शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

बाजार समितीत सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र नाही

By admin | Updated: October 29, 2016 00:53 IST

दिवाळसण साजरा करण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात निघालेले सोयाबीन वाहनात भरून थेट बाजारात आणण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची लूट सुरूच : गरज नसताना मूग उडिदाचे खरेदी केंद्र; बाजारात आलेल्या सोयाबीनला हमीभावाचीही शाश्वती नाही रूपेश खैरी  वर्धा दिवाळसण साजरा करण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात निघालेले सोयाबीन वाहनात भरून थेट बाजारात आणण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली असून हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी होत आहे. असे असताना जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीन खरेदीचे एकही शासकीय केंद्र सुरू झाले नाही. यामुळे शासनच शेतकऱ्यांची लूट करीत असल्याची ओरड होत आहे. या उलट बाजारात येत नसलेल्या मुंग व उडीद खरेदीकरिता केंद्र सुरू झाले आहे. ज्या कृषी मालाची बाजारात आवक नाही, त्या वणाच्या खरेदीकरिता शासनाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर दिवसभर शासनाचा कर्मचारी बसून राहतो; मात्र त्याला एक दाणाही मिळत नाही; मात्र गरज असताना शासनाच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात आले नाही. एकीकडे सोयाबीनची वाढती आवक व दुसरीकडे आवक नसलेल्या शेतमालाची खरेदी करण्याकरिता असलेले केंद्र, हा विरोधाभास शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची आठवण देणारा ठरत आहे. यातच गत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी हमीदरापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी करू नये असे फर्माण काढले. बाजारात सध्या होत असलेली खरेदी व्यापाऱ्यांकडून होत असल्याने त्यांच्याकडून या फर्माणाकडे दुर्लक्ष होणे सहाजिकच आहे. दिवाळीसण दिवसावर आला आहे. यामुळे रात्रभर बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक सुरू आहे. यात सोयाबीन विकून मुला-बाळांना कपडे व घरी काही साहित्य नेण्याच्या इराद्याने शेतकरी बाजारात सोयाबीन आणतो; मात्र येथे त्याच्या लुटीमुळे या दोनपैकी एकच इच्छा पूर्ण करणे शक्य होत आहे. यामुळे निदान हमीभावाकरिता शासकीय खरेदीचे केंद्राची गरज आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच असलेला दर पडणे नित्याचेच झाले. यातच यंदा सोयाबीनचे उत्पन्न वाढणार असल्याचे संकेत आहे. यामुळे बाजारात आवक वाढत आहे. असे असले तरी यंदाची आवक आजच्या घडीला गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामात गुरुवारपर्यंत २४ हजार क्विंटलची आवक झाली होती. गतवर्षी म्हणजेचे आॅक्टोबर २०१५ मध्ये २९ हजार ८७ क्विंटल सोयाबीन बाजारात आले होते. ही आवक यंदा वाढण्याचे संकेत आहेत. गतवर्षी मिळाला होता ३,७९० रुपयांचा दर गत वर्षी सोयाबीनचे उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. यंदा मात्र हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना अत्यल्प दरात सोयाबीन विकावे लागत असल्याचे चित्र आहे. सन २०१५ च्या खरीप हंगामात ३ हजार ७९० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला होता. तर यदांच्या हंगामात सरासरी २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.