शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

गावांची ओळख झाली कठीण

By admin | Updated: February 20, 2015 01:36 IST

गावाची ओळख व्हावी याकरिता गावाजवळ त्याच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. ही फलके प्रारंभीच्या काळात सर्वांच्या नजरेत पडत असले तरी त्यांची ओळख पुसली आहे.

वर्धा : गावाची ओळख व्हावी याकरिता गावाजवळ त्याच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. ही फलके प्रारंभीच्या काळात सर्वांच्या नजरेत पडत असले तरी त्यांची ओळख पुसली आहे. यामुळे वायगाव (निपाणी) ते राळेगाव मार्गावरील गाव ओळखणे कठीण होत आहे. रस्त्यांची कामे करताना गावा जवळ पुढे गाव आहे, अथवा गावाच्या नावाचे फलक लावण्यात आली होती. सोबतच वळण रस्त्यांवरही गावाला जाणाऱ्या रस्त्यांची माहिती देणारी फलके लावण्यात आली होती. या फलकांवरून गाव असल्याची व कोणते गाव कोणत्या मार्गावर आहे याची माहिती मिळत होती. मात्र गत काही दिवसांपासून या फलकांवरील नावे मिटल्याचे दिसून येत आहे. शिवाय काही गावाच्या फलकांवर बियाणे कंपनीची जाहिरात पत्रके लावण्यात आली आहे. यामुळे गावाची नावेही बदलली आहेत. याचा त्रास रस्त्याने जाणाऱ्या नवख्या प्रवाशांना होत आहे. त्यांना हा मार्ग कोणत्या गावाला जातो, हे सांगण्याकरिता कोणी रस्त्यावर राहत नसल्याने अनेकांना रस्ता चुकल्याचे समोर आले आहे. शासनाने रस्ते विकास करताना या रस्त्याच्या कडेला फलक लावले होते. याचा उद्देश मात्र आज हरविल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. काही ठिकाणी ही फलके रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपात हरविली आहे. ती पाहण्याकरिता रस्त्याच्या कडेला शोध घेण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना माहिती देण्याकरिता आवश्यक असलेली ही फलके वाटसरूंना माहिती देण्याकरिता कुचकाही ठरत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व रस्ते विकास महामंळाने ही फलके शोधून त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शिवाय काही ठिकाणची फलके तुटलीही आहेत. गावाची ओळख देणाऱ्या व गावाच्या किलोमिटरची ओळख देणाऱ्या या फलकांवर मिटलेली गावाची नावे दुरूस्त करून त्यावचर जाहिरातींची पत्रके चिपकविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)