शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तळेगाव-आर्वी मार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने वळविण्यात आली होती.

ठळक मुद्देअर्धवट रस्त्यामुळे अडचण : नागरिकांचा जीव मुठीत सुरू आहे प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव(श्या.पंत) : तळेगाव ते आर्वी मार्गाने प्रवास करणे सध्या नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून अपूर्ण रस्ता खोदकामामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने वळविण्यात आली होती. पण, रस्ता बांधकाम आणि पुलाचे काम अर्धवट सोडल्याने प्रवासादरम्यान वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.वर्षभरात अनेक दुचाकींसह चारचाकींचे अपघात झाले आहे, अनेकांचे हात-पाय मोडून गंभीर दुखापत झाली आहे.पावसाळा सुरू होणार असून जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यासह पुलाचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात चिखल होत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलाच्या बाजूने काढलेल्या वळण रस्त्यावर कोणतेही सूचना फलक व दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकास अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे वाहतुकीचे प्रमाण कमी आहे. पण, लॉकडाऊन होण्यापूर्वीच रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले आहे. तळेगाव-आर्वी मार्गाचे बांधकाम रखडले असून जीव जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.रस्ता देखभालीसाठी वीस हजार प्रति किलोमीटर प्रमाणे कंत्राटदाराला शासनाकडून निधी मिळतो. मात्र, थातुरमातूर कामे दाखवून शासनाला चूना लावण्याचा प्रकार सुरू आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने यावर कार्यकारी अभियंता नागपूर यांचे नियंत्रण आहे. मात्र, त्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात मात्र, हा रस्ता आवागमण करणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनणार असल्याने तत्काळ रस्ता काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.देवळी ते दहेगाव रस्त्याच्या केवळ दुरुस्तीची मंजुरी मिळाली होती. त्यामुळे खराब रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले असून उर्वरित रस्त्यावरील खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली. पून्हा निधी उपलब्ध झाल्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात येईल.- इंद्रकुमार पेठणकर, उपअभियंता, सा.बां.वि.,देवळी.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा