शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

आजनसरा-फुकटा मार्गाला झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने प्रवास करताना हे वन्यप्राणी झुडपी गवतातून रस्त्यावर येत असल्याने वाहनांना धडक बसून अनेक वाहन चालक जखमी होऊन वाहनाचे सुद्धा नुकसान होत आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका बळावला : अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, जीव गेल्यावरच येणार का जाग?

लोकमत न्यूज नेटवर्कआजनसरा : आजनसरा ते वडनेर हा मार्ग भोजाजी महाराजांच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. हा मार्ग अत्यंत अरुंद व एकेरी असल्याने नागमोडी वळणे आहेत. या मार्गाच्या दुतर्फा झाडा झुडपांनी विळखा घातला असून त्यामुळे समोरुन येणारे वाहनं दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने प्रवास करताना हे वन्यप्राणी झुडपी गवतातून रस्त्यावर येत असल्याने वाहनांना धडक बसून अनेक वाहन चालक जखमी होऊन वाहनाचे सुद्धा नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवास करताना आजूबाजूचे काहीच दिसत नसल्याने अथांग पोकळीतून वाहन चालवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपी गवत कापून रस्ता प्रवाशांसाठी मोकळा करुन देण्याची मागणी भोजाजी महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.तक्रारीकडे दुर्लक्ष...आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानात दुरदुरुन भाविक दर्शनासाठी येतात. आजनसरा ते फुकटा मार्गावर वळणरस्ता असून या मार्गाच्या दुतर्फाा वाढलेल्या झुडपी गवतांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. परिणामी, अनेक वाहनांचे अपघात झाले असून अनेक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुन झाडे तोडण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. एखाद्याचा जीव गेल्यावरच ग्रामपंचयतीला व बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्न परिसरातील संतप्त नागरिकांसह शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत