शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

१६ हजार कृषी पंपधारकांना वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 27, 2014 23:45 IST

केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी बांधून दिल्या; पण त्या विहिरींवर वीज पुरवठा गत अडीच वर्षांपासून देण्यात आला नाही़ यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.

अमोल सोटे - आष्टी (श़)केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांतून शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी बांधून दिल्या; पण त्या विहिरींवर वीज पुरवठा गत अडीच वर्षांपासून देण्यात आला नाही़ यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. केवळ आर्वी विभागातील १६ हजार ७६२ शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे़विद्युत वितरण कंपनीचे आर्वी विभागीय कार्यालय असून आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा व पुलगाव, हे पाच उपविभाग आहे. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्याने तालुकानिहाय प्रत्येकी १ हजार सिंचन शासनाने विहिरी बांधून दिल्या. सधन शेतकऱ्यांनी स्वत: विहिरीचे बांधकाम केले. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. अधीक्षक अभियंता वर्धा व कार्यकारी अभियंता आर्वी यांनी शेतीपंप जोडणीसाठी निविदा मागविल्या़ एप्रिल २०१२ मध्ये हे काम रूद्राणी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले़ कंपनीने त्वरित काम सुरू करावे म्हणून वर्क आॅर्डर देण्यात आला; पण जाणीवपुर्वक अद्याप काम सुरू करण्यात आले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. खरीप हंगामात वेळेवर पाऊस नसल्याने पिके बुडाली़ सिंचनाला पर्याय म्हणून विहीर आहे; पण वीज पुरवठा नसल्याने त्या शोभेच्या ठरल्यात़ यावर्षी दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या. पिकांना उन्हाचा तडाखा बसल्याने पिके भुईसपाट झाली. कर्जबाजारी शेतकरी आणखी संकटात सापडला़ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होताना दिसते़ या प्रकारामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले़ यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देत त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी, अशी मागणी होत आहे़