शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बचत गटांनी स्पर्धा करून उत्कृष्ट उद्योजक बनावे

By admin | Updated: August 27, 2016 00:22 IST

बचत गटांनी बाजारपेठेतील उत्पादकाशी स्पर्धा करून लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्कृष्ट उद्योजक बनावे.

शैलेश नवाल : वस्त्रोद्योग व शिवणकाम कार्यशाळावर्धा : बचत गटांनी बाजारपेठेतील उत्पादकाशी स्पर्धा करून लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्कृष्ट उद्योजक बनावे. यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला शासनाच्यावतीने बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच उद्योगाकरिता निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी विकास भवन येथे आयोजित वस्त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत केले. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद, माविम व कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प यांच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वस्त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्या कार्यक्रमाला कृषी समृद्धी कृषी विकास प्रकल्प (केम) चे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, जिल्हा परिषदचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आजनकर, नाबार्डच्या व्यवस्थापक बन्सोड, रितेश ताजने, माविमच्या जिल्हा व्यवस्थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निलेश वावरे, प्रवीण जयस्वाल व मिलिंद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.यावेळी शैलेश नवाल म्हणाले, बचत गटांनी आपला कायमस्वरूपी उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करून कुशल उद्योग सुरू करावे. यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपला उद्योग सुरू करावा व बाजारपेठेत आपल्या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला शहरातील मध्यभागी दुकाणे सुरू करून कमीशनवर विकण्यास प्रयत्न करण्यात येईल. गटांनी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करून शेकऱ्यांना भाडे तत्वावर द्यावी. या उपकरणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यास मदत होईल. बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्यास मदत होईल. तसेच बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करून या स्पर्धेत उतरायला पाहिजे, असेही ते म्हणाले.प्रमोद पवार म्हणाले, बचत गटांनी बाजारपेठमध्ये ज्या वस्तूची जास्त मागणी असले त्याच वस्तूचे उत्पादन करावे. जेणेकरून गटाच्या उत्पादित मालाला भाव मिळून गटाचे आर्थिक उत्पन्न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल, तसेच कंपनीच्या मालाशी स्पर्धा करून कमी दरात मालाची विक्री केल्यास जास्त प्रमाणात बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. यावेळी कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प(केम)च्या वतीने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी केमचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी व इतर मान्यवरांनी बचत गटाच्या महिलांना उद्योग सुरू करण्याविषयी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)