शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत ५२५ दुचाकींची विक्री

By admin | Updated: April 1, 2017 00:59 IST

प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

बीएस ३ इंजिनची वाहने विक्री बंदच्या निर्णयाने दुचाकींच्या शोरूममध्ये गर्दी वर्धा : प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय होताच विविध कंपन्यांनी सदर इंजिन असलेल्या दुचाकींवर मोठ्या प्रमाणात सुट देत त्या विक्रीचा सपाटा सुरू केला. सवलतीची माहिती मिळताच नागरिकांनी विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली. वर्धेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत ५२५ दुचाकींची विक्री झाल्याची माहिती असून नोंदणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार अशा वाहनांची आज केवळ विक्रीच नाही त्याची तर नोंदणीही करणे बंधनकारक आहे. १ एप्रिलपासून या वाहनांची विक्री अथवा त्याची नोंदणी होणार नाही, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. हा निर्णय जाहीर होताच डिलरकडे असलेल्या दुचाकी कंपनीने परत घेण्याकरिता नकार दिल्याने डिलरला ही वाहने विकणे बंधनकारक झाले. यामुळे वर्धेतील विविध कंपनीच्या शोरूमधील कर्मचाऱ्यांची ग्राहक सांभाळताना आणि त्यांच्या नोंदणीकरिता चांगलीच धावपळ दिसली. वर्धेत दुचाकींच्या एकूण १४ शोरूम वर्धा : वर्धेत विविध कंपनीचे एकूण १४ शोरूम आहेत. यात काही कंपनीचे दोन तर तीन शोरूमचा समावेश आहे. या शोरूमध्ये गुडीपाडव्याचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी करण्यात आली होती. डिलरच्या मागणीनुसार कंपनीने वाहनांचा साठा पाठविला. यातच गुडीपाडवा होताच न्यायालयाने बी ३ इंजिन असलेल्या गाड्यांमुळे प्रदुषणात होत असलेली वाढ कायम राहत असल्याचे म्हणत या गाड्या विक्रीवर बंदी आणली. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या निर्णयामुळे त्यांनी या गाड्या सुट देत विकण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कंपनीच्या गाड्यांवर कमी अधिक रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. मोपेडवर सहा ते सात हजार तर बाईकवर सात ते आठ हजार रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. यामुळे बऱ्याच नागरिकांनी वाहनांची खरेदी केली.(प्रतिनिधी) ३० कारची विक्री न्यायालयाच्या निर्णयाने दोनचाकीच नाही तर चारचाकी वाहनांवरही बंदी आली. या बंदीचा लाभ उचलत वर्धेत तब्बल ३० चारचाही वाहनांची विक्री झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. बीएस एक प्रदूषणाचे मानक बीएस म्हणजे भारत स्टॅडर्ड स्टेज इंजिनाच्या अंतर्गत वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी केंद्र शासनाने दिलेले हे एक मानक होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवते. बीएस मानक ही भारतात कार्यरत आहे. यानुसार वाहनांच्या इंजिनचा दर्जा ठरविल्या जातो. या दर्जानुसार भारतातील वाहने बीएस ३ इंजिनची आहेत. या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता बीएस मानांकनात वेळोवळी सुधारणा करण्यात येते. ही सुधारणा करण्याकरिताच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.