शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

पुरामुळे विद्यार्थी देवळी बसस्थानकावर अडकले

By admin | Updated: August 13, 2015 02:44 IST

मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला.

जनजीवन विस्कळीत : निम्न वर्धाचे पुन्हा ३१ ही दरवाजे उघडलेवर्धा : मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला. त्यामुळे सर्वत्र नद्यांना पूर येऊना अनेक गावांचा संपर्क तुटला. देवळी बस स्थानकावर विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत थांबावे लागले. शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. मंगळवारी सायंकाळी अचानक धो-धो पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यात सर्वत्र दाणादाण उडाली. यशोदा नदीला पूर आल्यामुळे नांदोरा व डिगडोह येथील शाळकरी विद्यार्थ्यांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत देवळी बसस्थानकावर अडकून पडावे लागले. काहींना जवळच्या नातेवाईकांनी व शिक्षकांनी घरी नेले. नदी परिसरातील सर्व गावांची शेती खरडून निघाल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी दुपारनंतर मुळसधार पावसाला पावसाला सुरूवात झाली. तब्बल तीन ते चार तास हा पाऊस एकसारखा सुरू होता. यादरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदोरा व डिगडोह या दोन्ही गावातील यशोदा नदीला पूर आला. पुलावरून चार फुटपर्यंत पाणी फेकत असल्याने सर्व विद्यार्थी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पूर न ओसरल्यामुळे काही विद्याथ्यांर्च्या निवासाची व भोजनाची सोय सेवाभावी नागरिकांनी केली. रात्री अकरा दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पुलगाव मार्गे गावी जाणे शक्य होते त्यांना घरी पोहचवून देण्यात आले. नगराध्यक्ष शोभा तडस यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तहसील कार्यालयातील अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनीही मदतीचा हात पुढे करण्याची अपेक्षा असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.खैरी गावाचा संपर्क तुटलेलाचआकोली- सेलू तालुक्यात व आकोली महसूल साझात येणाऱ्या खैरी गावाचा सोमवार रात्री १० वाजतापासून संपर्क तुटला असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. १५०० लोकसंख्येच्या या गावाची कहाणीच जगावेगळी आहे. गावाच्या मागे मदन उन्नयी धरण तर पुढे बेफाम वाहणारी धामनदी. नदीवरील ठेंगणा पुल व त्यातच महाकाळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे थोड्याही पावसाने या पुलावरून पाणी वाहते. तीन दिवसांपासून या पुलावर पाणी असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. काही घरात तापाने रूग्ण फणफणत आहे. पण दवाखान्यात नेणार कसे हा प्रश्न आहे. गरोदर महिलांचा जीव तर अक्षरश: टांगणीला लागला आहे. दूध विक्रेत्यांना चंदीवर दूध पोहचता करता येत नाही. ग्रामसेवक, तलाठी पुलापर्यंत येतात व निघून जातात. पूल उंच करण्याकरिता शासनदरबारी प्रयत्न झाला. परंतु लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल ठरली. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गावाला असलेला धोका ओळखून पूल उंच करण्याची मागणी होत आहे. तहसीलदार रवींद्र होळी यांनी पूरस्थळाची पाहणी केली.