शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

यंदाच्या खरीप हंगामात वाढणार तुरीचा पेरा

By admin | Updated: April 25, 2016 01:58 IST

कमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

सोयाबीन होणार आंतरपीक : शेतकरी करताहेत कमी खर्चाचे नियोजनविजय माहुरे  घोराडकमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचा पेरा वाढणार असून सोयाबीनचे पीक आंतरपीक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस हा नाममात्र ठरण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे मत तालुक्यातील जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला गत काही वर्षांपासून मिळत असलेला भाव हा परवडणारा नाही. त्यामुळे कापसाचे पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हतबल करणारे ठरत आहे. कापसाला येणारा खर्च पाहता कापूस पिकापासून शेतकरी दूर जाण्याची चिन्हे दिसत आहे. तालुक्यात केळीच्या बागाही योग्य भाव मिळत नसल्याच्या कारणामुळे नामशेष झाल्या आहेत. ज्वारीच्या पिकापासूनही याच कारणामुळे फारकत घेत सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळले होते. पण दिवसेंदिवस सोयाबीनच्या उत्पन्नात घट येवू लागली आहे. त्यामुळे यंदा कमी खर्चात परवडणारे पीक घेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्यास्थितीत तुरीला ७ ते ८ हजार रूपये क्विंटल असणारा भाव पाहता आंतरपीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक यंदाच्या करीपात मुख्य पीक म्हणून घेण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहे. दरवर्षी तोट्याची शेती होत असल्याने कर्जाच्या डोंगराखाली सातत्याने राहावे लागत आहे. नवनवे तंत्रज्ञान शेती व्यवसायात आले असून उत्पन्नातही वाढ होत आहे. पण या सर्वांसोबत लागवडीचा खर्चही वाढत असून कापसाला मिळत असलेला भाव हा अत्यल्प आहे. सरते शेवटी दर वाढून केवळ व्यापारी वर्गाचा फायदा करून देणारे पीक अशी कापसाची नवी ओळख आहे. दरवर्षी नुकसान सहन करून आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना घरखर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न सोडविण्यासाठी कमीत कमी खर्च करून अधिकाधिक उत्पन्न शेतीतून कसे घेता येईल या मार्गाचा शोध रेत्या खरीप हंगामात शेतकरी घेत आहे.अवास्तव खर्चाला फाटा तूर पिकाची शेती करून यामध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले असता सोयाबीनच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून तूर पिकाचा खर्च निघू शकतो. रासायनिक खत, मशागतीचा खर्च व मजुरीचा खर्च ही कमी येतो. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न तुरीपासून मिळविता येणे शक्य होणार आहे. जे खायचे ते पिकवायचेकापसाचे पीक पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने विदर्भात सर्वत्र घेतले जाते. पण कापूस उत्पादित झाल्यावर तो खाता येत नाही. त्यापेल्षा जे खायचे तेच पिकवायचे असा विचारही आता शेतकरी करू लागते आहे. तूर पीक ठरतेय नवा पर्यायतालुक्यात यंदा तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले. अनेकांनी केवळ तुरीचे उत्पादन घेऊन आपली प्रगती साधत नवा पर्यायही शेतकरी वर्गासमोर निर्माण केला आहे. त्यामुळेही तुरीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत तालुका कृषी विभागाद्वारे दिले जात आहे.