शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

शेतकऱ्याला नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By admin | Updated: February 19, 2015 01:28 IST

वादळ वाऱ्यामुळे शेतातील विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या व एक बोकड मरण पावला होता. या घटनेला जवळपास तीन वर्षाचा लोटला...

कारंजा (घा.) : वादळ वाऱ्यामुळे शेतातील विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या व एक बोकड मरण पावला होता. या घटनेला जवळपास तीन वर्षाचा लोटला तरीही विद्युत वितरण कंपनीकडून पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. शेतकऱ्याने याकरिता आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती. यानंतर नुकसान भरपाईचा दावा विद्युत वितरण कंपनी कारंजा येथे सादर केला. मात्र शेतकऱ्याच्या मदतीकरिता कार्यालयात मारलेल्या हेलपाटा व्यर्थ ठरत आहे. शेतकऱ्याला न्यायाची प्रतीक्षा आहे.तालुक्यातील बिहाडी शिवारात दि. १२ सप्टेंबर २०१२ ला सदर घटना घडली. अशोक वामन पाटील हे नुकसानधारक शेतकरी आहे. शेतधुऱ्यावर बकऱ्या चरत असताना वादळामुळे ३ फेज ४ वायर लघुदाब वाहिनीचा आर फेज व न्युट्रल कंडक्टर तुटला. हा वायर झुडुपावर पडला. पुरेसे भूसंपर्क न मिळाल्यामुळे वायर विद्युत भारीतच राहीला. या वायरचा स्पर्श झाल्यामुळे दोन बकऱ्या व एक बोकड असे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले. याप्रकरणी भा.वि.नि. अंतर्गत नोंद करण्यात आली. या अपघातात भारतीय वीज अधिनियम २००३ च्या कलमाचे उल्लघंन झाले असून अपघातासाठी विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल विद्युत निरीक्षक यांनी तयार केला. अहवालात हा मुद्दा स्पष्ट नमूद केला असताना नुकसान भरपाई नाकारण्यात येत आहे. याशिवाय सरकारी पशुवैद्यकीय रूग्णालयाचा पोस्टमार्टम अहवाल मृत्यू दाव्यासोबत जोडलेला असून, बकऱ्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत पावल्याचा उल्लेख केला आहे. शेतकरी पाटील यांनी सर्व कागदपत्रासह वेळोवेळी मृत्य नुकसानीचा दावा सादर केला आहे. मात्र मदत मिळाली नाही.विद्युत अभियंताने या प्रकरणाबाबत बेपरवाही दाखविली. घटनेनंतर तातडीने पोलीस पंचनामा केला नाही. शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याचा दावा केला असता भरपाई नाकारली जात आहे. याप्रकरणात चोर सोडून संन्याशाचा बळी असाच हा प्रकार दिसत आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या इशारा शेतकऱ्याने दिला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले असून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. कार्यवाहीकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)