शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मजुरीचे दर कडाडल्याने बळीराजा झाला हवालदिल

By admin | Updated: July 31, 2016 00:43 IST

पावसाने उघाड दिल्याने ठप्प झालेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहे.

आर्थिक भुर्दंड : पावसाआधी शेतातील तण काढणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची लगबग वर्धा : पावसाने उघाड दिल्याने ठप्प झालेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहे. पिकांमध्ये वाढलेले तण शेतकऱ्यांकरिता मनस्तापाचे कारण असताना निंदनाच्या खर्चाचा मोठा भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मजुरीचे दरच कडाडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मृग नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व लगेच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटास सामोरे जावे लागले. बसलेला पहिला आर्थिक फटका सहन करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. ती पेरणी साधली. पीक उगवले व मशागतीस प्रारंभ झाला. याच दरम्यान सलग आठवडाभर पावसाने हजेरी ठेवली. हा पाऊस पिकांसह वाढलेल्या तणालाही पोषकच ठरला. पिकांपेक्षा तण अधिक झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली व पाऊस थांबण्याची प्रतीक्षा सुरू झाली. ,मध्यंतरी पावसाने केवळ दोन दिवस विश्रांती घेतली. त्या काळात काही शेतकऱ्यांना डवरणाची कामे करता आली. तर इतरांना शेतातील पाणी बाहेर काढता आले. ज्यांना काहीच शक्य झाले नाही. त्यांच्या शेतातील पीक परिस्थिती विदारक आहे. रोज येणाऱ्या पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण केला आहे. त्याचा परिणाम पिकांवर होऊन सोयाबीनसह कपाशीचे पीक पिवळे पडले आहे. पावसाने थोडी उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी आता निंदनाच्या कामाला प्रारंभ केला आहे. पण १०० ते १२० रुपये असलेला महिला मजुराचा रोज आता १५० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही मजुरांना शेतापर्यंत घेऊन येणाऱ्या वाहनांचे भाडेही शेतकऱ्यांनाच द्यावे लागत आहे. मजूर पैशाकरिता थांबत नाही. फवारणीसाठी असलेल्या मजुरांचे दरही वाढले आहे. उघाड असेपर्यंत निंदण वा डवरण आणि खते देण्याचे कआम आटोपणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मजुरीचे दर कडाडूनही शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसत अआंतरमशागतीची कामे आटिपावी लागत आहे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे व अतिप्रमाणात वाढलेल्या रानवनस्पतीमुळे निंदनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच वेळीअवेळी पावसाला सुरुवात झाल्यास कामात व्यत्यय येतो व नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.(तालुका प्रतिनिधी) आंतर मशागतीसाठी मजुरांची चणचण आर्वी- पावसाने उघाड दिल्यामुळे आर्वी परिसरात निंदण, डवरणी, फवारणी यासह पिकांना खत देण्याच्या कामांना वेग आला आहे; परंतु शेतातील कामे करण्यासाठी मजुरवर्गच मिळेनासा झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे अधिक पैसे देवून मजुरांकडून कामे करून घ्यावी लागत आहे. दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप थांबली आहे. या काळात होईल तेवढी आंतरमशागत करणे गरजेचे आहे. शेतातील तण पुर्णपणे नाहिसे करणेही आवश्यक झाले आहे. लगेच पाऊस आल्यास पुन्हा तण वाढयाला सुरुवात होणार आहे. यामुळे तण काढून टाकणे आवश्यक आहे. सोबतच रोगांचा प्रादुर्भाव होवू नये याची आताच खबरदारी घेत फवारणी करणेही गरजेचे झाले आहे. पण यासर्व कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे.(शहर प्रतिनिधी)