शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

२८ दिवसापांसून पाऊस बेपत्ता

By admin | Updated: September 1, 2016 02:05 IST

तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून

सोयाबीन पाने पिवळी : ११ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यातआर्वी : तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून शेंगा भरण्यासाठी पावसाची गरज आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास हातचे सोयाबीन पीक गमावण्याची भिती बळीराजाला सतावत आहे. तर कपाशी पिकही वाढत्या उकाड्याने प्रभावीत होत आहे. आर्वी तालुक्यात आतापर्यंत ७३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी तालुक्यात ११ हजार ६२३ हेक्टरवर सोयाबीन, २३ हजार ६५२ हेक्टरवर कपाशी तर १० हजार ७३३ हेक्टरवर तुरीचे पीक आहे. शेतीच्या हंगामात पावसाच्या प्रतिक्षेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मशागतीची कामे पूर्ण केली असून पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या शेंगाना त्याची भरण होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. तालुक्यात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा नाही अशा शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. परंतु वरूणराजाची तालुक्यावर अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे. शेतशिवारात मजूरांची कामे अखेरच्या टप्प्यात कामे आहे. पाऊस वेळेवर न आल्यास मजूरांनाही कामाअभावी घरी राहावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील निंबोली, सर्कसपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, कर्माबाद, लाडेगाव, नांदपूर, एकलारा, जळगाव, शिरपूर बोडे, देऊरवाडा, राजापूर, इठलापूर, वर्धमनेरी, खुबगाव, नांदोरा, दहेगाव (मु.), बाजरवाडा, रोहणा, पिंपळखुटा, वाढोणा, गुमगाव, तरोडा, वाई, धनोडी, वाढोणा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.(तालुका प्रतिनिधी) बळीराजा चिंताग्रस्त कपाशी व तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे.