शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

आठवडाभरात सहा जनावरे दगावली

By admin | Updated: February 19, 2015 01:27 IST

सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे.

वर्धा : सेलू तालुक्यातील मोर्चापूर येथे आठवडाभरात जवळपास सहा जनावरे दगावली आहेत. अद्यापही जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच आहे. नागरिक केविलवाण्या नजरेने आपल्या मृतप्राय: जनावरांकडे बघत आहेत. त्यांच्या मृत्यूचे ठोस कारण कळत नसले तरी पशुवैद्यकीय अधिकारी विषारी वनस्पती जनावरांनी खाल्ल्याचा संशय व्यक्त करीत आहे, तर गावकरी मात्र ही बाब मानायला तयार नाही. उपायांचा विशेष उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मोर्चापूर येथील अनेक नागरिक शेतीला पुरक दुग्ध व्यवसाय करतात. अनेकांकडे बैलांसह गायी व म्हशी आहेत. गत काही दिवसांसून गावातील जनावरे दगावण्याचे सत्र सुरू झाले आहे. यात संजय मधुकर काळे यांच्या चार म्हशी चार दिवसात दगावल्या. तर तीन म्हशी बिमार आहेत. यात त्यांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बाबाराव तेलरांधे यांची दोन जनावरे दगावली तर एक गाय बिमार आहे. तसेच तुलसीराम सावरकर, आनंद सावरकर विठोबा सावरकर, नानाजी लिल्हारे, आनंद सावरकर यासह अनेकांच्या गायी, बैल, म्हशी बिमार आहेत. जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांनी स्थानिक पशुवैकीय विभागाला याची माहिती दिली. पण सुरुवातीला थातूरमातूर इलाज झाल्याने जनावरे बिमारच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जनावरे चारा खाणे सोडून देतात आणि एकाच दिवसात मल्हूल पडतात. दिसऱ्याच दिवशी ती मरतील अशीच स्थिती असते. त्यामुळे जनावरांवर एखाद्या रोगाचे सावट असावे असा संशय गावकरी व्यक्त करतात. तर पशुव्यद्यकीय चमू मात्र एखादी विषारी झाड या जनावरांच्या खाण्यात आल्याने त्यांना विषबाधा झाली असावी असे सांगत आहे. चारा जपून खाऊ घालण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे.पशुवैद्यकीय केंद्र व्याऱ्यावरमोर्चापूर हे गाव सुकळी स्टेशन येथील पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत येते. परंतु येथील केंद्रात अनेकदा अधिकारीच नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. साध्या वस्तूही तेथे उपलब्ध नसतात. येथे असणारा पशुवैद्यकीय दवाखाण्याची इमारतही दुरवस्थेत आहे. दहा वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्याला बसण्यास जागा नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनीवरून गोपालकांना शोध घावा लागतो. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या इमारतीला जागोजागी भेगा पडल्या आहे.मृत जनावरे तशीच शेतातजनावरे लागोपाठ दगावल्याने त्यांना कुठे समाधी द्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे काही जनावरे तशीच पडून आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.