शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

‘भारत छोडो’चा सेवाग्राम आश्रम साक्षीदार

By admin | Updated: August 9, 2016 01:26 IST

‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली.

आंदोलनाच्या मुहूर्तमेढीचे ७४ वर्षे : अजूनही आठवणी ताज्याच; अनेकांसाठी उर्जास्त्रोत दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम ‘अंग्रेजो भारत छोडो’चा नारा इतिहासात अजरामर आहे. या नाऱ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम आश्रमातच रोवल्या गेली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने देशाचे उर्जास्त्रोत ठरले. आश्रम आजही तेवढ्याच ताकदीने येथे येणाऱ्यांना उर्जा देत आहे. भारत छोडो ची मुहूर्तमेढ याच आश्रमातून रोवण्यात आली. त्याला मंगळवारी ७४ वर्षे होत आहे. या भारत छोडोचा साक्षीदार सेवाग्राम आश्रम क्रांतीची प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला विचार देण्याचे कार्य याच आश्रमातून झाले, ते आजही कायम आहे. आजही येथून विचार घेवून जाण्यासाठी अनेक जण येतात. स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या सेवाग्राम आश्रमात कार्यकर्ता निर्माण, विचार आणि चळवळीला दिशा देण्याचे काम झाले होते. याच आश्रमात महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनात कुटीतून भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव पारीत झाला. त्या काळापासून येथे होणाऱ्या सभा, बैठकांना ऐतिहासिक अधिष्ठान आहे. महात्मा गांधी सेवाग्रामला आले त्या काळात देशातील वातावरण त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाने प्रभावित झाले होते. विविध उपक्रम व चळवळीला प्रारंभ झाला होता. १९४० मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्रारंभिक तयारी याच आश्रमातून झाली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सरकारशी तीव्र मतभेद झाले. आणि १९४२ मध्ये गांधीजींनी आता इंग्रजांनी भारत सोडलाच पाहिजे, असे आंदोलन पुकारले. या आंदोलनाची पहिली बैठक आदी निवासमध्ये झाली. येथेच भारत छोडोचा मसुदा तयार करून ठराव मंजूर झाला. या आंदोलनात सहभागी होण्याकरिता जाताना महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि सहकाऱ्यांनी रवाना होण्यापूर्वी आश्रमात बकुळीचे झाड लावले होते. गवालिया टँकवर मोठी सभा झाली. या क्षणापासून देशातील प्रत्येक जणांनी आपण स्वतंत्र्य झालो, असे समजून आपण स्वतंत्र्य भारताचे नागरिक म्हणून वागले पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ‘करा किंवा मराचा’ नारा बापूंनी या सभेत देशवासियांना दिला. गांधीजींचे आवाहन जनतेसाठी स्फूर्तिदायक ठरले. ९ आॅगस्टला भारत छोडोचे जनआंदोलन चिरडून टाकण्यासाठी ब्रिटीशांनी सकाळीच गांधीजी, मौलाना आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल या प्रमुख नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवले होते. पण जनआंदोलनाचे नेतृत्व कस्तुरबा आणि सहकाऱ्यांनी सुरूच ठेवले. ९ आॅगस्ट १९४२ हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसाठी महत्त्वाचा ठरला. भारतीय इतिहासात ‘क्रांती दिनाची’ नोंद झाली, पण याचे बीजारोपण मात्र सेवाग्राम आश्रमात झाले असून यंदा त्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे.