शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आठवडाभरात सहा जनावरे दगावली

By admin | Updated: February 19, 2015 01:27 IST

सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे.

वर्धा : सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे. नागरिक केविलवाण्या नजरेने आपल्या मृतप्राय: जनावरांकडे बघत आहेत. त्यांच्या मृत्यूचे ठोस कारण कळत नसले तरी पशुवैद्यकीय अधिकारी विषारी वनस्पती जनावरांनी खाल्ल्याचा संशय व्यक्त करीत आहे, तर गावकरी मात्र ही बाब मानायला तयार नाही. उपायांचा विशेष उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मोर्चापूर येथील अनेक नागरिक शेतीला पुरक दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे बैलांसह गायी व म्हशी आहेत. गत काही दिवसांसून गावातील जनावरे दगावण्याचे सत्र सुरू झाले आहे. यात संजय मधुकर काळे यांच्या चार म्हशी चार दिवसात दगावल्या. तर तीन म्हशी बिमार आहेत. यात त्यांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बाबाराव तेलरांधे यांची दोन जनावरे दगावली तर एक गाय बिमार आहे. तसेच तुलसीराम सावरकर, आनंद सावरकर विठोबा सावरकर, नानाजी लिल्हारे, आनंद सावरकर यासह अनेकांच्या गायी, बैल, म्हशी बिमार आहेत. जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांनी स्थानिक पशुवैकीय विभागाला याची माहिती दिली. पण सुरुवातीला थातूरमातूर इलाज झाल्याने जनावरे बिमारच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जनावरे चारा खाणे सोडून देतात आणि एकाच दिवसात मल्हूल पडतात. दिसऱ्याच दिवशी ती मरतील अशीच स्थिती असते. त्यामुळे जनावरांवर एखाद्या रोगाचे सावट असावे असा संशय गावकरी व्यक्त करतात. तर पशुव्यद्यकीय चमू मात्र एखादी विषारी झाड या जनावरांच्या खाण्यात आल्याने त्यांना विषबाधा झाली असावी असे सांगत आहे. चारा जपून खाऊ घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे.पशुवैद्यकीय केंद्र व्याऱ्यावरमोर्चापूर हे गाव सुकळी स्टेशन येथील पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत येते. परंतु येथील केंद्रात अनेकदा अधिकारीच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. साध्या वस्तूही तेथे उपलब्ध नसतात. येथे असणारा पशुवैद्यकीय दवाखाण्याची इमारतही दुरवस्थेत आहे. दहा वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्याला बसण्यास जागा नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनीवरून गोपालकांना शोध घावा लागतो. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या इमारतीला जागोजागी भेगा पडल्या आहे.मृत जनावरे तशीच शेतातजनावरे लागोपाठ दगावल्याने त्यांना कुठे समाधी द्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे काही जनावरे तशीच पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.