शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

आठवडाभरात सहा जनावरे दगावली

By admin | Updated: February 19, 2015 01:27 IST

सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे.

वर्धा : सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे. नागरिक केविलवाण्या नजरेने आपल्या मृतप्राय: जनावरांकडे बघत आहेत. त्यांच्या मृत्यूचे ठोस कारण कळत नसले तरी पशुवैद्यकीय अधिकारी विषारी वनस्पती जनावरांनी खाल्ल्याचा संशय व्यक्त करीत आहे, तर गावकरी मात्र ही बाब मानायला तयार नाही. उपायांचा विशेष उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मोर्चापूर येथील अनेक नागरिक शेतीला पुरक दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे बैलांसह गायी व म्हशी आहेत. गत काही दिवसांसून गावातील जनावरे दगावण्याचे सत्र सुरू झाले आहे. यात संजय मधुकर काळे यांच्या चार म्हशी चार दिवसात दगावल्या. तर तीन म्हशी बिमार आहेत. यात त्यांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बाबाराव तेलरांधे यांची दोन जनावरे दगावली तर एक गाय बिमार आहे. तसेच तुलसीराम सावरकर, आनंद सावरकर विठोबा सावरकर, नानाजी लिल्हारे, आनंद सावरकर यासह अनेकांच्या गायी, बैल, म्हशी बिमार आहेत. जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांनी स्थानिक पशुवैकीय विभागाला याची माहिती दिली. पण सुरुवातीला थातूरमातूर इलाज झाल्याने जनावरे बिमारच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जनावरे चारा खाणे सोडून देतात आणि एकाच दिवसात मल्हूल पडतात. दिसऱ्याच दिवशी ती मरतील अशीच स्थिती असते. त्यामुळे जनावरांवर एखाद्या रोगाचे सावट असावे असा संशय गावकरी व्यक्त करतात. तर पशुव्यद्यकीय चमू मात्र एखादी विषारी झाड या जनावरांच्या खाण्यात आल्याने त्यांना विषबाधा झाली असावी असे सांगत आहे. चारा जपून खाऊ घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे.पशुवैद्यकीय केंद्र व्याऱ्यावरमोर्चापूर हे गाव सुकळी स्टेशन येथील पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत येते. परंतु येथील केंद्रात अनेकदा अधिकारीच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. साध्या वस्तूही तेथे उपलब्ध नसतात. येथे असणारा पशुवैद्यकीय दवाखाण्याची इमारतही दुरवस्थेत आहे. दहा वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्याला बसण्यास जागा नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनीवरून गोपालकांना शोध घावा लागतो. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या इमारतीला जागोजागी भेगा पडल्या आहे.मृत जनावरे तशीच शेतातजनावरे लागोपाठ दगावल्याने त्यांना कुठे समाधी द्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे काही जनावरे तशीच पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.