शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रदक्षिणा आंदोलन

By admin | Updated: August 9, 2016 01:20 IST

जमीन अधिग्रहणाची कार्यवाही अर्धवट सोडल्यामुळे १५ वर्षांपासून अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मोबदला मिळालेला

१५ वर्षांपासून प्रलंबित : जमीन अधिग्रहण मोबदल्याचे प्रकरण वर्धा : जमीन अधिग्रहणाची कार्यवाही अर्धवट सोडल्यामुळे १५ वर्षांपासून अन्यायग्रस्त शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आर्वी तालुक्यातील शेतकरी प्रशांत क्षीरसागर याने सोमवारी भाजयुमोचे शहर अध्यक्ष बाळा जगताप यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सायकल प्रदक्षिणा आंदोलन केले. आर्वी येथील प्रशांत क्षीरसागर यांचे अर्धा एकर शेत सिंचन विभागाद्वारे काही वर्षांपूर्वी अधिग्रहीत करण्यात आले. या जमिनीवर विहीर खोदून नेरी या पुनर्वसीत गावात पाणी पुरवठ्याची तयारी सुरू केली. २००९ पासून विदर्भ पाठबंधारे विभागाने सदर जमीन आपल्या अखत्यारीत घेतली. येथे विहीर खोदून पाईप लाईनही टाकली; परंतु या विहिरीला अत्यल्प पाणी असल्याने सिंचन विभागाने दुसरीकडे पुन्हा जमीन अधिग्रहीत करून दुसरी विहीर खोदली आणि नेरी पुनर्वसन गावाला पाण्याची सोय करून दिली. यामुळे आधी अधिग्रहीत केलेले प्रशांत क्षीरसागर यांचे शेत विभागाच्या कुठल्याही कामाचे नव्हते. तरीही सिंचन विभागाने येथील अतिक्रमण कायमच ठेवले आहे. शेत नगर पालिकेच्या हद्दीत येत असल्याने ७० ते ८० लाख रुपये मोबदला मिळणे अपेक्षीत होते. त्यामुळेच सिंचन विभाग जमीन अधिग्रहणासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. अनेक वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने यापूवी क्षीरसागर यांनी बाळा जगतापसह २२ डिसेंबर २०१५ रोजी विहिरीत उतरून आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाच्या आश्वासनामुळे सदर आंदोलन मागे घेतले होते. तरीही मोबदला न मिळाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सायकल प्रदक्षिणा आंदोलन केले. तात्काळ मोबदला न मिळाल्यास संबंधीत विभागाविरोधात अवैध अतिक्रमणाबाबत तक्रार देण्याचा इशारा क्षीरसागर यांनी यावेळी दिला. सायकल प्रदषिणा हे अनोखे आंदोलन आज शहरात अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.(प्रतिनिधी) १५ दिवसांत मोबदला देण्याचे आश्वासन ४आंदोलनाची दखल घेत प्रशांत क्षीरसागर व बाळा जगताप यांच्याशी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जमीन अधिग्रहण अधिकारी पांडे आणि विदर्भ पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी चर्चा केली. यावेळी १५ दिवसात अधिग्रहणाची अर्धवट प्रक्रिया पूर्ण करून संबंधीत विभागाद्वारे पंधरा दिवसाच्या आत मोबदला दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.