शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्याला नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By admin | Updated: February 19, 2015 01:28 IST

वादळ वाऱ्यामुळे शेतातील विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या व एक बोकड मरण पावला होता. या घटनेला जवळपास तीन वर्षाचा लोटला...

कारंजा (घा.) : वादळ वाऱ्यामुळे शेतातील विद्युत तार तुटल्याने शेतकऱ्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या व एक बोकड मरण पावला होता. या घटनेला जवळपास तीन वर्षाचा लोटला तरीही विद्युत वितरण कंपनीकडून पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. शेतकऱ्याने याकरिता आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती. यानंतर नुकसान भरपाईचा दावा विद्युत वितरण कंपनी कारंजा येथे सादर केला. मात्र शेतकऱ्याच्या मदतीकरिता कार्यालयात मारलेल्या हेलपाटा व्यर्थ ठरत आहे. शेतकऱ्याला न्यायाची प्रतीक्षा आहे.तालुक्यातील बिहाडी शिवारात दि. १२ सप्टेंबर २०१२ ला सदर घटना घडली. अशोक वामन पाटील हे नुकसानधारक शेतकरी आहे. शेतधुऱ्यावर बकऱ्या चरत असताना वादळामुळे ३ फेज ४ वायर लघुदाब वाहिनीचा आर फेज व न्युट्रल कंडक्टर तुटला. हा वायर झुडुपावर पडला. पुरेसे भूसंपर्क न मिळाल्यामुळे वायर विद्युत भारीतच राहीला. या वायरचा स्पर्श झाल्यामुळे दोन बकऱ्या व एक बोकड असे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले. याप्रकरणी भा.वि.नि. अंतर्गत नोंद करण्यात आली. या अपघातात भारतीय वीज अधिनियम २००३ च्या कलमाचे उल्लघंन झाले असून अपघातासाठी विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल विद्युत निरीक्षक यांनी तयार केला. अहवालात हा मुद्दा स्पष्ट नमूद केला असताना नुकसान भरपाई नाकारण्यात येत आहे. याशिवाय सरकारी पशुवैद्यकीय रूग्णालयाचा पोस्टमार्टम अहवाल मृत्यू दाव्यासोबत जोडलेला असून, बकऱ्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत पावल्याचा उल्लेख केला आहे. शेतकरी पाटील यांनी सर्व कागदपत्रासह वेळोवेळी मृत्य नुकसानीचा दावा सादर केला आहे. मात्र मदत मिळाली नाही.विद्युत अभियंताने या प्रकरणाबाबत बेपरवाही दाखविली. घटनेनंतर तातडीने पोलीस पंचनामा केला नाही. शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्याचा दावा केला असता भरपाई नाकारली जात आहे. याप्रकरणात चोर सोडून संन्याशाचा बळी असाच हा प्रकार दिसत आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या इशारा शेतकऱ्याने दिला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित विभागाला दिले असून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. कार्यवाहीकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)