शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

यंदाच्या खरीप हंगामात वाढणार तुरीचा पेरा

By admin | Updated: April 25, 2016 01:58 IST

कमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

सोयाबीन होणार आंतरपीक : शेतकरी करताहेत कमी खर्चाचे नियोजनविजय माहुरे  घोराडकमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचा पेरा वाढणार असून सोयाबीनचे पीक आंतरपीक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस हा नाममात्र ठरण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे मत तालुक्यातील जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला गत काही वर्षांपासून मिळत असलेला भाव हा परवडणारा नाही. त्यामुळे कापसाचे पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हतबल करणारे ठरत आहे. कापसाला येणारा खर्च पाहता कापूस पिकापासून शेतकरी दूर जाण्याची चिन्हे दिसत आहे. तालुक्यात केळीच्या बागाही योग्य भाव मिळत नसल्याच्या कारणामुळे नामशेष झाल्या आहेत. ज्वारीच्या पिकापासूनही याच कारणामुळे फारकत घेत सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळले होते. पण दिवसेंदिवस सोयाबीनच्या उत्पन्नात घट येवू लागली आहे. त्यामुळे यंदा कमी खर्चात परवडणारे पीक घेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्यास्थितीत तुरीला ७ ते ८ हजार रूपये क्विंटल असणारा भाव पाहता आंतरपीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक यंदाच्या करीपात मुख्य पीक म्हणून घेण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहे. दरवर्षी तोट्याची शेती होत असल्याने कर्जाच्या डोंगराखाली सातत्याने राहावे लागत आहे. नवनवे तंत्रज्ञान शेती व्यवसायात आले असून उत्पन्नातही वाढ होत आहे. पण या सर्वांसोबत लागवडीचा खर्चही वाढत असून कापसाला मिळत असलेला भाव हा अत्यल्प आहे. सरते शेवटी दर वाढून केवळ व्यापारी वर्गाचा फायदा करून देणारे पीक अशी कापसाची नवी ओळख आहे. दरवर्षी नुकसान सहन करून आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना घरखर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न सोडविण्यासाठी कमीत कमी खर्च करून अधिकाधिक उत्पन्न शेतीतून कसे घेता येईल या मार्गाचा शोध रेत्या खरीप हंगामात शेतकरी घेत आहे.अवास्तव खर्चाला फाटा तूर पिकाची शेती करून यामध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले असता सोयाबीनच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून तूर पिकाचा खर्च निघू शकतो. रासायनिक खत, मशागतीचा खर्च व मजुरीचा खर्च ही कमी येतो. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न तुरीपासून मिळविता येणे शक्य होणार आहे. जे खायचे ते पिकवायचेकापसाचे पीक पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने विदर्भात सर्वत्र घेतले जाते. पण कापूस उत्पादित झाल्यावर तो खाता येत नाही. त्यापेल्षा जे खायचे तेच पिकवायचे असा विचारही आता शेतकरी करू लागते आहे. तूर पीक ठरतेय नवा पर्यायतालुक्यात यंदा तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले. अनेकांनी केवळ तुरीचे उत्पादन घेऊन आपली प्रगती साधत नवा पर्यायही शेतकरी वर्गासमोर निर्माण केला आहे. त्यामुळेही तुरीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत तालुका कृषी विभागाद्वारे दिले जात आहे.