शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रात होते सर्वाधिक जलसंधारण

By admin | Updated: April 2, 2017 00:43 IST

सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी तथा भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.

ंजलयुक्त शिवार : ६८२ कामांना ११.१६ कोटींचा निधी मंजूर, २८२ कामे झालीत पूर्ण प्रशांत हेलोंडे   वर्धा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी तथा भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कृषी विभागासह वन विभागामार्फतही ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या कामांमुळे वनक्षेत्रात सर्वाधिक जलसंधारण होत असल्याचे पाहावयास मिळते. वन विभागाच्या ६८२ कामांना शासनाकडून मंजुरी मिळाली असून ११.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जंगल भागात होणारी कामे मानवासह प्राणी, पक्ष्यांसाठी तथा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जातात. यामुळे राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियानात कृषी विभाग, अन्य संस्थांसह वन विभागाकडेही विविध कामे सोपविण्यात आली आहेत. वन संवर्धन व संरक्षणासोबतच वन विभागाद्वारे जलयुक्त शिवार अभियानात जलसाठा वाढविण्याचे कामही केले जात आहे. वन विभागाकडून ढाळीचे बांध, नाला खोलीकरण, दगडी बांध या कामांसह पाणी साठवणूक तलावांची निर्मिती केली जात आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात जलसंचय होत असून भूजल पातळी वाढत असल्याचे समोर आले आहे. वन विभागाकरिता ६८२ कामे मंजूर असून . यासाठी ११ कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीची तरतूदही आहे. यातील वन विभागाकडून आतापर्यंत २८२ कामे पूर्ण केली आहेत. या कामांवर ३ कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या माध्यमातून जंगल क्षेत्रातील पाणी साठवणूक वाढली असून वन्य प्राणी, पक्ष्यांच्या पाण्याची सोय झाली आहे. वनक्षेत्रात घनदात वृक्षवेली राहत असल्याने त्या भागात पाणी जमिनीत मुरते. या क्षेत्रात पाणी साठवणूक तलाव व खोल-समतल चर केल्याने वाहून जाणारे पाणी अडते व भूजल पातळीत लक्षनिय वाढ होते. वन विभागाची आणखी ३२४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे वन क्षेत्रातील जलसंचय वाढून पर्यायाने लगतच्या शेतजमिनींनाही फायदाच होणार आहे. जंगल भागालगतच्या गावांतील विहिरींची पातळी वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जंगलांतील पाणीटंचाई होणार दूर जंगल क्षेत्रामध्ये नदी, नाले नसले तरी पाणीटंचाई निर्माण होते. परिणामी, वन विभागाला कृत्रिम पाणवठे निर्माण करून त्यात टँकरद्वारे पाणी टाकावे लागते. प्रसंगी विंधनविहिरींचे खोदकाम करावे लागते. जलयुक्त शिवार अभियानात बऱ्यापैकी जलसंचय झाला आहे. यामुळे जंगलातील पाणीटंचाई दूर होणार असून सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे.