शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

औषधीयुक्त बेल वृक्ष ठरतोय शेतकऱ्यांकरिता उपयुक्त

By admin | Updated: October 25, 2014 01:41 IST

रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वर्धा : रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेलाच्या झाडाचे फळ विविध औषधींसाठी उपयुक्त ठरते. बहुपयोगी असणारे बेलाचे झाड शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही सिद्ध होत आहे. या फळाच्या माध्यमातून शेतीला जोडधंदा मिळाला आहे. फळावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादन तयार केले जात आहे.धार्मिकदृष्ट्या महादेवाला प्रिय बेलपत्र तसेच हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या व भगवान शिवरूप समजल्या जाणाऱ्या बेल वृक्षाला उन्हाळ्यात बहार येत असल्याने हिवाळ्याच्या दिवसात त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसात फळे लागत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर या वृक्षाची लागवड केली आहे. झाडाच्या फळे व पानापासून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत सुरू झाले आहेत. काहींनी हा अभिनव उपक्रम आपल्या शेतात सुरू केला आहे. बेलवृक्षाचे शास्त्रीय नाव एगल मामालोस असून सदाफळ, शाण्डिलु (पीडानिवारक) म्हणून ते ओळखल्या जाते. या फळाचे सरबत, मुरंबा व औषधीयुक्त सामर्थ्य यात आहे. वातशामक व पाचन क्रियेसाठी त्याचा उपयोग केला जातो. तर श्रावण महिन्यात घरोघरी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रे वाहण्याची प्रथा आहे. मंदिर परिसरात हा वृक्ष आढळून येतो. शेतीच्या बांधावर हे वृक्ष लावणेही शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत आहे. विशेषत: काटेरी वृक्ष असल्याने माकड वगैरे या वृक्षापासून लांब राहतात. श्रावण महिन्यात बेलपानाची मागणी लक्षात घेता ते आर्थिक स्त्रोत होऊ शकते. तसेच त्याच्या फळातील गरापासून होणारा मुरब्बा व सरबत केल्यास शेतकऱ्यांसाठी जोडधंदादेखील होऊ शकते. अशा औषधीयुक्त गुणांमुळे यातून परमार्थही साधणे शक्य आहे. (शहर प्रतिनिधी)