शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातील वैरण टंचाईवर मात

By admin | Updated: March 25, 2015 02:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात प्रत्येक वर्षी वैरण टंचाई भासत आली आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगत आहे.

रूपेश खैरी वर्धाउन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात प्रत्येक वर्षी वैरण टंचाई भासत आली आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगत आहे. जिल्ह्यात वैरण निर्मितीकरिता विविध ठिकाणी मका व ठोब्यांची लागवड केल्याने गरज भागवून वैरण शिल्लक राहत आहे. छोट्या मोठ्या जनावरांकरिता एकूण ८ लाख ८० हजार २०० मेट्रीक टन वैरण आवश्यक आहे; मात्र विविध क्षेत्रातून एकूण १० लाख ७३ हजार ८५५ मेट्रीक टन वैरण तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यात वैरण टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह नाही. यामुळे उन्हाळ्यात जनावरांकरिता कुठेही चारा डेपो सुरू होणार नसल्याची माहिती आहे. १९ व्या पशुगनणेनुसार जिल्ह्यात छोटी व मोठी अशी ४ लाख ८९ हजार १७३ जनावरांची नोंद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. यात २ लाख ४४ हजार ४०३ मोठी तर २ लाख ४४ हजार ७७० छोटी जनावरे आहेत. यात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या वर्गातील जनावरांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय अहवालानुसार मोठ्या जनावरांना दिवसाकाठी सात किलो तर छोट्या जनावरांना तीन किलो वैरण आवश्यक आहे. या मापकानुसार एकूण ८ लाख ८० हजार २०० मेट्रीक टन वैरणाची गरज आहे. ही गरज भागवूनही जिल्ह्यात सुमारे १ लाख ९३ हजार ६५५ मेट्रीक टन वैरण शिल्लक राहत असल्याचे सोमवारी समोर आले. यामुळे वैरणाच्या निर्यातिची स्थिती आहे. वनविभागाकडून ९१,११५ मेट्रीक टन चाऱ्याची निर्मितीजिल्ह्यातील आठही तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रातून एकूण ९१ हजार ११५ मेट्रीक टन वैरणाची निर्मिती होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालात नमूद आहे. यात वर्धा तालुक्यातून १,१५७, देवळी १,१९६, सेलू ९,३२६, हिंगणघाट २,७८४, समुद्रपूर ८,४६४, आर्वी २५,२२४, आष्टी १८,३२६ तर कारंजा तालुक्यातून २४,१३८ मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे. या व्यतिरिक्त असलेल्या समुद्रपूर, आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्यात असलेल्या सहा कुरणातून ९४५ मेट्रीक टन चारा निर्माण होत आहे. या चाऱ्याच्या आधारावर या भागातील जनावरे चरत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या भागात असलेल्या जंगली श्वापदांच्या हल्ल्यामुळे या भागात जनावरे जात नसल्याची ओरड आहे. चारा टंचाई निवारणार्थ ३७.३५ लक्ष रुपयांचे अनुदान जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होणार नाही याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने पशुसंवर्ध विभागाला उपाययोजना आखण्याकरिता एकूण ३७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यापैकी एकूण ६ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. खर्च झालेल्या रकमेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने २८ हजार ३२९ किलो वैरण बियाणे वाटप करण्यात आले आहेत. तर कुषी विभागाच्यावतीने एकूण १८ हजार ८०० किलो बियाणे वाटप करण्यात आले आहेत. वाटप करण्यात आलेल्या बियाण्यांचा ९४३ हेक्टरवर पेरा करण्यात आला. या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभाग व कृषी विभागाच्यावतीने ठोब्यांचे वितरणही करण्यात आले आहे. ठोब्यांचा पेरा जिल्ह्यात एकूण ७० हेक्टरवर करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होणार नसल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कृषी विभागाच्यावतीने मका पिकाचे बियाणे वाटप केले आहेत.