शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यापेक्षा दृष्टिकोन बदलण्याची गरज

By admin | Updated: October 22, 2014 23:22 IST

शासनव्यवस्थेत जितके जास्त कायदे असतील, तितके ते दुर्बलांना जाचक ठरण्याची आणि बलवानांना सशक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शासनप्रणाली प्रभावी करण्यासाठी

चांदेकर : धर्म आणि राजनीती विषयावर प्रवचन कार्यक्रमवर्धा : शासनव्यवस्थेत जितके जास्त कायदे असतील, तितके ते दुर्बलांना जाचक ठरण्याची आणि बलवानांना सशक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, शासनप्रणाली प्रभावी करण्यासाठी नवनवीन कायदे करण्यापेक्षा शासक आणि प्रशासकांचा दृष्टिकोण बदलण्याची गरज आहे. शासनप्रणाली कोणतीही असो, त्या प्रणालीचे यशापयश प्रणाली कार्यान्वित करणाऱ्या नेतृत्वाच्या दृष्टीवर अवलंबून असते, हे राजनीतीचे मर्म जाणून घेण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पुण्याचे डॉ. शं. भा. चांदेकर यांनी केले. सावंगी (मेघे) येथील साई मंदिर वार्षिकोत्सवात आयोजित ‘धर्म आणि राजनीती’ या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते. ते म्हणाले, प्राचीन परंपरेत न राज्य होते, न राजा होता. समूहाने स्वीकारलेल्या धर्मप्रणालीनुसार व्यवहार होत असत. काळाच्या गरजेनुसार राज्य, महाराज्य, साम्राज्य, स्वराज्य, भौज्य, सामंतपर्यायी, एकराज्य, गणतंत्र आदी राज्यशासन पद्धती निर्माण झाल्या. मात्र विश्वरूपाची संकल्पना लोप पावल्यामुळे राजा आणि प्रजा असे द्वैत निर्माण आले. आज एकाधिकारशाही आणि लोकशाही या दोनच शासनप्रणाली असून केवळ माझ्या राष्ट्राने जगावे, महासत्ता बनावे, हा संकुचित विचार बळावतो आहे. ‘हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा’ ही शिवरायांसारखी व्यापक दृष्टी लोप पावत चालली आहे. जगातील सर्व राष्ट्रांनी सुखसमाधानाने जगावे, या लोककल्याणकारी दृष्टिकोणाची आज खरी गरज आहे, असेही डॉ. चांदेकर म्हणाले.वार्षिकोत्सवात पहिल्या दिवशी डॉ. चांदेकर यांचे ‘श्रद्धा, अंधश्रद्धा ही विज्ञाननिष्ठा या विषयावर प्रवचन झाले. वैज्ञानिक दृष्टिकोणापेक्षाही विज्ञाननिष्ठा ही महत्वाची आहे. कारण, विज्ञाननिष्ठेत वैज्ञानिक दृष्टिकोण तर आहेच, त्यासोबत मानवी सहृदयता आणि विश्वात्मक संवेदनाही आहेत. धर्मोपदेशक, राज्यकर्ते, शास्त्रज्ञ, समाज सुधारक यांनी ही विज्ञाननिष्ठा अंगिकारली पाहिजे. मुळात भारतीय संस्कृती विज्ञाननिष्ठ होती. कालांतराने पोटार्थी समाजाने यज्ञयाग, कर्मकांड, व्रतवैकल्ये, चातुर्वर्ण्य व्यवस्था, भेदाभेद यात ही विज्ञाननिष्ठा लुप्त केली. ज्यांनी धर्मप्रबोधन करायचे ते अन्यायाचे, शोषणाचे, विषमतेचे समर्थक बनले. याला छेद देण्याचे काम ज्ञानेश्वर, नामदेवांपासून तुकारामांपर्यंतच्या संतपरंपरेने केले. विज्ञाननिष्ठा रूजविताना संतपरंपरेचा मार्ग अवलंबणे, काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक इंगळे यांनी केले.(शहर प्रतिनिधी)