शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आधी वाढीव मोबदला नंतरच प्रकल्प

By admin | Updated: February 20, 2015 01:33 IST

वर्धा नदीवरील चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ या तीन जिल्ह्याच्या सीमेवर प्रस्तावित दिंडोरा बॅरेज प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाने बुधवारला जनसुनावणी घेतली.

हिंगणघाट : वर्धा नदीवरील चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ या तीन जिल्ह्याच्या सीमेवर प्रस्तावित दिंडोरा बॅरेज प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाने बुधवारला जनसुनावणी घेतली. यावेळी प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी आधी शेतीचा वाढीव मोबदला द्या, नंतरच प्रकल्पाची निर्मिती, अशी भूमिका घेऊन त्यांच्या संतप्त भावना उपस्थितांसमोर मांडल्या. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.वर्धा नदीवर १ हजार ६९० हेक्टर जमीन संपादित करून बंधाऱ्याच्या निर्मितीची योजना तत्कालीन निपॉन डेन्रो वीज प्रकल्पाच्यावतीने आखली होती. काही शेतकऱ्यांच्या जमिनींना ३० ते ४० हजार रूपये एकरी भाव देवून जमिनी अधीग्रहीत करण्यात आल्या. तसेच अनेक शेतीसंबंधी अवार्ड करून देखील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नव्हता. यानंतर निपॉन डेन्रो प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. परंतु सदर जागेवर नियोजित बंधाऱ्याची पुर्तता करण्यासाठी शासनाने विदर्भ पाटबंधारेच्या माध्यमातून दिंडोरा बॅरेज उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली. निपॉन डेन्रो द्वारा संपादित जमिनीचे हस्तांतरण सुद्धा करण्यात आले. मात्र मुळ प्रकल्प रद्द झाल्याने नवीन प्रस्तावित प्रकल्पाकरिता जमीन अधिग्रहण कायद्यानुसार जमिनींचा मोबदला देण्याची मागणी प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांची आहे.पर्यावरण विभागाच्यावतीने याबाबत बुधवारी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, विदर्भ पाटबंधारे विभागाचे भाके, पर्यावरण विभागाच्या हेमा देशपांडे, मुंडे, उपविभागीय अधिकारी भूगावकर, तहसीलदार दीपक कारंडे आदी उपस्थित होते. जनसुनावणीला आ. समीर कुणावार यांनी उपस्थित राहून सदर प्रकल्प व्हावा, परंतु शेतकऱ्यांना मात्र शेतीचा मोबदला नियमाप्रमाणे मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडून पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी किशोर दिघे व माजी जि.प. सदस्य प्रफुल्ल बाडे उपस्थित होते. या जनसुणावणी दरम्यान आधी शेतीचा वाढीव मोबदला नंतरच प्रकल्पाची सुरवात, अशी भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे स्वीय सहाय्यक राहुल सराफ, माजी खा. सुरेश वाघमारे, वणीचे भाजपा विधानसभा प्रमुख विजय तिजुरकर यासह पुंडलिक तिजारे, अशोक नोमुजवार, गजानन ढगे, मयूर हुमाड, राजेश भोयर आदींनी दिला. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)