शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

शासकीय इमारतींना ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा

By admin | Updated: April 21, 2016 02:33 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहराचा व तालुक्याचा विकास होत असल्याचा गवगवा केला जात आहे.

घोराड : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहराचा व तालुक्याचा विकास होत असल्याचा गवगवा केला जात आहे. पण तीन वर्षांपासून सेलू येथील तहसील व आरोग्य विभागाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. क्रीडा संकुलाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात आहे. तर तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या जीर्ण इमारतीला अच्छे दिनची प्रतीक्षा कायम आहे.सेलू गावाला नगराचा दर्जा देत नगर पंचायत अस्तित्वात आली. पण अद्याप ग्रामपंचायतच्या इमारतीतूनच कारभार पहावा लागत आहे. सभापतींना वेगळा कक्ष नाही. सभेसाठी वेगळा हॉल नाही. त्यामुळे नगर पंचायतीची नवीन इमारत कधी होणार याकडे सेलू वासीयांचे लक्ष लागले आहे. जुन्याच इमारतीला नवे नाव नवे रूप देण्यात आले. ज्या खुर्चीवर सरपंच-उपसरपंचाचा नामफलक होता तिथे अध्यक्ष व उपाध्यक्ष हा बदल करण्यात आला. गत पाच वर्षाअगोदर क्रीडा संकुलाची इमारत बांधून पूर्ण झाली. ही इमारत तालुका क्रीडा अधिकारी आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोट्यवधी रूपयांची जागा मैदानासाठी राखीव आहे. असे असले तरी या क्रीडासंकुलातून खेळाडूंना मार्गदर्शन तर दुरच पण या संकुलाचे उद्घाटन होऊन खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी हे मैदान खुले कधी होणार हा संशोधनाचा विषय आहे. क्रीडा संकुल केव्हा सुरू होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. परिणामी सुसज्ज इमारत आज शोभेची वास्तू म्हणून उभी असून तिची दुरवस्था व्हायला वेळ लागणार नाही असे बोलल्या जात आहे. गत तीन वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे व नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. किरायाच्या इमारतीतून तीन वर्षांपासून तहसील कार्यालयाचा कारभार चालत आहे. पण बांधकामाच्या गती अतिशय मंद असल्याचे दिसत आहे. कंत्राटदारावर कारवाई होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याचे बोलल्या जात आहे. दोन्ही इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाही बांधकाम विभाग ठोस पावले का उचलत नाही हे देखील न उलगडणारे कोडेच आहे. त्याचप्रमाणे गत दोन वर्षापासून पंचायत समिती कार्यालयाची इमारत छतावर ताडपत्रीचे पांघरूण घेवून जीर्णावस्थेत उभी आहे. कवेलूही अद्याप बदलविलेले नाही. पण अशाही स्थितीत इमारतीत नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. गोदामासाठी इमारत किरायाणे घ्यावी लागली आहे. जिर्णावस्थेत असलेल्या खोल्यामधून एकात्मिक बाल विकास, शिक्षण, पशुधन आदी कार्यालयांचे कामकाज चालते.तसेच तालुका कृषी विभागाला स्वतंत्र मालकीची इमारत नाही. कृषी अन्वेषण विभागाच्या जागेतच फलोद्यान, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांंची कार्यालय आहेत. या इमारतीकडे पाहिल्यानंतर कृषी क्षेत्राचा विकास दृष्टीक्षेपात येतो. येथील कृषी साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामाची दुरवस्था पाहिल्यानंतर तालुक्यातल्या शासकीय इमारतीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी शासन निधी देतील का हा ही प्रश्न कायम आहे.तालुक्यात आजतागायत शेतीच्या बांधापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही. कृषी प्रक्रिया उद्योग उभा राहिला नाही. औद्योगिक वसाहत दिवास्वप्न ठरत आहे.(वार्ताहर)