शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

योजना लागू; पण शिष्यवृत्तीच नाही

By admin | Updated: December 20, 2014 22:44 IST

अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जि़प़ व ऩप़ च्या शाळांत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते़ ही सुवर्ण महोत्सवी

शाळा, व्यवस्थापनाची हलगर्जी : संघटनांचे शासन, प्रशासनाला साकडेवर्धा : अनुदानित, विना अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जि़प़ व ऩप़ च्या शाळांत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते़ ही सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळालीच नाही़ यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत असून संबधित प्रशासन दुर्लक्ष याकडे करीत असल्याचे दिसते़शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांच्या हलगर्जीपणामुळे २०११ पासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही़ राज्य शासनाने आदिवासी विकास विभाग शासन निर्णयानुसार अनुसुचित जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून लागू केली. प्रत्येक वर्षी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन टप्प्यात ही शिष्यवृत्ती दिली जाते़ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संबंधित मुख्याध्यापकांच्या नावे धनादेश पाठविते; पण शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी परस्पर तो आपल्या खात्यात जमा करतात़ विद्यार्र्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करीत नाही़ प्रत्येक विद्यार्र्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे; पण त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही़ अनुत्तीर्ण वा शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती नेहमी मुख्याध्यापक वा शाळा व्यवस्थापनाच्या खिशात जाते़ भारतीय संविधानाच्या कलम ४६ चा उद्देश दुर्बल घटक व विशेषत: अनु़ जाती व जनजातीचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपुर्वक करेल, सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण होईल, असा आहे; पण मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन संविधानाचेच उल्लंघन करताना दिसतात़ राज्य शासनाच्या परिपत्रकात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव विहित वेळेत सादर करणे व शिष्यवृत्ती त्वरित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, ही जबाबदारी शाळा, मुख्याध्यापक व एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांची आहे़ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कलम ४६ नुसार कारवाई केली जाईल, असे नमूद आहे; पण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते़ शासन, प्रशासन व एकात्मिक आदिवासी विकास विभागाने याकडे लक्ष देत जिल्ह्यातील वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून द्यावी, अशी मागणी गोंडवाणा विकास एकता परिषदेने केली आहे़ याबाबत आदिवासी नेते अवचित सयाम यांच्यासह गोंडवाणा एकता परिषदेने आदिवासी विकास मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनही सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)