शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: October 29, 2016 00:54 IST

केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे.

पालिकेकडे तक्रार : आरोग्यविषयक समस्यांनी घेरलेवर्धा : केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीला लागूनच कचऱ्याचा ढोला ठेवला आहे. येथील कचरा ढोल्यातच पेटविण्यात जातो. त्यामुळे निघाणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिक आणि कार्यालयातील कर्मचारी वर्गाला होत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही हा प्रकार सुरूच असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिली आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढोल्यात परिसरातील नागरिक कचरा टाकतात. यात कचरा जमा झाला नसला तरीही दररोज कचरा पेटविण्यात येतो. यामुळे कचरा कुंडीतील धूर इमारतीच्या तावदानातून पूर्ण इमारतीमध्ये पसरतो. अशात कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बसून कामकाज करणे असह्य होते. त्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कचरा पेटविताना कचऱ्यातील प्लास्टिक, थर्माकोल जळाल्याने विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाला काम करताना डोकेदुखी आणि श्वसनाचे विकार बळावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी याविषयी तक्रार केली. मात्र हा प्रकार आजतागायत सुरुच आहे. तसे पाहता येथील कचरा गोळा करुन अन्यत्र नेऊन विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा कार्यालयाचे इमारतीला लागून असलेली कचराकुंडी तात्काळ हलविण्यात यावी किंवा योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी केली. यावेळी ए.बी. कडू, ए.आर. वडे, सी.जे. भुसारी, मोना मानेकर, आर.एस. थुल, पंकज भारसाकळे, जी.एन. शेळके, ठाकूर, नांदुरकर, पोचमपल्लीवार, वडते, माळी, आडे, डफ, पाटील, जाधव, रोहणकर, नरेंद्र नागतोडे, नितनवरे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)येथील कर्मचारी वर्गाला दमा, फुफ्फुसांचे आजार, डोळ्यांचे व श्वासाचे, घश्याचे आजार बळावत आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहे.कचरा पेटविताना यातून बाहेर पडत असलेल्या घातक वायुमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. यापूर्वी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराविषयी लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. परंतु पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.पालिकेचे कर्मचारी येथील कचरा नियमीत उचलत नाही तर पेटवुन देतात. याप्रमाणे कचरा पेटविल्याने प्राणीमात्रांना धोका असतो. शिवाय यातून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. पुढील धोका टाळण्याकरिता येथील कचरा उचलुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. अन्यथा याप्रमाणे कचरा पेटविणे बंद करणे गरजेचे झाले आहे.