शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

'गावांचा विकास झाला तरच देश मजबूत होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:17 IST

शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले.

वर्धा : ग्रामीण भागातील अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाला पाहिजे. तरच देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र सुधारेल व देश मजबूत होईल. हा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जीबीएमएम शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात केले.

हिंगणघाट नगर परिषदेच्या १५४ कोटी रुपयांच्या कामांचा श्रीगणेशा नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामीण भागात टेक्नॉलॉजी आणण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्याला उद्योगशीलता वाढवावी लागेल. विविध प्रकल्पातून रोजगाराची निर्मिती कशी होईल याचा विचार केला पाहिजे. 

गरिबांना जात, धर्म, पंथ, भाषा नसते. त्यांना केवळ विकासाचीच भूक असते आणि त्यासाठी रोजगार निर्मितीची गरज असून सिंदी (रेल्वे) येतील प्रस्तावित ड्रायपाेर्टमुळे वर्धा जिल्ह्यात २५ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. मागील पाच वर्षात हिंगणघाट शहराचा चेहरा बदलला असून याचे पूर्ण श्रेय आमदार कुणावार व नगराध्यक्ष बसंतानी तसेच संपूर्ण नगरसेवक आणि न.प. कर्मचाऱ्यांचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आ. डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे आदींची उपस्थिती होती.

खा. रामदास तडस यांनी हिंगणघाट रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या रेल्वे गाड्यांना तातडीने थांबा मिळावा अशी मागणी यावेळी केली. संचालन मंजूषा ठाकरे व दत्तात्रय पवार यांनी केले. आभार मुख्याध्यापक गंगाधर ढगे यांनी मानले. कार्यक्रमाला गिमा टेक्स इंडस्ट्रीजचे प्रशांतकुमार मोहता, विद्या भारतीचे प्रदेश अध्यक्ष रमेश धारकर, ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती वसंत आंबटकर, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, जि. प. सभापती माधव चंदनखेडे, रिपाइंचे शंकर मुंजेवार आदींची उपस्थिती होती.

उड्डाण पूल व मेट्रोची हिंगणघाटकरांना भेट

गडकरी यांनी यावेळी येथील शहरातील मध्यभागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरील कलोडे चौक ते सरकारी दवाखाना येथे उड्डाण पूल मंजूर केल्याची घोषणा केली. शिवाय नागपूर ते चंद्रपूर ही मेट्रो हिंगणघाट मार्गे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून हिंगणघाटकरांना सुखद धक्का दिला. विशेष म्हणजे या दोन्ही मागण्या आमदार कुणावार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून गडकरी यांच्याकडे केल्या होत्या.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीRamdas Tadasरामदास तडस