शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या खरीप हंगामात वाढणार तुरीचा पेरा

By admin | Updated: April 25, 2016 01:58 IST

कमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

सोयाबीन होणार आंतरपीक : शेतकरी करताहेत कमी खर्चाचे नियोजनविजय माहुरे  घोराडकमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचा पेरा वाढणार असून सोयाबीनचे पीक आंतरपीक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस हा नाममात्र ठरण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे मत तालुक्यातील जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला गत काही वर्षांपासून मिळत असलेला भाव हा परवडणारा नाही. त्यामुळे कापसाचे पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हतबल करणारे ठरत आहे. कापसाला येणारा खर्च पाहता कापूस पिकापासून शेतकरी दूर जाण्याची चिन्हे दिसत आहे. तालुक्यात केळीच्या बागाही योग्य भाव मिळत नसल्याच्या कारणामुळे नामशेष झाल्या आहेत. ज्वारीच्या पिकापासूनही याच कारणामुळे फारकत घेत सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळले होते. पण दिवसेंदिवस सोयाबीनच्या उत्पन्नात घट येवू लागली आहे. त्यामुळे यंदा कमी खर्चात परवडणारे पीक घेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्यास्थितीत तुरीला ७ ते ८ हजार रूपये क्विंटल असणारा भाव पाहता आंतरपीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक यंदाच्या करीपात मुख्य पीक म्हणून घेण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहे. दरवर्षी तोट्याची शेती होत असल्याने कर्जाच्या डोंगराखाली सातत्याने राहावे लागत आहे. नवनवे तंत्रज्ञान शेती व्यवसायात आले असून उत्पन्नातही वाढ होत आहे. पण या सर्वांसोबत लागवडीचा खर्चही वाढत असून कापसाला मिळत असलेला भाव हा अत्यल्प आहे. सरते शेवटी दर वाढून केवळ व्यापारी वर्गाचा फायदा करून देणारे पीक अशी कापसाची नवी ओळख आहे. दरवर्षी नुकसान सहन करून आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना घरखर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न सोडविण्यासाठी कमीत कमी खर्च करून अधिकाधिक उत्पन्न शेतीतून कसे घेता येईल या मार्गाचा शोध रेत्या खरीप हंगामात शेतकरी घेत आहे.अवास्तव खर्चाला फाटा तूर पिकाची शेती करून यामध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले असता सोयाबीनच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून तूर पिकाचा खर्च निघू शकतो. रासायनिक खत, मशागतीचा खर्च व मजुरीचा खर्च ही कमी येतो. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न तुरीपासून मिळविता येणे शक्य होणार आहे. जे खायचे ते पिकवायचेकापसाचे पीक पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने विदर्भात सर्वत्र घेतले जाते. पण कापूस उत्पादित झाल्यावर तो खाता येत नाही. त्यापेल्षा जे खायचे तेच पिकवायचे असा विचारही आता शेतकरी करू लागते आहे. तूर पीक ठरतेय नवा पर्यायतालुक्यात यंदा तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले. अनेकांनी केवळ तुरीचे उत्पादन घेऊन आपली प्रगती साधत नवा पर्यायही शेतकरी वर्गासमोर निर्माण केला आहे. त्यामुळेही तुरीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत तालुका कृषी विभागाद्वारे दिले जात आहे.