शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

'गावांचा विकास झाला तरच देश मजबूत होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:17 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले.

वर्धा : ग्रामीण भागातील अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाला पाहिजे. तरच देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र सुधारेल व देश मजबूत होईल. हा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जीबीएमएम शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात केले.

हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल. विविध प्रकल्पातून रोजगाराची निर्मिती कशी होईल याचा विचार केला पाहिजे. 

गरिबांना जात, धर्म, पंथ, भाषा नसते. त्यांना केवळ विकासाचीच भूक असते आणि त्यासाठी रोजगार निर्मितीची गरज असून सिंदी (रेल्वे) येतील प्रस्तावित ड्रायपाेर्टमुळे वर्धा जिल्ह्यात २५ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. मागील पाच वर्षात हिंगणघाट शहराचा चेहरा बदलला असून याचे पूर्ण श्रेय आमदार कुणावार व नगराध्यक्ष बसंतानी तसेच संपूर्ण नगरसेवक आणि न.प. कर्मचाऱ्यांचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे आदींची उपस्थिती होती.

खा. रामदास तडस यांनी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या रेल्वे गाड्यांना तातडीने थांबा मिळावा अशी मागणी यावेळी केली. संचालन मंजूषा ठाकरे व दत्तात्रय पवार यांनी केले. आभार मुख्याध्यापक गंगाधर ढगे यांनी मानले. कार्यक्रमाला गिमा टेक्स इंडस्ट्रीजचे प्रशांतकुमार मोहता, विद्या भारतीचे प्रदेश अध्यक्ष रमेश धारकर, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती वसंत आंबटकर, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, जि. प. सभापती माधव चंदनखेडे, रिपाइंचे शंकर मुंजेवार आदींची उपस्थिती होती.

उड्डाण पूल व मेट्रोची हिंगणघाटकरांना भेट

गडकरी यांनी यावेळी येथील शहरातील मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरील कलोडे चौक ते सरकारी दवाखाना येथे उड्डाण पूल मंजूर केल्याची घोषणा केली. शिवाय नागपूर ते चंद्रपूर ही मेट्रो हिंगणघाट मार्गे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून हिंगणघाटकरांना सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे या दोन्ही मागण्या आमदार कुणावार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून गडकरी यांच्याकडे केल्या होत्या.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीRamdas Tadasरामदास तडस