शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: October 29, 2016 00:54 IST

केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे.

पालिकेकडे तक्रार : आरोग्यविषयक समस्यांनी घेरलेवर्धा : केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीला लागूनच कचऱ्याचा ढोला ठेवला आहे. येथील कचरा ढोल्यातच पेटविण्यात जातो. त्यामुळे निघाणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिक आणि कार्यालयातील कर्मचारी वर्गाला होत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही हा प्रकार सुरूच असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिली आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढोल्यात परिसरातील नागरिक कचरा टाकतात. यात कचरा जमा झाला नसला तरीही दररोज कचरा पेटविण्यात येतो. यामुळे कचरा कुंडीतील धूर इमारतीच्या तावदानातून पूर्ण इमारतीमध्ये पसरतो. अशात कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बसून कामकाज करणे असह्य होते. त्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कचरा पेटविताना कचऱ्यातील प्लास्टिक, थर्माकोल जळाल्याने विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाला काम करताना डोकेदुखी आणि श्वसनाचे विकार बळावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी याविषयी तक्रार केली. मात्र हा प्रकार आजतागायत सुरुच आहे. तसे पाहता येथील कचरा गोळा करुन अन्यत्र नेऊन विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा कार्यालयाचे इमारतीला लागून असलेली कचराकुंडी तात्काळ हलविण्यात यावी किंवा योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी केली. यावेळी ए.बी. कडू, ए.आर. वडे, सी.जे. भुसारी, मोना मानेकर, आर.एस. थुल, पंकज भारसाकळे, जी.एन. शेळके, ठाकूर, नांदुरकर, पोचमपल्लीवार, वडते, माळी, आडे, डफ, पाटील, जाधव, रोहणकर, नरेंद्र नागतोडे, नितनवरे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)येथील कर्मचारी वर्गाला दमा, फुफ्फुसांचे आजार, डोळ्यांचे व श्वासाचे, घश्याचे आजार बळावत आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहे.कचरा पेटविताना यातून बाहेर पडत असलेल्या घातक वायुमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. यापूर्वी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराविषयी लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. परंतु पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.पालिकेचे कर्मचारी येथील कचरा नियमीत उचलत नाही तर पेटवुन देतात. याप्रमाणे कचरा पेटविल्याने प्राणीमात्रांना धोका असतो. शिवाय यातून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. पुढील धोका टाळण्याकरिता येथील कचरा उचलुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. अन्यथा याप्रमाणे कचरा पेटविणे बंद करणे गरजेचे झाले आहे.