शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

२८ दिवसापांसून पाऊस बेपत्ता

By admin | Updated: September 1, 2016 02:05 IST

तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून

सोयाबीन पाने पिवळी : ११ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यातआर्वी : तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून शेंगा भरण्यासाठी पावसाची गरज आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास हातचे सोयाबीन पीक गमावण्याची भिती बळीराजाला सतावत आहे. तर कपाशी पिकही वाढत्या उकाड्याने प्रभावीत होत आहे. आर्वी तालुक्यात आतापर्यंत ७३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी तालुक्यात ११ हजार ६२३ हेक्टरवर सोयाबीन, २३ हजार ६५२ हेक्टरवर कपाशी तर १० हजार ७३३ हेक्टरवर तुरीचे पीक आहे. शेतीच्या हंगामात पावसाच्या प्रतिक्षेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मशागतीची कामे पूर्ण केली असून पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या शेंगाना त्याची भरण होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. तालुक्यात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा नाही अशा शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. परंतु वरूणराजाची तालुक्यावर अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे. शेतशिवारात मजूरांची कामे अखेरच्या टप्प्यात कामे आहे. पाऊस वेळेवर न आल्यास मजूरांनाही कामाअभावी घरी राहावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील निंबोली, सर्कसपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, कर्माबाद, लाडेगाव, नांदपूर, एकलारा, जळगाव, शिरपूर बोडे, देऊरवाडा, राजापूर, इठलापूर, वर्धमनेरी, खुबगाव, नांदोरा, दहेगाव (मु.), बाजरवाडा, रोहणा, पिंपळखुटा, वाढोणा, गुमगाव, तरोडा, वाई, धनोडी, वाढोणा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.(तालुका प्रतिनिधी) बळीराजा चिंताग्रस्त कपाशी व तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे.