शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:47 IST

ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.

ठळक मुद्देहेमनाथ राव : सेवाग्राम येथील शांती भवनातील प्रशिक्षणाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.नयी तालिम समिती अंतर्गातील आनंदनिकेतन विद्यालयाद्वारे चंपारण जिल्ह्यातील बितीहर्ता केंद्राच्या शिक्षकांसाठी शांतीभवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हेमनाथ राव म्हणाले, पूर्ण वातानुकूलित व अत्याधुनिक व्यवस्था असल्याशिवाय कुठलेही प्रशिक्षण चांगल्यारितीने पार पडत नाही, असा समज या ठिकाणी खोटा ठरला आहे. मातीच्या भिंती, कवेलूचे छत अशा इमारतीमध्ये खडू, फळा व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज करता येईल, अशा उत्पादक कामातून उत्तम शिक्षण दिले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर मानवीय गुणांची उत्तमरीत्या रूजवण केली जाऊ शकते, हे प्रशिक्षणातून सहजपणे जाणवले. बिहार राज्यात ३५० नयी तालिमची विद्यालये होती. तेथे नयी तालिम पुनर्जीवित करण्याचा बिहार सरकारचा प्रयत्न असल्याचे राव यांनी सांगितले.नयी तालिम समितीचे मंत्री प्रा.प्रदीप दासगुप्ता यांनीही विचार व्यक्त केले. प्रशिक्षणात सहभागींंना प्रगत शिक्षण संस्था फलटणच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबाळकर यांनी बागकाम, शिवणकाम, सफाई, सायकल दुरूस्ती, स्वयंपाक, बालसभा यासारख्या उपक्रमातून विविध इयत्तांचे विषयज्ञान कसे जोडले जाऊ शकते व संविधानिक मूल्यांवर आधारित सहयोगी शाळा संस्कृती कशी विकसित केली जाऊ शकते, याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे देण्यात आले.पुण्यातील नवनिर्मिती या संस्थेच्या डॉ. प्रीती पै आणि स्वाती बाकरे, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा, कृणाल देसाई, जयमाला गावंडे, जयश्री कामडी, शंकर भोयर, पंडित चन्नोळे, शरद ताकसांडे, मीना काकडे, वर्षा खरडे, तुलिका वर्मा, अद्वैत देशपांडे, शुची सिन्हा आदींनी मार्गदर्शन केले. राकेश कुमार राय यांनी अनुभव कथन केले.नयी तालिममध्ये महत्त्वाचा असतो. उत्पादक काम, निसर्ग व समाज यांच्यासोबत समाजजोडणी करीत ज्ञानाची बांधणी कशी करता येऊ शकते, हे आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभव घेत जाणून घेतले. अजय कुमार यादव यांनी आजच्या आधुनिक युगातही हे शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला या ठिकाणी समजले. आमच्या आदिवासी क्षेत्रात या पद्धतीचा उपयोग नक्कीच करणार, असे सांगितले. बिहार राज्यातील तेरा शाळांचे एकवीस शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.