शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आजनसरा-फुकटा मार्गाला झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने प्रवास करताना हे वन्यप्राणी झुडपी गवतातून रस्त्यावर येत असल्याने वाहनांना धडक बसून अनेक वाहन चालक जखमी होऊन वाहनाचे सुद्धा नुकसान होत आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका बळावला : अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, जीव गेल्यावरच येणार का जाग?

लोकमत न्यूज नेटवर्कआजनसरा : आजनसरा ते वडनेर हा मार्ग भोजाजी महाराजांच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. हा मार्ग अत्यंत अरुंद व एकेरी असल्याने नागमोडी वळणे आहेत. या मार्गाच्या दुतर्फा झाडा झुडपांनी विळखा घातला असून त्यामुळे समोरुन येणारे वाहनं दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने प्रवास करताना हे वन्यप्राणी झुडपी गवतातून रस्त्यावर येत असल्याने वाहनांना धडक बसून अनेक वाहन चालक जखमी होऊन वाहनाचे सुद्धा नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवास करताना आजूबाजूचे काहीच दिसत नसल्याने अथांग पोकळीतून वाहन चालवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपी गवत कापून रस्ता प्रवाशांसाठी मोकळा करुन देण्याची मागणी भोजाजी महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.तक्रारीकडे दुर्लक्ष...आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानात दुरदुरुन भाविक दर्शनासाठी येतात. आजनसरा ते फुकटा मार्गावर वळणरस्ता असून या मार्गाच्या दुतर्फाा वाढलेल्या झुडपी गवतांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. परिणामी, अनेक वाहनांचे अपघात झाले असून अनेक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुन झाडे तोडण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. एखाद्याचा जीव गेल्यावरच ग्रामपंचयतीला व बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्न परिसरातील संतप्त नागरिकांसह शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत