शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत छोडो’चा सेवाग्राम आश्रम साक्षीदार

By admin | Updated: August 9, 2016 01:26 IST

‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली.

आंदोलनाच्या मुहूर्तमेढीचे ७४ वर्षे : अजूनही आठवणी ताज्याच; अनेकांसाठी उर्जास्त्रोत दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम ‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने देशाचे उर्जास्त्रोत ठरले. आश्रम आजही तेवढ्याच ताकदीने येथे येणाऱ्यांना उर्जा देत आहे. भारत छोडो ची मुहूर्तमेढ याच आश्रमातून रोवण्यात आली. त्याला मंगळवारी ७४ वर्षे होत आहे. या भारत छोडोचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम क्रांतीची प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला विचार देण्याचे कार्य याच आश्रमातून झाले, ते आजही कायम आहे. आजही येथून विचार घेवून जाण्यासाठी अनेक जण येतात. स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या सेवाग्राम आश्रमात कार्यकर्ता निर्माण, विचार आणि चळवळीला दिशा देण्याचे काम झाले होते. याच आश्रमात महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनात कुटीतून भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव पारीत झाला. त्या काळापासून येथे होणाऱ्या सभा, बैठकांना ऐतिहासिक अधिष्ठान आहे. महात्मा गांधी सेवाग्रामला आले त्या काळात देशातील वातावरण त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाने प्रभावित झाले होते. विविध उपक्रम व चळवळीला प्रारंभ झाला होता. १९४० मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्रारंभिक तयारी याच आश्रमातून झाली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सरकारशी तीव्र मतभेद झाले. आणि १९४२ मध्ये गांधीजींनी आता इंग्रजांनी भारत सोडलाच पाहिजे, असे आंदोलन पुकारले. या आंदोलनाची पहिली बैठक आदी निवासमध्ये झाली. येथेच भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव मंजूर झाला. या आंदोलनात सहभागी होण्याकरिता जाताना महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि सहकाऱ्यांनी रवाना होण्यापूर्वी आश्रमात बकुळीचे झाड लावले होते. गवालिया टँकवर मोठी सभा झाली. या क्षणापासून देशातील प्रत्येक जणांनी आपण स्वतंत्र्य झालो, असे समजून आपण स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून वागले पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ‘करा किंवा मराचा’ नारा बापूंनी या सभेत देशवासियांना दिला. गांधीजींचे आवाहन जनतेसाठी स्फूर्तिदायक ठरले. ९ आॅगस्टला भारत छोडोचे जनआंदोलन चिरडून टाकण्यासाठी ब्रिटीशांनी सकाळीच गांधीजी, मौलाना आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या प्रमुख नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवले होते. पण जनआंदोलनाचे नेतृत्व कस्तुरबा आणि सहकाऱ्यांनी सुरूच ठेवले. ९ आॅगस्ट १९४२ हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसाठी महत्त्वाचा ठरला. भारतीय इतिहासात ‘क्रांती दिनाची’ नोंद झाली, पण याचे बीजारोपण मात्र सेवाग्राम आश्रमात झाले असून यंदा त्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे.