शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शिक्षकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज

By admin | Updated: August 9, 2015 02:11 IST

शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून ...

शिक्षक संघाचा मेळावा : राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वर्धा : शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून काम भागणार नाही तर त्याकरिता शिक्षकांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी सघंटित होणे आवश्यक आहे, असे विचार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. येथील एका सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब काळे, राज्य सरचिटनिस मधुकर काचोळे, विदर्भ नेते बी. रा. भालतडक, पुणे विभागाचे माधव पाटील जिल्ह्याचे नेते शेषराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या नेत्यांनी शिक्षकांना सोसाव्या लागत असलेल्या अनेक समस्यांची माहिती दिली. शिवाय त्या सोडविण्याकरिता संघाकडून प्रयत्न होत असल्याचेही सांगितले. या समस्या सोडविण्याकरिता सोमवारी सकाळी संघाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याच वेळी शिक्षकांच्या १६ व्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली. ते अधिवेशन पुणे येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सभेचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे लोमेश वराडे यांनी केले. त्यांनी संघाच्या वतीने शिक्षकांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिवाय वर्षभरात संघाच्यावतीने उभारलेल्या लढ्यातून शिक्षकांच्या सुटलेल्या समस्यांचा उहापोह केला. कार्यक्रमाचे संचालक मोहन कोठे व वर्षा काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन पुरी यांनी माणले. या कार्यक्रमाला वसंत बोडखे, अजय गावंडे, संजय गायकवाड यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)