शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पुरामुळे विद्यार्थी देवळी बसस्थानकावर अडकले

By admin | Updated: August 13, 2015 02:44 IST

मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला.

जनजीवन विस्कळीत : निम्न वर्धाचे पुन्हा ३१ ही दरवाजे उघडलेवर्धा : मंगळवारी दुपारपासूनच सुरू झालेल्या पावसाचा तडाखा आर्वी, देवळी आणि कारंजा (घा.) तालुक्याला बसला. त्यामुळे सर्वत्र नद्यांना पूर येऊना अनेक गावांचा संपर्क तुटला. देवळी बस स्थानकावर विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत थांबावे लागले. शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. मंगळवारी सायंकाळी अचानक धो-धो पाऊस झाल्यामुळे देवळी तालुक्यात सर्वत्र दाणादाण उडाली. यशोदा नदीला पूर आल्यामुळे नांदोरा व डिगडोह येथील शाळकरी विद्यार्थ्यांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत देवळी बसस्थानकावर अडकून पडावे लागले. काहींना जवळच्या नातेवाईकांनी व शिक्षकांनी घरी नेले. नदी परिसरातील सर्व गावांची शेती खरडून निघाल्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी दुपारनंतर मुळसधार पावसाला पावसाला सुरूवात झाली. तब्बल तीन ते चार तास हा पाऊस एकसारखा सुरू होता. यादरम्यान सायंकाळी ६ वाजेपर्यंत नांदोरा व डिगडोह या दोन्ही गावातील यशोदा नदीला पूर आला. पुलावरून चार फुटपर्यंत पाणी फेकत असल्याने सर्व विद्यार्थी अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत पूर न ओसरल्यामुळे काही विद्याथ्यांर्च्या निवासाची व भोजनाची सोय सेवाभावी नागरिकांनी केली. रात्री अकरा दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पुलगाव मार्गे गावी जाणे शक्य होते त्यांना घरी पोहचवून देण्यात आले. नगराध्यक्ष शोभा तडस यांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तहसील कार्यालयातील अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनीही मदतीचा हात पुढे करण्याची अपेक्षा असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.खैरी गावाचा संपर्क तुटलेलाचआकोली- सेलू तालुक्यात व आकोली महसूल साझात येणाऱ्या खैरी गावाचा सोमवार रात्री १० वाजतापासून संपर्क तुटला असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. १५०० लोकसंख्येच्या या गावाची कहाणीच जगावेगळी आहे. गावाच्या मागे मदन उन्नयी धरण तर पुढे बेफाम वाहणारी धामनदी. नदीवरील ठेंगणा पुल व त्यातच महाकाळी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे थोड्याही पावसाने या पुलावरून पाणी वाहते. तीन दिवसांपासून या पुलावर पाणी असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. काही घरात तापाने रूग्ण फणफणत आहे. पण दवाखान्यात नेणार कसे हा प्रश्न आहे. गरोदर महिलांचा जीव तर अक्षरश: टांगणीला लागला आहे. दूध विक्रेत्यांना चंदीवर दूध पोहचता करता येत नाही. ग्रामसेवक, तलाठी पुलापर्यंत येतात व निघून जातात. पूल उंच करण्याकरिता शासनदरबारी प्रयत्न झाला. परंतु लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल ठरली. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या गावाला असलेला धोका ओळखून पूल उंच करण्याची मागणी होत आहे. तहसीलदार रवींद्र होळी यांनी पूरस्थळाची पाहणी केली.