शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत छोडो’चा सेवाग्राम आश्रम साक्षीदार

By admin | Updated: August 9, 2016 01:26 IST

‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली.

आंदोलनाच्या मुहूर्तमेढीचे ७४ वर्षे : अजूनही आठवणी ताज्याच; अनेकांसाठी उर्जास्त्रोत दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम ‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने देशाचे उर्जास्त्रोत ठरले. आश्रम आजही तेवढ्याच ताकदीने येथे येणाऱ्यांना उर्जा देत आहे. भारत छोडो ची मुहूर्तमेढ याच आश्रमातून रोवण्यात आली. त्याला मंगळवारी ७४ वर्षे होत आहे. या भारत छोडोचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम क्रांतीची प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला विचार देण्याचे कार्य याच आश्रमातून झाले, ते आजही कायम आहे. आजही येथून विचार घेवून जाण्यासाठी अनेक जण येतात. स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या सेवाग्राम आश्रमात कार्यकर्ता निर्माण, विचार आणि चळवळीला दिशा देण्याचे काम झाले होते. याच आश्रमात महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनात कुटीतून भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव पारीत झाला. त्या काळापासून येथे होणाऱ्या सभा, बैठकांना ऐतिहासिक अधिष्ठान आहे. महात्मा गांधी सेवाग्रामला आले त्या काळात देशातील वातावरण त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाने प्रभावित झाले होते. विविध उपक्रम व चळवळीला प्रारंभ झाला होता. १९४० मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्रारंभिक तयारी याच आश्रमातून झाली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सरकारशी तीव्र मतभेद झाले. आणि १९४२ मध्ये गांधीजींनी आता इंग्रजांनी भारत सोडलाच पाहिजे, असे आंदोलन पुकारले. या आंदोलनाची पहिली बैठक आदी निवासमध्ये झाली. येथेच भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव मंजूर झाला. या आंदोलनात सहभागी होण्याकरिता जाताना महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि सहकाऱ्यांनी रवाना होण्यापूर्वी आश्रमात बकुळीचे झाड लावले होते. गवालिया टँकवर मोठी सभा झाली. या क्षणापासून देशातील प्रत्येक जणांनी आपण स्वतंत्र्य झालो, असे समजून आपण स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून वागले पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ‘करा किंवा मराचा’ नारा बापूंनी या सभेत देशवासियांना दिला. गांधीजींचे आवाहन जनतेसाठी स्फूर्तिदायक ठरले. ९ आॅगस्टला भारत छोडोचे जनआंदोलन चिरडून टाकण्यासाठी ब्रिटीशांनी सकाळीच गांधीजी, मौलाना आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या प्रमुख नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवले होते. पण जनआंदोलनाचे नेतृत्व कस्तुरबा आणि सहकाऱ्यांनी सुरूच ठेवले. ९ आॅगस्ट १९४२ हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसाठी महत्त्वाचा ठरला. भारतीय इतिहासात ‘क्रांती दिनाची’ नोंद झाली, पण याचे बीजारोपण मात्र सेवाग्राम आश्रमात झाले असून यंदा त्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे.