शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:47 IST

ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.

ठळक मुद्देहेमनाथ राव : सेवाग्राम येथील शांती भवनातील प्रशिक्षणाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.नयी तालिम समिती अंतर्गातील आनंदनिकेतन विद्यालयाद्वारे चंपारण जिल्ह्यातील बितीहर्ता केंद्राच्या शिक्षकांसाठी शांतीभवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हेमनाथ राव म्हणाले, पूर्ण वातानुकूलित व अत्याधुनिक व्यवस्था असल्याशिवाय कुठलेही प्रशिक्षण चांगल्यारितीने पार पडत नाही, असा समज या ठिकाणी खोटा ठरला आहे. मातीच्या भिंती, कवेलूचे छत अशा इमारतीमध्ये खडू, फळा व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज करता येईल, अशा उत्पादक कामातून उत्तम शिक्षण दिले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर मानवीय गुणांची उत्तमरीत्या रूजवण केली जाऊ शकते, हे प्रशिक्षणातून सहजपणे जाणवले. बिहार राज्यात ३५० नयी तालिमची विद्यालये होती. तेथे नयी तालिम पुनर्जीवित करण्याचा बिहार सरकारचा प्रयत्न असल्याचे राव यांनी सांगितले.नयी तालिम समितीचे मंत्री प्रा.प्रदीप दासगुप्ता यांनीही विचार व्यक्त केले. प्रशिक्षणात सहभागींंना प्रगत शिक्षण संस्था फलटणच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबाळकर यांनी बागकाम, शिवणकाम, सफाई, सायकल दुरूस्ती, स्वयंपाक, बालसभा यासारख्या उपक्रमातून विविध इयत्तांचे विषयज्ञान कसे जोडले जाऊ शकते व संविधानिक मूल्यांवर आधारित सहयोगी शाळा संस्कृती कशी विकसित केली जाऊ शकते, याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे देण्यात आले.पुण्यातील नवनिर्मिती या संस्थेच्या डॉ. प्रीती पै आणि स्वाती बाकरे, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा, कृणाल देसाई, जयमाला गावंडे, जयश्री कामडी, शंकर भोयर, पंडित चन्नोळे, शरद ताकसांडे, मीना काकडे, वर्षा खरडे, तुलिका वर्मा, अद्वैत देशपांडे, शुची सिन्हा आदींनी मार्गदर्शन केले. राकेश कुमार राय यांनी अनुभव कथन केले.नयी तालिममध्ये महत्त्वाचा असतो. उत्पादक काम, निसर्ग व समाज यांच्यासोबत समाजजोडणी करीत ज्ञानाची बांधणी कशी करता येऊ शकते, हे आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभव घेत जाणून घेतले. अजय कुमार यादव यांनी आजच्या आधुनिक युगातही हे शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला या ठिकाणी समजले. आमच्या आदिवासी क्षेत्रात या पद्धतीचा उपयोग नक्कीच करणार, असे सांगितले. बिहार राज्यातील तेरा शाळांचे एकवीस शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.