शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

ध्वनीप्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचा बडगा

By admin | Updated: October 29, 2016 00:51 IST

उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निकालानुसार ध्वनी प्रदूषण हा गुन्हा आहे

अंकीत गोयल : नागरिकांनी कायदा पाळत ध्वनीप्रदूषण टाळावे वर्धा : उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निकालानुसार ध्वनी प्रदूषण हा गुन्हा आहे. कायद्याचे उल्लघन केल्यास सदर व्यक्तीला पाच वर्षे करावासाची शिक्षा होवू शकते, त्यामुळे दिवाळी, नाताळ आणि नववर्षचा उत्सव साजरा करताना नागरिकांनी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.सध्या दिवाळीसाठी आवाजाचे फटाके घेण्यासाठी नागरिक उत्सुक असतात, तसेच अशा उत्सवादरम्यान ढोल, ताशे वाद्य, डिजे तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर केला जातो. असे उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषण होवून त्याचा इतरांना त्रास होवून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम २००० नुसार पर्यावरण सुरक्षा अधिनियमचे कलम १५ व १९ नुसार गुन्हा असून या कायद्याचा भंग केल्यास संबंधितास ५ वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. सदर कायद्यानुसार धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवण्याचे बंधन आहेत, ते क्षेत्र असे आहे.शांतता क्षेत्र (दवाखाने, मंदिर, मस्जिद, शाळा, महाविद्यालये इत्यादी) दिवसा आवाज ५० डेसिबल व रात्री ४० डेसिबल रहायला हवा. निवासी क्षेत्र (लोकांचे राहण्याचे ठिकाण, लोकवस्ती वगैरे) दिवसा ५५ डेसिबल व रात्री ४५ डेसिबल वाणिज्य क्षेत्र (आठवडी बाजार व बाजार लाईन वगैरे) दिवसा ६५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्र (उत्पादन क्षेत्र, कारखाशने) दिवसा ७५ डेसिबल व रात्री ७० डेसिबल इतकी मर्यादा आहे.त्या त्या क्षेत्रात मर्यादित आवाजापेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण झाल्यास पर्यावरण सुरक्षा अधिनियमाचा भंग होतो. त्यामुळे नागरिकांनी आवाजाच्या तिव्रतेबाबात खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.(प्रतिनिधी)