शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

औषधीयुक्त बेल वृक्ष ठरतोय शेतकऱ्यांकरिता उपयुक्त

By admin | Updated: October 25, 2014 01:41 IST

रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वर्धा : रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेलाच्या झाडाचे फळ विविध औषधींसाठी उपयुक्त ठरते. बहुपयोगी असणारे बेलाचे झाड शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही सिद्ध होत आहे. या फळाच्या माध्यमातून शेतीला जोडधंदा मिळाला आहे. फळावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादन तयार केले जात आहे.धार्मिकदृष्ट्या महादेवाला प्रिय बेलपत्र तसेच हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या व भगवान शिवरूप समजल्या जाणाऱ्या बेल वृक्षाला उन्हाळ्यात बहार येत असल्याने हिवाळ्याच्या दिवसात त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसात फळे लागत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर या वृक्षाची लागवड केली आहे. झाडाच्या फळे व पानापासून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत सुरू झाले आहेत. काहींनी हा अभिनव उपक्रम आपल्या शेतात सुरू केला आहे. बेलवृक्षाचे शास्त्रीय नाव एगल मामालोस असून सदाफळ, शाण्डिलु (पीडानिवारक) म्हणून ते ओळखल्या जाते. या फळाचे सरबत, मुरंबा व औषधीयुक्त सामर्थ्य यात आहे. वातशामक व पाचन क्रियेसाठी त्याचा उपयोग केला जातो. तर श्रावण महिन्यात घरोघरी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रे वाहण्याची प्रथा आहे. मंदिर परिसरात हा वृक्ष आढळून येतो. शेतीच्या बांधावर हे वृक्ष लावणेही शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत आहे. विशेषत: काटेरी वृक्ष असल्याने माकड वगैरे या वृक्षापासून लांब राहतात. श्रावण महिन्यात बेलपानाची मागणी लक्षात घेता ते आर्थिक स्त्रोत होऊ शकते. तसेच त्याच्या फळातील गरापासून होणारा मुरब्बा व सरबत केल्यास शेतकऱ्यांसाठी जोडधंदादेखील होऊ शकते. अशा औषधीयुक्त गुणांमुळे यातून परमार्थही साधणे शक्य आहे. (शहर प्रतिनिधी)