शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

वर्धेत ५२५ दुचाकींची विक्री

By admin | Updated: April 1, 2017 00:59 IST

प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

बीएस ३ इंजिनची वाहने विक्री बंदच्या निर्णयाने दुचाकींच्या शोरूममध्ये गर्दी वर्धा : प्रदूषणावर आळा बसविण्याचा उद्देश ठेवत न्यायालयाने बीएस ३ इंजिन असलेली वाहनांची विक्री आणि नोंदणी ३१ मार्चच्या सायंकाळपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय होताच विविध कंपन्यांनी सदर इंजिन असलेल्या दुचाकींवर मोठ्या प्रमाणात सुट देत त्या विक्रीचा सपाटा सुरू केला. सवलतीची माहिती मिळताच नागरिकांनी विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली. वर्धेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत ५२५ दुचाकींची विक्री झाल्याची माहिती असून नोंदणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार अशा वाहनांची आज केवळ विक्रीच नाही त्याची तर नोंदणीही करणे बंधनकारक आहे. १ एप्रिलपासून या वाहनांची विक्री अथवा त्याची नोंदणी होणार नाही, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. हा निर्णय जाहीर होताच डिलरकडे असलेल्या दुचाकी कंपनीने परत घेण्याकरिता नकार दिल्याने डिलरला ही वाहने विकणे बंधनकारक झाले. यामुळे वर्धेतील विविध कंपनीच्या शोरूमधील कर्मचाऱ्यांची ग्राहक सांभाळताना आणि त्यांच्या नोंदणीकरिता चांगलीच धावपळ दिसली. वर्धेत दुचाकींच्या एकूण १४ शोरूम वर्धा : वर्धेत विविध कंपनीचे एकूण १४ शोरूम आहेत. यात काही कंपनीचे दोन तर तीन शोरूमचा समावेश आहे. या शोरूमध्ये गुडीपाडव्याचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी करण्यात आली होती. डिलरच्या मागणीनुसार कंपनीने वाहनांचा साठा पाठविला. यातच गुडीपाडवा होताच न्यायालयाने बी ३ इंजिन असलेल्या गाड्यांमुळे प्रदुषणात होत असलेली वाढ कायम राहत असल्याचे म्हणत या गाड्या विक्रीवर बंदी आणली. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या निर्णयामुळे त्यांनी या गाड्या सुट देत विकण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कंपनीच्या गाड्यांवर कमी अधिक रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. मोपेडवर सहा ते सात हजार तर बाईकवर सात ते आठ हजार रुपयांची सूट असल्याचे दिसून आले. यामुळे बऱ्याच नागरिकांनी वाहनांची खरेदी केली.(प्रतिनिधी) ३० कारची विक्री न्यायालयाच्या निर्णयाने दोनचाकीच नाही तर चारचाकी वाहनांवरही बंदी आली. या बंदीचा लाभ उचलत वर्धेत तब्बल ३० चारचाही वाहनांची विक्री झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. बीएस एक प्रदूषणाचे मानक बीएस म्हणजे भारत स्टॅडर्ड स्टेज इंजिनाच्या अंतर्गत वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या नियमनासाठी केंद्र शासनाने दिलेले हे एक मानक होय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे त्यावर नियंत्रण ठेवते. बीएस मानक ही भारतात कार्यरत आहे. यानुसार वाहनांच्या इंजिनचा दर्जा ठरविल्या जातो. या दर्जानुसार भारतातील वाहने बीएस ३ इंजिनची आहेत. या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता बीएस मानांकनात वेळोवळी सुधारणा करण्यात येते. ही सुधारणा करण्याकरिताच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.