शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

शब्दरूपी संवादाचे गोड माध्यम झाले चित्रमय

By admin | Updated: January 16, 2016 02:31 IST

जग विस्तारलं तसतशी संवादाची माध्यमेही वाढली. हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला असे सर्वांना वाटू लागले.

शब्दांचा गोडवा हरवतोय : सांकेतिक चिन्हांमुळे शब्दांचे महत्त्व झाले कमीपराग मगर वर्धाजग विस्तारलं तसतशी संवादाची माध्यमेही वाढली. हरवलेला संवाद पुन्हा सुरू झाला असे सर्वांना वाटू लागले. पण सोशल मीडियावर बोलक्या शब्दांची जागा या काही वर्षात चित्रांनी घेतली. त्यामुळे संवादामध्ये शब्दांपेक्षा चित्र आणि सांकेतिक चिन्हांचाच वापर जास्त होत असल्याचे संक्रांतीला व्हॉट्स अ‍ॅप आणि इतरही माध्यमांवर झळकत असलेल्या चित्रमय संदेशावरून प्रत्ययास येते. हजार शब्द सांगण्याची किमया एका चित्रामध्ये असते असे मानले जाते. पण शब्दांचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही. पूर्वी कुणालाही शुभेच्छा देताना भारदस्त अशा साहित्यिक शब्दांचा प्रयोग केला जायचा. प्रतिक्रिया देतानाही योग्य आणि चपखल बसणारे शब्द वापरले जायचे. त्यातच संक्रांत हा सर्व सणांमधला गोड सण. ‘तिळगुळ घा आणि गोड गोड बोला’ असे केवळ मराठीतच ऐकावयास मिळते. हे शब्द आप्तेष्टांच्या गोड आवाजात फोनवरून ऐकतानाही पूर्वी वेगळेच समाधान होते. पण या काही वर्षात अश्या संवादाची जागा शाब्दिक संदेशांनी घेतली. त्यातही पुढे जाऊन शब्द कमी होत त्याची जागा चित्र आणि सांकेतिक प्रतिमांनी घेतली. फोनवरील संवादाने स्पर्शाचा ओलाव कमी झालाच पण चित्रांनी शब्दांचा होता तेवढाही ओलावा कोरडा केला आहे. त्यामुळे आधी संक्रांतीला तिळगुळ घा आणि गोड गोड बोला असे ऐकायला मिळणारे शब्द आता चित्रांमध्ये जाऊन बसले आहे. या शब्दांची जागा आता तिळगुळाचे लाडू असलेल्या चित्रांनी घेतली आहे. व्हॉट्स अ‍ॅप वर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या चित्ररूपी तिळाच्या लाडूंवरून हेच दिसून येत आहे.