शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

२८ दिवसापांसून पाऊस बेपत्ता

By admin | Updated: September 1, 2016 02:05 IST

तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून

सोयाबीन पाने पिवळी : ११ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यातआर्वी : तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून शेंगा भरण्यासाठी पावसाची गरज आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास हातचे सोयाबीन पीक गमावण्याची भिती बळीराजाला सतावत आहे. तर कपाशी पिकही वाढत्या उकाड्याने प्रभावीत होत आहे. आर्वी तालुक्यात आतापर्यंत ७३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी तालुक्यात ११ हजार ६२३ हेक्टरवर सोयाबीन, २३ हजार ६५२ हेक्टरवर कपाशी तर १० हजार ७३३ हेक्टरवर तुरीचे पीक आहे. शेतीच्या हंगामात पावसाच्या प्रतिक्षेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मशागतीची कामे पूर्ण केली असून पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या शेंगाना त्याची भरण होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. तालुक्यात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा नाही अशा शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. परंतु वरूणराजाची तालुक्यावर अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे. शेतशिवारात मजूरांची कामे अखेरच्या टप्प्यात कामे आहे. पाऊस वेळेवर न आल्यास मजूरांनाही कामाअभावी घरी राहावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील निंबोली, सर्कसपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, कर्माबाद, लाडेगाव, नांदपूर, एकलारा, जळगाव, शिरपूर बोडे, देऊरवाडा, राजापूर, इठलापूर, वर्धमनेरी, खुबगाव, नांदोरा, दहेगाव (मु.), बाजरवाडा, रोहणा, पिंपळखुटा, वाढोणा, गुमगाव, तरोडा, वाई, धनोडी, वाढोणा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.(तालुका प्रतिनिधी) बळीराजा चिंताग्रस्त कपाशी व तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे.