शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: October 29, 2016 00:54 IST

केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे.

पालिकेकडे तक्रार : आरोग्यविषयक समस्यांनी घेरलेवर्धा : केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीला लागूनच कचऱ्याचा ढोला ठेवला आहे. येथील कचरा ढोल्यातच पेटविण्यात जातो. त्यामुळे निघाणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिक आणि कार्यालयातील कर्मचारी वर्गाला होत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही हा प्रकार सुरूच असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिली आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढोल्यात परिसरातील नागरिक कचरा टाकतात. यात कचरा जमा झाला नसला तरीही दररोज कचरा पेटविण्यात येतो. यामुळे कचरा कुंडीतील धूर इमारतीच्या तावदानातून पूर्ण इमारतीमध्ये पसरतो. अशात कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बसून कामकाज करणे असह्य होते. त्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कचरा पेटविताना कचऱ्यातील प्लास्टिक, थर्माकोल जळाल्याने विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाला काम करताना डोकेदुखी आणि श्वसनाचे विकार बळावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी याविषयी तक्रार केली. मात्र हा प्रकार आजतागायत सुरुच आहे. तसे पाहता येथील कचरा गोळा करुन अन्यत्र नेऊन विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा कार्यालयाचे इमारतीला लागून असलेली कचराकुंडी तात्काळ हलविण्यात यावी किंवा योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी केली. यावेळी ए.बी. कडू, ए.आर. वडे, सी.जे. भुसारी, मोना मानेकर, आर.एस. थुल, पंकज भारसाकळे, जी.एन. शेळके, ठाकूर, नांदुरकर, पोचमपल्लीवार, वडते, माळी, आडे, डफ, पाटील, जाधव, रोहणकर, नरेंद्र नागतोडे, नितनवरे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)येथील कर्मचारी वर्गाला दमा, फुफ्फुसांचे आजार, डोळ्यांचे व श्वासाचे, घश्याचे आजार बळावत आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहे.कचरा पेटविताना यातून बाहेर पडत असलेल्या घातक वायुमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. यापूर्वी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराविषयी लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. परंतु पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.पालिकेचे कर्मचारी येथील कचरा नियमीत उचलत नाही तर पेटवुन देतात. याप्रमाणे कचरा पेटविल्याने प्राणीमात्रांना धोका असतो. शिवाय यातून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. पुढील धोका टाळण्याकरिता येथील कचरा उचलुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. अन्यथा याप्रमाणे कचरा पेटविणे बंद करणे गरजेचे झाले आहे.