कामे दिवसाच आटोपून भर उन्हात घराच्या बाहेर पडण्याचे टाळत आहे. त्यामुळे नेहमीचे वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. महिला वर्गही दुपारची खरेदी टाळून ती सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची दाहाकता कमी झाल्यावर करण्याचा प्राध्यान्य देत आहे. आणखी काही दिवस असेच वेळापत्रक राहील असे दिसून येत आहे. या दिवसांत हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु उन्हामुळे भाज्याही लवकर खराब होत आहेत. सकाळची हिरवी भाजी सायंकाळपर्यंत टिकवून ठेवणे भाजी विक्रेत्यांसाठी जिकरीचे झाले आहे. त्यामुळे सतत पाण्याचा मारा करून किंवा ओल्या पोत्यांमध्ये भाज्या ठेवून त्या जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दिवसांत तरबूज, आंबा, संत्री द्राक्ष अशी फळे खाण्यावर भर दिला जातो. परंतु उन्हामुळे या फळांचे वजन दिवसागणिक कमी होत जाते. बरेचदा फळे खराबही होतात. त्यामुळे विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत आहे. गव्हाला ऊन्ह फायद्याचे वाढते ऊन्ह सर्वांसाठीच त्रासदायक ठरत असले तरी काही बाबतीत ते फायद्याचेही ठरत आहे. याच दिवसाच वर्षभराचा गहू घेऊन तो स्वच्छ करून कोठ्यांमध्ये भरून ठेवला जातो. गहू वर्षभर टिकण्यासाठी त्याला भरपूर उन्ह देणे गरजेचे असते. कारण थोडासाठी ओलावा आल्यास गहू सडतो. सध्या गव्हाची वाळवण सुरू आहे. ४५ अंशावर पारा चढल्याने गव्हाला चांगली उन्ह मिळत आहे. परिणामी हा गहू वर्र्षभर चांगल्या प्रकारे टिकणार अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करीत आहे.