शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:47 IST

ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.

ठळक मुद्देहेमनाथ राव : सेवाग्राम येथील शांती भवनातील प्रशिक्षणाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.नयी तालिम समिती अंतर्गातील आनंदनिकेतन विद्यालयाद्वारे चंपारण जिल्ह्यातील बितीहर्ता केंद्राच्या शिक्षकांसाठी शांतीभवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हेमनाथ राव म्हणाले, पूर्ण वातानुकूलित व अत्याधुनिक व्यवस्था असल्याशिवाय कुठलेही प्रशिक्षण चांगल्यारितीने पार पडत नाही, असा समज या ठिकाणी खोटा ठरला आहे. मातीच्या भिंती, कवेलूचे छत अशा इमारतीमध्ये खडू, फळा व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज करता येईल, अशा उत्पादक कामातून उत्तम शिक्षण दिले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर मानवीय गुणांची उत्तमरीत्या रूजवण केली जाऊ शकते, हे प्रशिक्षणातून सहजपणे जाणवले. बिहार राज्यात ३५० नयी तालिमची विद्यालये होती. तेथे नयी तालिम पुनर्जीवित करण्याचा बिहार सरकारचा प्रयत्न असल्याचे राव यांनी सांगितले.नयी तालिम समितीचे मंत्री प्रा.प्रदीप दासगुप्ता यांनीही विचार व्यक्त केले. प्रशिक्षणात सहभागींंना प्रगत शिक्षण संस्था फलटणच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबाळकर यांनी बागकाम, शिवणकाम, सफाई, सायकल दुरूस्ती, स्वयंपाक, बालसभा यासारख्या उपक्रमातून विविध इयत्तांचे विषयज्ञान कसे जोडले जाऊ शकते व संविधानिक मूल्यांवर आधारित सहयोगी शाळा संस्कृती कशी विकसित केली जाऊ शकते, याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे देण्यात आले.पुण्यातील नवनिर्मिती या संस्थेच्या डॉ. प्रीती पै आणि स्वाती बाकरे, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा, कृणाल देसाई, जयमाला गावंडे, जयश्री कामडी, शंकर भोयर, पंडित चन्नोळे, शरद ताकसांडे, मीना काकडे, वर्षा खरडे, तुलिका वर्मा, अद्वैत देशपांडे, शुची सिन्हा आदींनी मार्गदर्शन केले. राकेश कुमार राय यांनी अनुभव कथन केले.नयी तालिममध्ये महत्त्वाचा असतो. उत्पादक काम, निसर्ग व समाज यांच्यासोबत समाजजोडणी करीत ज्ञानाची बांधणी कशी करता येऊ शकते, हे आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभव घेत जाणून घेतले. अजय कुमार यादव यांनी आजच्या आधुनिक युगातही हे शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला या ठिकाणी समजले. आमच्या आदिवासी क्षेत्रात या पद्धतीचा उपयोग नक्कीच करणार, असे सांगितले. बिहार राज्यातील तेरा शाळांचे एकवीस शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.